शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोल्हापूर : घाऊक बाजारात साखरेची घसरण,  डाळींचे दरही कमी : कलिंगडे, द्राक्षांची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 10:43 IST

ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देघाऊक बाजारात साखरेची घसरणडाळींचे दरही कमी : डाळींचे दरही कमी कलिंगडे, द्राक्षांची आवक वाढली

कोल्हापूर : ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर घाऊक बाजारात साखरेच्या दरात घसरण झाली आहे. तूरडाळ, हरभरा डाळीचे दर प्रतिकिलो दोन रुपयांनी कमी झाले असून फळ मार्केटमध्ये मात्र कलिंगडे व द्राक्षांची आवकेत वाढ झाली आहे.साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा मार्केटमध्ये सुरुवातीपासूनच साखरेच्या दरात घसरण राहिली. मध्यंतरी दरात थोडी सुधारणा झाली होती; पण आता घाऊक बाजारात साखर ३२ ते ३३ रुपये किलोपर्यंत आहे. अद्याप किरकोळ बाजारातील दर मात्र अद्याप कमी झालेले नाहीत.

पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी वाढली असली तरी दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. गेल्या आठवड्यात तूरडाळ व हरभराडाळीच्या दरात थोडी वाढ झाली होती. या आठवड्यात किलोमागे दोन रुपयांची घट झाली आहे.भाजीपाल्याची स्थानिक आवकही चांगली असल्याने दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. टोमॅटो दहा रुपये किलो तर वांगी, दोडका, ओला वाटाणा, कारली ४० रुपये किलो दर आहे. मेथी, पोकळ्याची पेंढी पाच रुपये तर कोथंबीरचे दर स्थिर आहेत. काकडीची आवकही वाढली असून कोवळी काकडी ६० रुपये किलो. फळ मार्केटमध्ये सध्या कलिंगडे, द्राक्षांची आवक जोरात आहे.

तमिळनाडू येथून हिरव्या पाटीच्या कलिंगडेची आवक सुरू आहे. त्याचबरोबर यंदा स्थानिक शेतकऱ्यांकडूनही आवक चांगली असल्याने ऐन हंगामात दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात २० ते ४० रुपयांपर्यंत दर आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने लिंबूची मागणीही वाढली आहे. दहा रुपयांना पाच लिंबू मिळत असून डाळींब सोडले तर सर्वच फळे शंभर रुपये किलोच्या आत मिळत आहेत.मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. सध्या आवक सुरू असली तरी यंदा थोडा उशिराच नियमित आवक सुरू होईल. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याचा दर तेजीत आहे. सरासरी तीन हजार रुपये पेटी तर साडेसातशे रुपये बॉक्सचा दर आहे.

साखरेच्या माळांनी बाजार फुललेयेत्या रविवारी गुढी पाडवा असल्याने बाजारात साखरेच्या माळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. रंगीबेरंगी माळांनी दुकाने फुलली आहेत.

ब्याडगी यंदा झटका देणारयंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने अपेक्षित आवक नाही. परिणामी सध्या बाजारात दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ब्याडगी १६० तर जवारी १४० रुपये किलो दर राहिल्याने यंदा ग्राहकांना मिरची झटका देणार हे नक्की आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार