शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

कोल्हापूर : धामणी, उचंगी प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमीन वाटप करा: विभागीय आयुक्त, सिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:09 IST

कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध असून जमीन वाटपाची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा : चंद्रकांत दळवी सर्फनाल्याचे ७५ टक्के काम पूर्णउचंगीचे ८५ टक्के काम, आंबेओहळचे ७० टक्के काम पूर्णनागनवाडीसाठी २२ हेक्टर जमिनींचे वाटप, धामणीचे ७५ टक्के काम पूर्ण

कोल्हापूर : जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध असून जमीन वाटपाची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहळ, नागनवाडी, धामणी आदी प्रकल्पांच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी विषयांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख उपस्थिती कृषी खोरे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शिल्पा राजे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनिषा कुंभार, गडहिंग्लज प्रांताधिकारी संगीता चौगुले, आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे आदींची होती.चंद्रकांत दळवी म्हणाले, शासनाकडे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध असून पुढील दोन वर्षांत केंद्र सरकारकडूनही पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे.

छोट्या-छोट्या कारणांमुळे प्रकल्प अनेक काळ रखडणे, भूसंपादनाची कामे पूर्ण न होणे याबाबी विकासावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर दरमहा नियमितपणे बैठका घेऊन प्रकल्पांमधील अडचणींची पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने सोडवणूक करावी.सर्फनाल्याचे ७५ टक्के काम पूर्णआजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २२९ प्रकल्पग्रस्त असून त्यांना २०८ हेक्टर क्षेत्र देय आहे. यातील माहे डिसेंबर २०१७ अखेर ११५ प्रकल्पग्रस्तांना ९२ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. सध्या ७७ हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. अद्यापही ४० हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आलेउचंगीचे ८५ टक्के कामआजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे २८० प्रकल्पग्रस्त असून १६१ प्रकल्पग्रस्तांना १०० हेक्टर जमीन देय आहे. माहे डिसेंबर अखेर १०२ प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ५९ प्रकल्पग्रस्तांना ४२ हेक्टर जमीन देय आहे.

आंबेओहळचे ७० टक्के काम पूर्णआजरा तालुक्यातील आंबेओहळ मध्यम प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. याचे ८२२ प्रकल्पग्रस्त असून ४६७ जमीन मिळण्यास पात्र आहे. त्यांना ३२७ हेक्टर क्षेत्र देय आहे. माहे डिसेंबर २०१७ अखेर १३३ पात्र प्रकल्पग्रस्तांना ७२ हेक्टर क्षेत्राचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ३३४ प्रकल्पग्रस्तांना २४८ हेक्टर क्षेत्र देय आहे.

नागनवाडीसाठी २२ हेक्टर जमिनींचे वाटपभुदरगड तालुक्यातील नागनवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २१४ प्रकल्पग्रस्तांना ११२ हेक्टर जमीन देय आहे. माहे डिसेंबर २०१७ अखेर ६६ प्रकल्पग्रस्तांना २२ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १४८ प्रकल्पग्रस्तांना ७९ हेक्टर क्षेत्र देय आहे.

धामणीचे ७५ टक्के काम पूर्णराधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२३ प्रकल्पग्रस्तांना १२० हेक्टर जमीन देय आहे. डिसेंबर २०१७ अखेर ८० प्रकल्पग्रस्तांना ११२ हेक्टरचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ४३ प्रकल्पग्रस्तांना ५६ हेक्टर क्षेत्र देय आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार