शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : घाऊक बाजारात साखरेची घसरण,  डाळींचे दरही कमी : कलिंगडे, द्राक्षांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 10:43 IST

ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देघाऊक बाजारात साखरेची घसरणडाळींचे दरही कमी : डाळींचे दरही कमी कलिंगडे, द्राक्षांची आवक वाढली

कोल्हापूर : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा मार्केटमध्ये सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात घसरण राहिली. मध्यंतरी दरात थोडी सुधारणा झाली होती; पण आता घाऊक बाजारात साखर ३२ ते ३३ रुपये किलोपर्यंत आहे. अद्याप किरकोळ बाजारातील दर मात्र अद्याप कमी झालेले नाहीत.

पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढली असली तरी दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. गेल्या आठवड्यात तूरडाळ व हरभराडाळीच्या दरात थोडी वाढ झाली होती. या आठवड्यात किलोमागे दोन रुपयांची घट झाली आहे.भाजीपाल्याची स्थानिक आवकही चांगली असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. टोमॅटो दहा रुपये किलो तर वांगी, दोडका, ओला वाटाणा, कारली ४० रुपये किलो दर आहे. मेथी, पोकळ्याची पेंढी पाच रुपये तर कोथंबीरचे दर स्थिर आहेत. काकडीची आवकही वाढली असून कोवळी काकडी ६० रुपये किलो. फळ मार्केटमध्ये सध्या कलिंगडे, द्राक्षांची आवक जोरात आहे.

तमिळनाडू येथून हिरव्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू आहे. त्याचबरोबर यंदा स्थानिक शेतकऱ्यांकडूनही आवक चांगली असल्याने ऐन हंगामात दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात २० ते ४० रुपयांपर्यंत दर आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने लिंबूची मागणीही वाढली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू मिळत असून डाळींब सोडले तर सर्वच फळे शंभर रुपये किलोच्या आत मिळत आहेत.मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. सध्या आवक सुरू असली तरी यंदा थोडा उशिराच नियमित आवक सुरू होईल. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याचा दर तेजीत आहे. सरासरी तीन हजार रुपये पेटी तर साडेसातशे रुपये बॉक्सचा दर आहे.

साखरेच्या माळांनी बाजार फुललेयेत्या रविवारी गुढी पाडवा असल्याने बाजारात साखरेच्या माळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. रंगीबेरंगी माळांनी दुकाने फुलली आहेत.

ब्याडगी यंदा झटका देणारयंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने अपेक्षित आवक नाही. परिणामी सध्या बाजारात दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ब्याडगी १६० तर जवारी १४० रुपये किलो दर राहिल्याने यंदा ग्राहकांना मिरची झटका देणार हे नक्की आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार