शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर : धामणी, उचंगी प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमीन वाटप करा: विभागीय आयुक्त, सिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:09 IST

कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध असून जमीन वाटपाची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांची कामे समन्वय ठेवून गतीने करा : चंद्रकांत दळवी सर्फनाल्याचे ७५ टक्के काम पूर्णउचंगीचे ८५ टक्के काम, आंबेओहळचे ७० टक्के काम पूर्णनागनवाडीसाठी २२ हेक्टर जमिनींचे वाटप, धामणीचे ७५ टक्के काम पूर्ण

कोल्हापूर : जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध असून जमीन वाटपाची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेशही त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहळ, नागनवाडी, धामणी आदी प्रकल्पांच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी विषयांबाबत आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

प्रमुख उपस्थिती कृषी खोरे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, शिल्पा राजे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनिषा कुंभार, गडहिंग्लज प्रांताधिकारी संगीता चौगुले, आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे आदींची होती.चंद्रकांत दळवी म्हणाले, शासनाकडे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध असून पुढील दोन वर्षांत केंद्र सरकारकडूनही पाटबंधारे विभागाच्या कामांसाठी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे.

छोट्या-छोट्या कारणांमुळे प्रकल्प अनेक काळ रखडणे, भूसंपादनाची कामे पूर्ण न होणे याबाबी विकासावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर दरमहा नियमितपणे बैठका घेऊन प्रकल्पांमधील अडचणींची पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने सोडवणूक करावी.सर्फनाल्याचे ७५ टक्के काम पूर्णआजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. २२९ प्रकल्पग्रस्त असून त्यांना २०८ हेक्टर क्षेत्र देय आहे. यातील माहे डिसेंबर २०१७ अखेर ११५ प्रकल्पग्रस्तांना ९२ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. सध्या ७७ हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. अद्यापही ४० हेक्टर क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आलेउचंगीचे ८५ टक्के कामआजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे २८० प्रकल्पग्रस्त असून १६१ प्रकल्पग्रस्तांना १०० हेक्टर जमीन देय आहे. माहे डिसेंबर अखेर १०२ प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ५९ प्रकल्पग्रस्तांना ४२ हेक्टर जमीन देय आहे.

आंबेओहळचे ७० टक्के काम पूर्णआजरा तालुक्यातील आंबेओहळ मध्यम प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. याचे ८२२ प्रकल्पग्रस्त असून ४६७ जमीन मिळण्यास पात्र आहे. त्यांना ३२७ हेक्टर क्षेत्र देय आहे. माहे डिसेंबर २०१७ अखेर १३३ पात्र प्रकल्पग्रस्तांना ७२ हेक्टर क्षेत्राचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ३३४ प्रकल्पग्रस्तांना २४८ हेक्टर क्षेत्र देय आहे.

नागनवाडीसाठी २२ हेक्टर जमिनींचे वाटपभुदरगड तालुक्यातील नागनवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २१४ प्रकल्पग्रस्तांना ११२ हेक्टर जमीन देय आहे. माहे डिसेंबर २०१७ अखेर ६६ प्रकल्पग्रस्तांना २२ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १४८ प्रकल्पग्रस्तांना ७९ हेक्टर क्षेत्र देय आहे.

धामणीचे ७५ टक्के काम पूर्णराधानगरी तालुक्यातील धामणी मध्यम प्रकल्पाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १२३ प्रकल्पग्रस्तांना १२० हेक्टर जमीन देय आहे. डिसेंबर २०१७ अखेर ८० प्रकल्पग्रस्तांना ११२ हेक्टरचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ४३ प्रकल्पग्रस्तांना ५६ हेक्टर क्षेत्र देय आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदार