शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पीक नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:21 IST

गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्यात राहून कुजल्याने शेतकऱ्यांना याचा जोरात फटका बसला आहे. तरीही जिल्हा प्रशासन अजून पंचनामे सुरूच असल्याचे सांगत आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीतील पंचनामे अजून सुरूच : विभागीय आयुक्तांचेही कानांवर हातलवकरात लवकर शेतकºयांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज

प्रवीण देसाई-

कोल्हापूर : गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्यात राहून कुजल्याने शेतकऱ्यांना याचा जोरात फटका बसला आहे. तरीही जिल्हा प्रशासन अजून पंचनामे सुरूच असल्याचे सांगत आहे. यावरून नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी चांगलेच तिष्ठावे लागणार, हे स्पष्ट आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर हेही या संवेदनशील विषयाचा चेंडू जिल्हाधिकाºयांच्या कोर्टात ढकलून मोकळे झाले आहेत. यामुळे आधीच अतिवृष्टीने पेकाट मोडलेल्या शेतकºयाला जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणाचाही दणका बसत आहे.

यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. त्यातच गतमहिन्यात अतिवृष्टी होऊन पूरसदृशस्थिती पुन्हा ओढवली होती. तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील ऊस, भात अशी उभी पिके पाण्यात राहून अक्षरश: कुजली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आवाज उठवत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याला जवळपास महिना उलटला असला तरी जिल्हा प्रशासनाकडून पुढील कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसत आहे.

गुरुवारी जिल्हा दौºयावर आलेल्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना या महत्त्वाच्या प्रश्नावर विचारणा केली असता त्यांनीही हा विषय सहज घेत जिल्हाधिकाºयांकडे अंगुलिनिर्देश केला. जिल्हा प्रशासनही या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसत आहे; कारण महिना लोटला तरी त्यांचे पंचनाम्याचे काम अजून संपलेले नाही. ते अजून सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल गेलेला नसल्याने त्यांच्याकडून हेच उत्तर अपेक्षित आहे.

तरीही त्यांनी या महत्त्वाच्या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर शेतकºयांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनानेही पंचनाम्यासाठी जलद पावले उचलून त्याचा अहवाल तातडीने शासनाला पाठवायला पाहिजे; तरच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लालफितीच्या कारभाराबद्दल नेहमीच टीकेचा धनी असलेला महसूल विभाग याबाबत तरी संवेदनशीलता दाखविणार का, हे पाहावे लागणार आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार