शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 13:06 IST

बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठळक मुद्देमहादेवराव महाडिक यांच्यावर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावाहसन मुश्रीफ यांची माहिती, स्टॅम्पचे दीड लाख रुपये भरले

कोल्हापूर : बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याबाबत विरोध करण्याची भूमिका मुश्रीफ यांनी घेतल्यानंतर महाडिक यांनी २६ सप्टेंबर रोजी मुश्रीफ यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. दुसऱ्याच दिवशी मुश्रीफ यांनी या आरोपांचे खंडनही केले होते. तसेच अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही दिला होता.याबाबत मुश्रीफ म्हणाले, मी महाडिक यांनी आरोप केल्यानंतर एक महिना ते खुलासा करतील म्हणून वाट पाहिली; परंतु त्यांनी तो न केल्याने मी जिल्हा न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये असे आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र अशा पद्धतीने महाडिक यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले.

वास्तविक त्यांच्यासारख्या इतकी वर्षे राजकारणात काम करणाऱ्या माणसाने काय बोलावे, त्याचे पुरावे काय, आपण कशा पद्धतीची टीका करतो आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत याबाबत भान बाळगायला हवे होते.खुलासा करताना मुश्रीफ म्हणाले, यातील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा मी केला आहे. मात्र महाडिक यांना आता न्यायालयातच याबाबतचे पुरावे सादर करावे लागतील. जिल्हा बॅँकेत आपल्याला मानणारे संचालक आहेत आणि महिला संचालकही आहेत, याचे तरी भान महाडिक यांनी ठेवायला हवे होते.

महाडिक यांनी केले होते हे आरोप१. मुश्रीफ यांनी मुलाला एजंट बनवून कमाई केली.२. इब्राहिम या व्यक्तीला एटीएमचे टेंडर दिले.३. एटीएम ठेकेदाराकडूनच दुबई, हैदराबाद दौºयाचा खर्च केला गेला.४. दोन्ही दौºयांमध्ये बारमध्ये जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी धिंगाणा घातला.५. जिल्हा बॅँकेतून ११२ कोटी परत घालवून मुश्रीफांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले.

आतापर्यंत मुश्रीफांनी दाखल केले ११ दावेआतापर्यंत आपण अबु्नुकसानीचे एकूण ११ दावे दाखल केले असल्याची माहिती यावेळी मुश्रीफ यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर,आमदार साटम, आमदार सदा सरवणकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गडान्नावर, राजपत्रित अधिकारी महासंघाचे कुलथे यांच्यावर हे दावे दाखल केले होते. मंडलिक यांचे निधन झाल्यामुळे आणि क्षीरसागर यांनी गैरसमजातून आरोप केल्याचे स्पष्ट केल्यामुळे या दोघांवरील दावे मागे घेतले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण