शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

कोल्हापूर-विजापूर प्रस्तावित रस्त्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: November 14, 2016 21:41 IST

चारशे एकर शेती धोक्यात : विरोधासाठी गावागावांत बैठका सुरू

हुपरी : प्रस्तावित असणारा कोल्हापूर ते विजापूर हा राज्य महामार्ग हुपरी, रेंदाळ, पट्टणकोडोली, रांगोळी परिसरातील गावांतून जाणार आहे. नियोजित रस्त्यासाठी या भागातील शेतकऱ्यांची जवळपास चारशे एकर बागायती शेती जाणार असल्यामुळे सर्वच शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रस्त्याच्या या प्रस्तावित कामासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जाणार असल्याने अल्पभूधारक रस्त्यावर येणार आहेत. शासनाच्या या प्रस्तावित कामाला तीव्र स्वरूपाचा विरोध करण्यासाठी शेतकरी आता संघटित होत असून, तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांच्या नेतृत्वाखाली गावागावांत बैठका होत आहेत. पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी व परिसरातील गावांतून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. या रस्त्याच्या कामात या भागातील बागायती शेती तसेच रहिवासी विभाग मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून, अल्पभूधारक शेतकरी वर्गाचे अपरिमित नुकसान होणार आहे. प्रस्तावित रस्ता शेतीतून गेल्याने शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण होणार आहे.विकासासाठी रस्ते प्रकल्प महत्त्वाचे असले तरी नागरिकांच्या हितासाठीही शासनाने योग्य पद्धतीची उपाययोजना करणेही महत्त्वाचे आहे. हुपरी परिसरातून हा रस्ता जाणार असल्यामुळे चारशेहून अधिक एकर बागायती शेती, घरे, विहिरी, कूपनलिका त्यात जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित आराखड्यानुसार हुपरी, तळंदगे, इंगळी या गावच्या शेतीतून १०० फुटी रस्ते बांधण्यात येणार आहेत, तर तळंदगे रस्ता गिरी मळा ते औद्योगिक वसाहत भागात रस्ते, उपरस्ते यात धरले गेले आहेत. या आराखड्यामध्ये काही रस्ते अनावश्यक धरले गेले असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी या प्रस्तावास हरकत घेणार असल्याचे समजते. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, पैसाफंड बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे, कार्यकारी संचालक सदाशिवराव नाईक, अभय शास्त्री, संजय पाटील, जयसिंगराव देसाई, बाळासाहेब गाठ, बाहुबली गाठ यांच्यासह शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. यासाठी विविध भागात बैठका घेऊन प्रस्तावित रस्त्याची रूपरेषा व त्यामुळे होणारे नुकसान हे शेतकऱ्यांना पटवून सांगत आहेत. या संदर्भात झालेल्या बैठकीत शासनाच्या या प्रस्तावित रस्त्यांच्या कामाला संघटित होऊन पूर्ण ताकदीने विरोध करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येत आहे.