शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोल्हापूर-विजापूर प्रस्तावित रस्त्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: November 14, 2016 21:41 IST

चारशे एकर शेती धोक्यात : विरोधासाठी गावागावांत बैठका सुरू

हुपरी : प्रस्तावित असणारा कोल्हापूर ते विजापूर हा राज्य महामार्ग हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, रांगोळी परिसरातील गावांतून जाणार आहे. नियोजित रस्त्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची जवळपास चारशे एकर बागायती शेती जाणार असल्यामुळे सर्वच शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रस्त्याच्या या प्रस्तावित कामासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जाणार असल्याने अल्पभूधारक रस्त्यावर येणार आहेत. शासनाच्या या प्रस्तावित कामाला तीव्र स्वरूपाचा विरोध करण्यासाठी शेतकरी आता संघटित होत असून, तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत बैठका होत आहेत. पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी व परिसरातील गावांतून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. या रस्त्याच्या कामात या भागातील बागायती शेती तसेच रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, अल्पभूधारक शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान होणार आहे. प्रस्तावित रस्ता शेतीतून गेल्याने शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण होणार आहे.विकासासाठी रस्ते प्रकल्प महत्त्वाचे असले तरी नागरिकांच्या हितासाठीही शासनाने योग्य पद्धतीची उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. हुपरी परिसरातून हा रस्ता जाणार असल्यामुळे चारशेहून अधिक एकर बागायती शेती, घरे, विहिरी, कूपनलिका त्यात जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित आराखड्यानुसार हुपरी, तळंदगे, इंगळी या गावच्या शेतीतून १०० फुटी रस्ते बांधण्यात येणार आहेत, तर तळंदगे रस्ता गिरी मळा ते औद्योगिक वसाहत भागात रस्ते, उपरस्ते यात धरले गेले आहेत. या आराखड्यामध्ये काही रस्ते अनावश्यक धरले गेले असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी या प्रस्तावास हरकत घेणार असल्याचे समजते. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, पैसाफंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे, कार्यकारी संचालक सदाशिवराव नाईक, अभय शास्त्री, संजय पाटील, जयसिंगराव देसाई, बाळासाहेब गाठ, बाहुबली गाठ यांच्यासह शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यासाठी विविध भागात बैठका घेऊन प्रस्तावित रस्त्याची रूपरेषा व त्यामुळे होणारे नुकसान हे शेतकऱ्यांना पटवून सांगत आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीत शासनाच्या या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला संघटित होऊन पूर्ण ताकदीने विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येत आहे.