शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

कोल्हापूर : कर्णाला न्याय देण्यासाठी ‘मृत्युंजय’ची निर्मिती, सागर देशपांडे यांनी सांगितली जन्मकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:27 IST

शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत सोमवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देकरवीर नगर वाचन मंदिरची वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमाला‘मृत्युंजय’चा सुवर्णमहोत्सव’ विषयावर डॉ. देशपांडे यांनी केली मांडणी वयाच्या २३ व्या वर्षी कादंबरी लिहायला घेतली, २७ व्या वर्षी प्रकाशित

कोल्हापूर : शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत सोमवारी ते बोलत होते.

‘मृत्युंजय’चा सुवर्णमहोत्सव’ या विषयावर मांडणी करताना डॉ. देशपांडे यांनी या कादंबरीची जन्मकथा सांगून त्यामध्ये असलेल्या कोल्हापूरकरांच्या अपूर्व अशा योगदानाचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. वाचन मंदिराचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे अध्यक्षस्थानी होते.डॉ. देशपांडे म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेल्या शिवाजी सावंत यांनी येथील पापाच्या तिकटीवर हावळ टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर न्यायालयात नोकरी केली, परंतु कर्णावरील अभ्यासासाठी त्यांनी ती नोकरी सोडून राजाराम हायस्कूलमध्ये शॉर्टहॅण्डचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. जवळच असणाऱ्या करवीर नगर वाचन मंदिरामध्ये तासन्तास बसून त्यांनी ‘महाभारता’वरील अनेक ग्रंथ वाचून काढले.केदारनाथ मिश्र यांच्या कर्णावरील खंडकाव्याने प्रभावित होऊन सावंत यांनी एकीकडे सर्व प्रकारची टिपणे काढतानाच थेट कुरूक्षेत्राला भेट दिली आणि वयाच्या २३ व्या वर्षी ही कादंबरी लिहायला घेतली. २७ व्या वर्षी ती प्रकाशित झाली आणि आजही ५० वर्षे झाली तरी ही कादंबरी अजूनही सर्व वयोगटातील वाचकांना भावते हे या कादंबरीचे यश आहे, असे डॉ. देशपांडे म्हणाले.‘कनवा’चे संचालक डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर कोषाध्यक्ष डॉ. आशुतोेष देशपांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संचालक गुरूदत्त म्हाडगुत यांनी आभार मानले. गंथपाल मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा मेघा जोशी, सुरेश सोनटक्के, रवींद्र जोशी, रजनी हिरळीकर, अशोक भोईटे, राजीव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ग. दि. माडगूळकरांसह कुलकर्णींचे योगदानइतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘मृत्युंजय’ छापण्यासाठी कुणीही तयार नसताना सावंत यांचे मित्र आर. के. कुलकर्णी यांनी ते बाड ग. दि. माडगूळकर यांना वाचावयास दिले. माडगूळकर यांनी ते कॉन्टिनेन्टलच्या अनंतराव कुलकर्णींकडे सोपविले. ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यामुळे या कादंबरीच्या निर्मितीमध्ये या दोन कुलकर्णींचे मोठे योगदान आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य