शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-विजापूर प्रस्तावित रस्त्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: November 14, 2016 21:41 IST

चारशे एकर शेती धोक्यात : विरोधासाठी गावागावांत बैठका सुरू

हुपरी : प्रस्तावित असणारा कोल्हापूर ते विजापूर हा राज्य महामार्ग हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, रांगोळी परिसरातील गावांतून जाणार आहे. नियोजित रस्त्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची जवळपास चारशे एकर बागायती शेती जाणार असल्यामुळे सर्वच शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रस्त्याच्या या प्रस्तावित कामासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जाणार असल्याने अल्पभूधारक रस्त्यावर येणार आहेत. शासनाच्या या प्रस्तावित कामाला तीव्र स्वरूपाचा विरोध करण्यासाठी शेतकरी आता संघटित होत असून, तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत बैठका होत आहेत. पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी व परिसरातील गावांतून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. या रस्त्याच्या कामात या भागातील बागायती शेती तसेच रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, अल्पभूधारक शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान होणार आहे. प्रस्तावित रस्ता शेतीतून गेल्याने शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण होणार आहे.विकासासाठी रस्ते प्रकल्प महत्त्वाचे असले तरी नागरिकांच्या हितासाठीही शासनाने योग्य पद्धतीची उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. हुपरी परिसरातून हा रस्ता जाणार असल्यामुळे चारशेहून अधिक एकर बागायती शेती, घरे, विहिरी, कूपनलिका त्यात जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित आराखड्यानुसार हुपरी, तळंदगे, इंगळी या गावच्या शेतीतून १०० फुटी रस्ते बांधण्यात येणार आहेत, तर तळंदगे रस्ता गिरी मळा ते औद्योगिक वसाहत भागात रस्ते, उपरस्ते यात धरले गेले आहेत. या आराखड्यामध्ये काही रस्ते अनावश्यक धरले गेले असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी या प्रस्तावास हरकत घेणार असल्याचे समजते. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, पैसाफंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे, कार्यकारी संचालक सदाशिवराव नाईक, अभय शास्त्री, संजय पाटील, जयसिंगराव देसाई, बाळासाहेब गाठ, बाहुबली गाठ यांच्यासह शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यासाठी विविध भागात बैठका घेऊन प्रस्तावित रस्त्याची रूपरेषा व त्यामुळे होणारे नुकसान हे शेतकऱ्यांना पटवून सांगत आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीत शासनाच्या या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला संघटित होऊन पूर्ण ताकदीने विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येत आहे.