शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोल्हापूर : घाऊक बाजारात साखरेची घसरण,  डाळींचे दरही कमी : कलिंगडे, द्राक्षांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 10:43 IST

ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देघाऊक बाजारात साखरेची घसरणडाळींचे दरही कमी : डाळींचे दरही कमी कलिंगडे, द्राक्षांची आवक वाढली

कोल्हापूर : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा मार्केटमध्ये सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात घसरण राहिली. मध्यंतरी दरात थोडी सुधारणा झाली होती; पण आता घाऊक बाजारात साखर ३२ ते ३३ रुपये किलोपर्यंत आहे. अद्याप किरकोळ बाजारातील दर मात्र अद्याप कमी झालेले नाहीत.

पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढली असली तरी दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. गेल्या आठवड्यात तूरडाळ व हरभराडाळीच्या दरात थोडी वाढ झाली होती. या आठवड्यात किलोमागे दोन रुपयांची घट झाली आहे.भाजीपाल्याची स्थानिक आवकही चांगली असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. टोमॅटो दहा रुपये किलो तर वांगी, दोडका, ओला वाटाणा, कारली ४० रुपये किलो दर आहे. मेथी, पोकळ्याची पेंढी पाच रुपये तर कोथंबीरचे दर स्थिर आहेत. काकडीची आवकही वाढली असून कोवळी काकडी ६० रुपये किलो. फळ मार्केटमध्ये सध्या कलिंगडे, द्राक्षांची आवक जोरात आहे.

तमिळनाडू येथून हिरव्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू आहे. त्याचबरोबर यंदा स्थानिक शेतकऱ्यांकडूनही आवक चांगली असल्याने ऐन हंगामात दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात २० ते ४० रुपयांपर्यंत दर आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने लिंबूची मागणीही वाढली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू मिळत असून डाळींब सोडले तर सर्वच फळे शंभर रुपये किलोच्या आत मिळत आहेत.मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. सध्या आवक सुरू असली तरी यंदा थोडा उशिराच नियमित आवक सुरू होईल. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याचा दर तेजीत आहे. सरासरी तीन हजार रुपये पेटी तर साडेसातशे रुपये बॉक्सचा दर आहे.

साखरेच्या माळांनी बाजार फुललेयेत्या रविवारी गुढी पाडवा असल्याने बाजारात साखरेच्या माळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. रंगीबेरंगी माळांनी दुकाने फुलली आहेत.

ब्याडगी यंदा झटका देणारयंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने अपेक्षित आवक नाही. परिणामी सध्या बाजारात दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ब्याडगी १६० तर जवारी १४० रुपये किलो दर राहिल्याने यंदा ग्राहकांना मिरची झटका देणार हे नक्की आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार