शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे विक्रम तोडले : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 10:19 IST

गेली पाच वर्षे पारदर्शी पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे सर्व विक्रम तोडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे विक्रम तोडले : फडणवीसकोल्हापुरात जल्लोषी वातावरणात स्वागत

कोल्हापूर : गेली पाच वर्षे पारदर्शी पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरने विकासाचे सर्व विक्रम तोडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ताराराणी चौकामध्ये भाजपच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, राज्य उपाध्यक्ष धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, बाबा देसाई त्यांच्यासमवेत होते. यावेळी शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांनाही फडणवीस यांनी भाषणात अभिवादन केले.फडणवीस म्हणाले, कोल्हापुरातील या भव्य स्वागताबद्दल आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली ५ वर्षे आम्ही काम केले आहे. हे पहिले सरकार आहे, हा पहिला मुख्यमंत्री आहे जो पाच वर्षे काम केल्यानंतर जनतेच्या दारात जाऊन केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहे.यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, सुनील कदम, अशोक देसाई, नगरसेवक, नगरसेविका, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.धनंजय, अमल, महेश, समरजित यांच्यावर विश्वास आहे का?फडणवीस यांनी आपल्या सातच मिनिटांच्या भाषणामध्ये तुमचा नरेंद्र मोदींवर, माझ्यावर, चंद्रकांतदादांवर विश्वास आहे का, अशी सुरूवातीलाच विचारणा केली तेव्हा ‘होय, होय’ असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘अमलवर विश्वास आहे का, महेशवर विश्वास आहे का, धनंजयवर विश्वास आहे का’ अशी विचारणा केली तेव्हाही तसाच प्रतिसाद मिळाला.

याचवेळी समरजित घाटगे त्यांच्या पाठीमागे येऊन उभे होते. हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते. तेव्हा कार्यकर्त्यांनी समरजित यांचे नाव घेण्याचा आग्रह केला तेव्हा ते आलेत मला माहिती नव्हते, असे सांगत, ‘तुमचा समरजित घाटगे यांच्यावर विश्वास आहे का,’ अशी विचारणा केली आणि कार्यकर्त्यांनी ‘होय, होय’चा प्रतिसाद दिला.ताराराणी चौक उजळलामुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठे दिवे लावण्यात आले होते. लेसरवर भाजपचे कमळ चिन्ह दाखविण्यात येत होते. विविध स्क्रीनवर भाजप सरकारच्या कामगिरीची चित्रफीत दाखविण्यात येत होती. ताशांचा कडकडाट आणि आतषबाजीमध्ये फडणवीसांच्या विजयाच्या घोषणा देत स्वागत करण्यात आले. भाजपच्या सर्व नगरसेविका आणि पदाधिकारी भगव्या साड्या परिधान करून उपस्थित होत्या.

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राkolhapurकोल्हापूर