शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात पुन्हा बिघाड, पाणी पुरवठ्यात व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:54 IST

कोल्हापूर शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुरवठा खंडित झाला, तर ट्रॉन्स्फॉर्मर जळाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री असा प्रकार घडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात पुन्हा बिघाड पाणी पुरवठ्यात व्यत्यय

कोल्हापूर : शहराच्या निम्म्याहून अधिक भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मस शुक्रवारी पुन्हा एकदा बिघडल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली. गेल्याच आठवड्यात एकाच रात्री तीनवेळा वीज पुरवठा खंडित झाला, तर ट्रॉन्स्फॉर्मर जळाला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री असा प्रकार घडल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आठ दिवसांपूर्वी झाडांच्या फांद्यांचा विद्युत तारांना स्पर्श होत राहिल्याने एकाच रात्रीत तीनवेळा वीज पुरवठा बंद झाला. ट्रॉन्स्फॉर्मर जळाला. त्याची दुरुस्ती करून घेण्यात आली; त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होतो न होतो तोच पुन्हा गुरुवारी रात्री बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्स्फॉर्मर जळाला; त्यामुळे पाणी उपसा तसेच पुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर रात्रीतच त्याठिकाणी दुसरा ट्रॉन्फॉर्मर बसविला.शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत पंपिंग व्यवस्थीत सुरू राहील; मात्र त्यानंतर पुन्हा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला. तो दुरुस्त करण्याकरिता एम. एस. सी. बी.च्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केला. ट्रॉन्स्फॉर्मर बदलणे, दुरुस्त करणे यात बराच वेळ गेल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले. दुपारनंतर मात्र नियमित जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले.बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी चंबुखडी पाण्याची टाकी येथे आणले जाते. त्यानंतर या टाकीतून शहरातील संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच लक्षतीर्थ, फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, तुळजाभवानी कॉलनी या उपनगर भागाला पाणी पुरवठा केला जातो. या भागात शुक्रवारी सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. दुपारनंतर मात्र पाणी पुरवठा सुरू झाला.दरम्यान, एकाच आठवड्यात दोनवेळा बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा विभागाने बालिंगा केंद्रातील ट्रॉन्स्फॉर्मर, मोटर, वायरिंग, पॅनेल बोर्ड, पंप, आदी यंत्रे नवीन बसविण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला असून अधिकाऱ्यांना त्याबाबत एस्टिमेट करायला सांगितली आहेत, असे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर