शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:45 IST

समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देवैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर शहाजी महाविद्यालयातील आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' विषयावर चर्चासत्र

कोल्हापूर : समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.शहाजी महाविद्यालयातील या कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे मानद सचिव विजयराव बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ काटकर होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची ताकत वैचारिक साहित्यामध्ये आहे. आजच्या काळात वैचारिक साहित्य महत्वपूर्ण आहे. ते दुर्लक्षित होत आहे. डॉ. शिंदे म्हणाले, त्या-त्या काळाशी आणि सामाजिक प्रश्नांशी संबंधीत वैचारिक साहित्य असते. मराठी साहित्यातील कविता, गद्य, कादंबरी, नाटके यांच्याशी वैचारिक साहित्य संबंधीत होते.

आज व्हॉटस्अ‍ॅप, व्टिटर, फेसबुक आणि विविध माध्यमातून साहित्य निर्माण होत आहे. यास वैचारिक साहित्य म्हणावे का, हा प्रश्न पडतो. चांगल्या व निकोप समाज निमिर्तीसाठी वैचारिक साहित्याची आज नितांत गरज आहे.

प्रभारी प्राचार्य काटकर म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात प्रा. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. दीपककुमार वळवी यांनी स्वागत केले. विजय देठे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महादेव जाधव यांनी आभार मानले.

विचारवंतांचे मार्गदर्शनउदघाटनानंतरच्या ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची गरज’ या विषयावर डॉ. ज. रा. दाभोळे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग पाटील होते. दुसऱ्या सत्रात डॉ. जयदेव डोळे यांचे ‘वृत्तपत्रातून गायब होत चाललेले वैचारिक गद्य' या विषयावर व्याख्यान झाले.

शिवाजी विद्यापीठाचे ओएसडी प्राचार्य डॉ. डी आर. मोरे अध्यक्षस्थानी होते. तिसऱ्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांचे ‘समकालीन मराठी वैचारिक लेखनातील गारठा’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कुंभार होते. चौथ्या सत्रात साठहून अधिक संशोधकानी शोधनिबंधाचे वाचन केले. पाचव्या सत्रात डॉ.अरूण शिंदे यांचे व्याख्यान झाले.

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर