शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात कडधान्य मार्केट स्थिर, फळ मार्केट तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:58 IST

मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असून भाव मात्र तेजीत दिसत आहेत.

ठळक मुद्देआवक मंदावल्याने दरावर परिणाम , भाजीपाला, कांदा कडाडलागुऱ्हाळघरांची धुराडे आता पेटू लागली, गुळाची आवक वाढलीविविध भाज्यांची पाचशे क्विंटलने आवक मंदावली

कोल्हापूर : मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असून भाव मात्र तेजीत दिसत आहेत.

परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्याने खरीप पिकांचे नुकसान झालेच पण त्याबरोबर भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर दिसून येत असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात विविध भाज्यांची पाचशे क्विंटलने आवक मंदावली आहे.

आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली असून घाऊक बाजारात गतआठवड्यात १७ रुपये किलो असणारा कोबी आता तब्बल ४२ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात वांगी ऐंशी रुपये किलो तर वरणा, गवार, कारली, भेंडी, दोडक्याचे दर चांगलेच भडकले आहेत. पालेभाज्यांची आवकही कमी झाली असून किरकोळ बाजारात मेथी वीस रुपये पेंढी तर पोकळा, पालक, शेपू दहा रुपये पेंढी दर राहिला आहे.

दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम थंड दिसत आहे. तूरडाळ, हरभराडाळ, मूग, मसूर डाळीचे दर स्थिर आहे. सरकी तेल, शेंगतेल, खोबरेल तेलाच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. पोहे, साखर, शेंगदाणाचे दर स्थिर आहेत. परतीच्या पावसाचा झटका कांदा उत्पादकांनाही बसला असून आवक कमी झाली आहे.

गत आठवड्यापेक्षा बाजारसमितीत दोन हजार क्विंटलने कांद्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम थेट दरावर झाला असून घाऊक बाजारात किलोमागे सरासरी १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळीशी ओलांडली आहे.

बटाटा, लसणाच्या आवक व दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळींब, चिक्कूची आवक चांगली आहे. सफरचंद ऐंशी रुपये किलो तर चिक्कू तीस रुपयांपासून दर आहे.

गुळाची आवक वाढलीपाऊस कमी झाला आणि दिवाळी संपल्याने गुऱ्हाळघरांची धुराडे आता पेटू लागली आहेत. त्यामुळे बाजार समितीत गुळाची आवक वाढली असली तरी दरात फारसा फरक दिसत नाही.

 

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या