शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कोल्हापूर : शिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या मार्गी लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 16:16 IST

सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती, वसतिगृहातील समस्या मार्गी लावण्याची मागणीअभाविपने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

कोल्हापूर : सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोल्हापुर शाखेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे सोमवारी केली.राज्यामध्ये गत दोन वर्षापासून ओबीसी, एन.टी, एस.सी या प्रवगार्तील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही तसेच ती देण्यामध्ये होणारा विलंब व त्यातील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. तसेच राज्यातील शासकीय वसतिगृहामध्येही विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून त्या मार्गी लावाव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अभाविपच्या कोल्हापूर शाखेने सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेतली.विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक श्रीनिवास सूर्यवंशी, ओंकार शिंदे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.या समस्यांबाबत अद्यापही तोडगा काढण्यास शासन असमर्थ ठरले असल्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करत या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात तसेच येत्या १५ दिवसांत शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना मिळाव्यात, अन्यथा, येत्या काळात शासनाला छात्रशक्तीच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.या आहेत मागण्या१) गत दोन वषार्पासून ओबीसी, एन.टी, एस.सी या प्रवगार्तील शिष्यवृत्ती तसेच राजीव गांधी शोधवृत्ती, राष्ट्रीय शोधार्थी शोधवृत्ती, प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही.२) शासनाने या वर्षी शिष्यवृत्ती, ईबीसी, फ्रीशीपचे आॅनलाइन किंवा आॅफलाइन पद्धतीने अर्ज अद्यापही भरून घेतले नाहीत, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.३) महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यासोबत शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घ्यावेत.४) प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीमध्ये कमीत कमी २२५० तर जास्तीत जास्त १२००० रुपये प्रतिवर्षी मिळत आहे. पण महागाई व इतर खर्च लक्षात घेता सरकारने शिष्यवृत्तीची रक्कम १२००० प्रतिवर्ष करावी व त्याप्रमाणे वर्गवार अधिक शिष्यवृत्ती निश्चित करावी.५) शिष्यवृत्तीस मूल्य सूचकांकासोबत जोडावे म्हणजे शिष्यवृत्ती महागाई सोबत मूल्य वाढीत परिवर्तीत होईल.६) राजीव गांधी शोधवृत्ती अंतर्गत फक्त २०० रुपये विद्यार्थ्यांना शोधवृत्ती दिली जाते. संशोधनात्मक शिक्षण घेण्यासाठी या शोधवृत्तीमध्ये संख्येची वाढ करावी.७) सध्या राष्ट्रीय ओबीसी शोधवृत्ती ३०० विद्यार्थ्यांना दिली जाते, ती अपुरी आहे, यामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात यावी.८) सर्व शासकीय वसतिगृहात कायमस्वरूपी निवासी रेक्टर व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी.९) वसतिगृहामध्ये अस्वच्छतेची वारंवार तक्रार असते, येथील स्वच्छतेसाठी सफाई कामगार नियुक्त करण्यात यावेत.१०) शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यात यावी.११) वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी भत्त्यामध्ये वाढ करावी, व तो भत्ता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला लवकरात लवकर मिळावा.१२) आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहामध्ये जेवणाची सोय करण्यात यावी.१३) शासकीय वसतिगृहात दूरदर्शन कक्ष, संगणक कक्ष, भोजन सभागृह, वाचन कक्ष, वॉटर प्युरिफिकेशन, व्यायाम शाळा यांची सोय करण्यात यावी.१४) सर्व वसतिगृहामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर