शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:06 IST

बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देमहादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावाहसन मुश्रीफ यांची माहिती, स्टॅम्पचे दीड लाख रुपये भरले

कोल्हापूर : बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याबाबत विरोध करण्याची भूमिका मुश्रीफ यांनी घेतल्यानंतर महाडिक यांनी २६ सप्टेंबर रोजी मुश्रीफ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. दुसऱ्याच दिवशी मुश्रीफ यांनी या आरोपांचे खंडनही केले होते. तसेच अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता.याबाबत मुश्रीफ म्हणाले, मी महाडिक यांनी आरोप केल्यानंतर एक महिना ते खुलासा करतील म्हणून वाट पाहिली; परंतु त्यांनी तो न केल्याने मी जिल्हा न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये असे आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र अशा पद्धतीने महाडिक यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले.

वास्तविक त्यांच्यासारख्या इतकी वर्षे राजकारणात काम करणाऱ्या माणसाने काय बोलावे, त्याचे पुरावे काय, आपण कशा पद्धतीची टीका करतो आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत याबाबत भान बाळगायला हवे होते.खुलासा करताना मुश्रीफ म्हणाले, यातील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा मी केला आहे. मात्र महाडिक यांना आता न्यायालयातच याबाबतचे पुरावे सादर करावे लागतील. जिल्हा बॅँकेत आपल्याला मानणारे संचालक आहेत आणि महिला संचालकही आहेत, याचे तरी भान महाडिक यांनी ठेवायला हवे होते.

महाडिक यांनी केले होते हे आरोप१. मुश्रीफ यांनी मुलाला एजंट बनवून कमाई केली.२. इब्राहिम या व्यक्तीला एटीएमचे टेंडर दिले.३. एटीएम ठेकेदाराकडूनच दुबई, हैदराबाद दौºयाचा खर्च केला गेला.४. दोन्ही दौºयांमध्ये बारमध्ये जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी धिंगाणा घातला.५. जिल्हा बॅँकेतून ११२ कोटी परत घालवून मुश्रीफांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले.

आतापर्यंत मुश्रीफांनी दाखल केले ११ दावेआतापर्यंत आपण अबु्नुकसानीचे एकूण ११ दावे दाखल केले असल्याची माहिती यावेळी मुश्रीफ यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर,आमदार साटम, आमदार सदा सरवणकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गडान्नावर, राजपत्रित अधिकारी महासंघाचे कुलथे यांच्यावर हे दावे दाखल केले होते. मंडलिक यांचे निधन झाल्यामुळे आणि क्षीरसागर यांनी गैरसमजातून आरोप केल्याचे स्पष्ट केल्यामुळे या दोघांवरील दावे मागे घेतले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण