शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:55 IST

जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी  येथे केले.

ठळक मुद्देजबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणपूरक संशोधनावर भर द्यावा : ल्यू ख्रिस्तोफरशिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदेचा प्रारंभ

कोल्हापूर : जीवन सुखकर करण्यासाठी आपण जे संशोधन करीत आलो आहोत; त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. असेच होत राहिले, तर मानवाचे अस्तित्व धोक्यात आल्याखेरीज राहणार नाही; त्यामुळे संशोधकांनीच आता ती जबाबदारी उचलून पर्यावरणपूरक संशोधनावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन कॅनडाच्या लेकहेड विद्यापीठातील प्रा. ल्यू ख्रिस्तोफर यांनी  येथे केले.शिवाजी विद्यापीठातील ‘मटेरिअल्स व एन्व्हायर्नमेंट सायन्सेस’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अ

ध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र, संगणकशास्त्र आणि युसिक विभाग, श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय (सोळांकूर), न्यू कॉलेज (कोल्हापूर) यांच्यातर्फे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

प्रा. ख्रिस्तोफर म्हणाले, मानवी अस्तित्वासाठी पर्यावरणपूरक संशोधन करणे ही जागतिक संशोधन समुदायासमोरची प्राथमिकता असायला हवी. आंतरविद्याशाखीय, बहुशाखीय संशोधन होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विज्ञानाच्या सर्वच शाखांमधील संशोधकांनी एकत्र येऊन विचारमंथन करणे आवश्यक आहे.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सोळांकूर महाविद्यालयाचे संस्थापक ए. वाय. पाटील, अध्यक्ष आर. वाय. पाटील, विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, सोळांकूरचे प्राचार्य डॉ. जी. जी. चौगुले, डॉ. आर. बी. पाटील, उपस्थित होते. डॉ. आर. के. कामत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आभार मानले. या परिषदेत कॅनडासह आॅस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, तैवान, श्रीलंका, सौदी अरेबिया, आदी देशांतील संशोधक सहभागी आहेत.धोरण ठरवून संशोधन व्हावेप्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, संशोधकांनी सुरक्षित, स्वस्त, वापरण्यास सुलभ अशा प्रकारचे तंत्रज्ञान, उत्पादने निर्माण करण्याचे धोरण ठरवून त्या दिशेने संशोधन करण्याची आज गरज आहे.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर