शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कोल्हापूर : पाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 14:25 IST

पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले.

ठळक मुद्देपाया न लागल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा थांबवले कॉलमचे डिझाईन बदलणार; बुधवारी तज्ज्ञांकडून पाहणी

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या कॉलमच्या पायासाठी साडेचार मीटर खोल अंतरापर्यंत कठीण दगड लागण्याची शक्यता असताना सुमारे नऊ मीटर खुदाई करूनही पाया न लागल्याने हतबल झालेल्या यंत्रणेने सोमवारी दुपारनंतर खुदाईचे काम थांबविले.

पाया न लागल्याने आता कॉलमचे डिझाईन बदलावे लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार शासनाच्या मुंबईतील संकल्प चित्र मंडळाकडे आहेत. या मंडळाकडून जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत हे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी आता पुन्हा पावसाळ्यानंतरच प्रतीक्षा करावी लागणार आहे.पर्यायी शिवाजी पुलाच्या कामांमध्ये वारंवार अडचणींचा डोंगर उभारत आहे. ‘पुरातत्त्व’चा परवाना मिळाल्यानंतरही या पुलामागील अडथळ्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दि. ४ जूनला दिल्लीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणातील मंजुरीनंतर हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर दि. ७ जूनला हे काम प्रत्यक्षात सुरू झाले.

यावेळी कॉलमसाठी जमिनीपासून किमान साडेचार मीटर अंतरावर कठीण दगड लागण्याची अपेक्षा होती. त्यादृष्टीने निविदेत खर्चाची तरतूद केली; पण गेल्या सहा दिवसांत पोकलॅन मशीनने सुमारे नऊ मीटर खोलवर खुदाई करूनही पायासाठी अपेक्षित खडक न लागल्याने ठेकेदार नाराज झाले; पण पाया न लागल्याने सोमवारी दुपारी हे काम थांबविले.

खुदाई केलेल्या जागेचे मोजमाप करण्यात आले, यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत अबदार, ठेकेदार एन. डी. लाड, आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)​​​​​​​आता कॉलमचे डिझाईन बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे सर्व अधिकार हे अधीक्षक अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे शासनाच्या मुंबईतील संकल्प चित्र मंडळातील डिझाईन सर्कलकडून या कॉलमचे हेवी डिझायन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंडळाकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खुदाईत विहीर?पुलाच्या कॉलमचा पाया निश्चित केलेल्या जागेत सुमारे नऊ मीटरपर्यंत खुदाई करताना त्या जागेत फक्त मातीच मिळाल्याने यापूर्वी जुन्या शिवाजी पुलाचे बांधकाम करतेवेळी पाण्याच्या आवश्यकतेसाठी येथे तात्पुरती विहीर निर्माण केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गोलाकार खुदाईच्या जागेचा साडेतीन मीटरचा परिघ असून सुमारे १८ फूट खोल आहे. वरील गोलाकार बाजू रूंद तर तळाचा भाग निमुळता असल्याचे खुदाईवेळी दिसून आले.खर्चाचे बजेट वाढणारपर्यायी शिवाजी पुलाच्या खर्चाचे बजेट नेहमीच वाढत आहे. कधी ९, कधी १५ तर कधी १२ कोटींपर्यंत या खर्चाच्या निविदा निघत गेल्या. पुलाचे ८० टक्के सुमारे साडेनऊ कोटींचे काम नवी मुंबईच्या बांका कन्स्ट्रक्शनने पूर्ण केल्यानंतर उर्वरित २० टक्के काम सुमारे ३ कोटी ०५ लाख रुपये खर्चाच्या निविदेतून गोव्याच्या आसमास कन्स्ट्रक्शनने घेतले.

आता पाया न लागल्यामुळे त्याच जागेत हेवी डिझायन नव्याने बनविणे अगर थोड्या अलीकडे जागेत नव्याने कॉलमसाठी पायाखुदाई करावी लागणार आहे. डिझाईनमध्ये फरक पडल्याने आता पुलाचे खर्चाचे बजेट पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी पुन्हा पाहणीमुंबईतील संकल्प चित्र मंडळाचे सर्कल डिझायनर पुलाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर पुढील चालना मिळणार आहे. 

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागMuncipal Corporationनगर पालिका