शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

कोल्हापूर : वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर; शहाजी महाविद्यालयातील चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:45 IST

समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देवैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती : अशोक चौसाळकर शहाजी महाविद्यालयातील आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' विषयावर चर्चासत्र

कोल्हापूर : समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघातर्फे आयोजित ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची प्रस्तुतता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.शहाजी महाविद्यालयातील या कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे मानद सचिव विजयराव बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा.रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ काटकर होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याची ताकत वैचारिक साहित्यामध्ये आहे. आजच्या काळात वैचारिक साहित्य महत्वपूर्ण आहे. ते दुर्लक्षित होत आहे. डॉ. शिंदे म्हणाले, त्या-त्या काळाशी आणि सामाजिक प्रश्नांशी संबंधीत वैचारिक साहित्य असते. मराठी साहित्यातील कविता, गद्य, कादंबरी, नाटके यांच्याशी वैचारिक साहित्य संबंधीत होते.

आज व्हॉटस्अ‍ॅप, व्टिटर, फेसबुक आणि विविध माध्यमातून साहित्य निर्माण होत आहे. यास वैचारिक साहित्य म्हणावे का, हा प्रश्न पडतो. चांगल्या व निकोप समाज निमिर्तीसाठी वैचारिक साहित्याची आज नितांत गरज आहे.

प्रभारी प्राचार्य काटकर म्हणाले, समाजाच्या जडणघडणीत साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात प्रा. राजेखान शानेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. दीपककुमार वळवी यांनी स्वागत केले. विजय देठे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महादेव जाधव यांनी आभार मानले.

विचारवंतांचे मार्गदर्शनउदघाटनानंतरच्या ‘आजच्या संदर्भात वैचारिक साहित्याची गरज’ या विषयावर डॉ. ज. रा. दाभोळे यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग पाटील होते. दुसऱ्या सत्रात डॉ. जयदेव डोळे यांचे ‘वृत्तपत्रातून गायब होत चाललेले वैचारिक गद्य' या विषयावर व्याख्यान झाले.

शिवाजी विद्यापीठाचे ओएसडी प्राचार्य डॉ. डी आर. मोरे अध्यक्षस्थानी होते. तिसऱ्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांचे ‘समकालीन मराठी वैचारिक लेखनातील गारठा’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कुंभार होते. चौथ्या सत्रात साठहून अधिक संशोधकानी शोधनिबंधाचे वाचन केले. पाचव्या सत्रात डॉ.अरूण शिंदे यांचे व्याख्यान झाले.

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूर