शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २७ ला कोल्हापूर बंद : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST

कोल्हापूर : शेतकरीविरोधी तीन शेती कायदे रद्द करावेत. वीज विधेयक मागे घ्यावे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के ...

कोल्हापूर : शेतकरीविरोधी तीन शेती कायदे रद्द करावेत. वीज विधेयक मागे घ्यावे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के इतक्या रकमेचा हमीभाव देणारा केंद्रीय कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी २७ सप्टेंबरला कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय गुरुवारी येथे झाला. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय माजी आमदार संपतराव पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. निमंत्रक पवार व नामदेव गावडे यांच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती.

निमंत्रक गावडे म्हणाले, मोदी सरकारने आपले जनताद्रोही धोरण पुढे चालू ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस याचे दर रोज वाढवत सामान्य जनतेला जगणे महाग करून टाकले आहे. शेतकरीदेखील देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे ८ डिसेंबरप्रमाणेच हादेखील बंद कोल्हापुरात आपण कडक हरताळ पाळून यशस्वी करूया.

संपतराव पवार म्हणाले, कोल्हापूर बंदचे आंदोलन हे जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, तसेच कोल्हापूर शहरामध्ये व्यापक पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागवार मेळावे, व्यापाऱ्यांच्या बैठका, वाहतूकदारांच्या बैठका, तसेच सर्व दुकानदारांबरोबर संवाद साधूया. त्यांना आपली भूमिका पटवून देऊन शेतकरी जगला तरच देशाची उन्नती होऊ शकते हे पटवून देऊया. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खरोखर पाठिंबा द्यायचा असेल, तर सर्व व्यवहार बंद ठेवण्याची विनंती करूया.

भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले की, कोल्हापुरात त्या दिवशी सकाळी ११ वाजता बिंदू चौकात जमून मोटारसायकल रॅली काढून सर्व व्यापारी बंधूंना आणि कामगारांना या भारत बंदमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करू.

या बैठकीस प्रा. जालंदर पाटील, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, वसंतराव पाटील, रवी जाधव, अशोक जाधव, बाबूराव कदम, उदय नारकर, संभाजी जगदाळे, बाळू राऊ पाटील, वाय.एन. पाटील, अतुल दिघे, शाहीर सदाशिव निकम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावे बंद करणार

सर्व गावांतील व तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील व्यवहार बंद करून नंतर मग कोल्हापूर शहरातील बंदमध्ये सहभागी होण्यासाठी बिंदू चौकात जमण्याचे ठरले.

राष्ट्रवादीचाही पाठिंबा...

देशाच्या शेतकरीविरोधी नीतीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या २७ तारखेच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते आर.के. पोवार यांनी ही माहिती दिली.