शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात पुन्हा बिघाड, पाणी पुरवठ्यात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:54 IST

कोल्हापूर शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुरवठा खंडित झाला, तर ट्रॉन्स्फॉर्मर जळाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री असा प्रकार घडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात पुन्हा बिघाड पाणी पुरवठ्यात व्यत्यय

कोल्हापूर : शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुरवठा खंडित झाला, तर ट्रॉन्स्फॉर्मर जळाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री असा प्रकार घडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आठ दिवसांपूर्वी झाडांच्या फांद्यांचा विद्युत तारांना स्पर्श होत राहिल्याने एकाच रात्रीत तीनवेळा वीज पुरवठा बंद झाला. ट्रॉन्स्फॉर्मर जळाला. त्याची दुरुस्ती करून घेण्यात आली; त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होतो न होतो तोच पुन्हा गुरुवारी रात्री बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर जळाला; त्यामुळे पाणी उपसा तसेच पुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर रात्रीतच त्याठिकाणी दुसरा ट्रॉन्फॉर्मर बसविला.शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पंपिंग व्यवस्थीत सुरू राहील; मात्र त्यानंतर पुन्हा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला. तो दुरुस्त करण्याकरिता एम. एस. सी. बी.च्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केला. ट्रॉन्स्फॉर्मर बदलणे, दुरुस्त करणे यात बराच वेळ गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले. दुपारनंतर मात्र नियमित जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले.बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी चंबुखडी पाण्याची टाकी येथे आणले जाते. त्यानंतर या टाकीतून शहरातील संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच लक्षतीर्थ, फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी या उपनगर भागाला पाणी पुरवठा केला जातो. या भागात शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. दुपारनंतर मात्र पाणी पुरवठा सुरू झाला.दरम्यान, एकाच आठवड्यात दोनवेळा बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा विभागाने बालिंगा केंद्रातील ट्रॉन्स्फॉर्मर, मोटर, वायरिंग, पॅनेल बोर्ड, पंप, आदी यंत्रे नवीन बसविण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला असून अधिकाऱ्यांना त्याबाबत एस्टिमेट करायला सांगितली आहेत, असे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर