शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कोल्हापुरात कडधान्य मार्केट स्थिर, फळ मार्केट तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:58 IST

मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असून भाव मात्र तेजीत दिसत आहेत.

ठळक मुद्देआवक मंदावल्याने दरावर परिणाम , भाजीपाला, कांदा कडाडलागुऱ्हाळघरांची धुराडे आता पेटू लागली, गुळाची आवक वाढलीविविध भाज्यांची पाचशे क्विंटलने आवक मंदावली

कोल्हापूर : मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असून भाव मात्र तेजीत दिसत आहेत.

परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्याने खरीप पिकांचे नुकसान झालेच पण त्याबरोबर भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर दिसून येत असून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज होणाऱ्या भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात विविध भाज्यांची पाचशे क्विंटलने आवक मंदावली आहे.

आवक कमी झाल्याने दरात कमालीची वाढ झाली असून घाऊक बाजारात गतआठवड्यात १७ रुपये किलो असणारा कोबी आता तब्बल ४२ रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात वांगी ऐंशी रुपये किलो तर वरणा, गवार, कारली, भेंडी, दोडक्याचे दर चांगलेच भडकले आहेत. पालेभाज्यांची आवकही कमी झाली असून किरकोळ बाजारात मेथी वीस रुपये पेंढी तर पोकळा, पालक, शेपू दहा रुपये पेंढी दर राहिला आहे.

दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम थंड दिसत आहे. तूरडाळ, हरभराडाळ, मूग, मसूर डाळीचे दर स्थिर आहे. सरकी तेल, शेंगतेल, खोबरेल तेलाच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. पोहे, साखर, शेंगदाणाचे दर स्थिर आहेत. परतीच्या पावसाचा झटका कांदा उत्पादकांनाही बसला असून आवक कमी झाली आहे.

गत आठवड्यापेक्षा बाजारसमितीत दोन हजार क्विंटलने कांद्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम थेट दरावर झाला असून घाऊक बाजारात किलोमागे सरासरी १५ रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळीशी ओलांडली आहे.

बटाटा, लसणाच्या आवक व दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फळ मार्केटमध्ये सफरचंद, मोसंबी, संत्री, डाळींब, चिक्कूची आवक चांगली आहे. सफरचंद ऐंशी रुपये किलो तर चिक्कू तीस रुपयांपासून दर आहे.

गुळाची आवक वाढलीपाऊस कमी झाला आणि दिवाळी संपल्याने गुऱ्हाळघरांची धुराडे आता पेटू लागली आहेत. त्यामुळे बाजार समितीत गुळाची आवक वाढली असली तरी दरात फारसा फरक दिसत नाही.

 

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या