शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘सर्किट बेंच’चे आंदोलन तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:21 IST

कोल्हापूर : गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या संघटना मुंबई

ठळक मुद्देखंडपीठ कृती समितीचा निर्णय २४ नोव्हेंबरला सांगलीत रणनीती ठरणारमुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या तारखेच्या घोळात हा प्रश्न पुन्हा एकदा मागे पडला

कोल्हापूर : गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. राज्य सरकार आणि उच्च न्यायालय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. सहा जिल्ह्यांत रास्ता रोको, रेल्वे रोको आंदोलन उग्र करण्याचा निर्णय कºहाड व सातारा येथील खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. या आंदोलनाची रणनीती सांगली येथे शुक्रवारी (दि. २४) होणाºया कृती समितीच्या बैठकीत ठरणार आहे.

सहा जिल्ह्यांतील वकील गेली तीस वर्षे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी आंदोलन करत आहेत. वकिलांनी रॅली, उपोषण, ‘बेमुदत काम बंद’ आंदोलने केली. मंत्रिमंडळासोबत बैठका घेतल्या; परंतु आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून फक्त आश्वासनांचे गाजर दाखविले जात आहे. सर्किट बेंच मागणीच्या चर्चेबाबत तारीख निश्चित करण्यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांंच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत तारीख निश्चितपणे कळवू, असे आश्वासन प्रा. पाटील यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या तारखेच्या घोळात हा प्रश्न पुन्हा एकदा मागे पडला आहे. त्यामुळे खंडपीठ कृती समितीने पुन्हा संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली येथे बैठक झाल्यानंतर कºहाड व सातारा येथे बुधवारी खंडपीठ कृती समितीची बैठक झाली. यावेळी सर्किट बेंचचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. वकील आणि पक्षकार मिळून सहा जिल्ह्यांत रास्ता रोको, रेल्वे रोको आंदोलने उग्र करण्याचा निर्णय यावेळी झाला. ज्येष्ठ वकील अजित मोहिते, शिवाजीराव राणे, प्रशांत शिंदे, राजेंद्र चव्हाण, व्ही. आर. पाटील, (कोल्हापूर), धैर्यशील पाटील, दादा जगताप, ए. डी. जाधव, श्रीकांत केंदळे, वैभव काटकर (सातारा) आदींनी मनोगते व्यक्त केली.सर्किट बेंचचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत न थांबण्याचा निर्धारजिल्ह्यात रास्ता रोको, रेल्वे रोको आंदोलन करुन पुन्हा या प्रश्नी रान उठविणार

टॅग्स :Courtन्यायालयStrikeसंप