शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोल्हापूर : पीक नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:21 IST

गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्यात राहून कुजल्याने शेतकऱ्यांना याचा जोरात फटका बसला आहे. तरीही जिल्हा प्रशासन अजून पंचनामे सुरूच असल्याचे सांगत आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टीतील पंचनामे अजून सुरूच : विभागीय आयुक्तांचेही कानांवर हातलवकरात लवकर शेतकºयांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज

प्रवीण देसाई-

कोल्हापूर : गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्यात राहून कुजल्याने शेतकऱ्यांना याचा जोरात फटका बसला आहे. तरीही जिल्हा प्रशासन अजून पंचनामे सुरूच असल्याचे सांगत आहे. यावरून नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी चांगलेच तिष्ठावे लागणार, हे स्पष्ट आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर हेही या संवेदनशील विषयाचा चेंडू जिल्हाधिकाºयांच्या कोर्टात ढकलून मोकळे झाले आहेत. यामुळे आधीच अतिवृष्टीने पेकाट मोडलेल्या शेतकºयाला जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणाचाही दणका बसत आहे.

यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. त्यातच गतमहिन्यात अतिवृष्टी होऊन पूरसदृशस्थिती पुन्हा ओढवली होती. तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील ऊस, भात अशी उभी पिके पाण्यात राहून अक्षरश: कुजली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आवाज उठवत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याला जवळपास महिना उलटला असला तरी जिल्हा प्रशासनाकडून पुढील कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसत आहे.

गुरुवारी जिल्हा दौºयावर आलेल्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना या महत्त्वाच्या प्रश्नावर विचारणा केली असता त्यांनीही हा विषय सहज घेत जिल्हाधिकाºयांकडे अंगुलिनिर्देश केला. जिल्हा प्रशासनही या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसत आहे; कारण महिना लोटला तरी त्यांचे पंचनाम्याचे काम अजून संपलेले नाही. ते अजून सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे याबाबतचा अहवाल गेलेला नसल्याने त्यांच्याकडून हेच उत्तर अपेक्षित आहे.

तरीही त्यांनी या महत्त्वाच्या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर शेतकºयांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनानेही पंचनाम्यासाठी जलद पावले उचलून त्याचा अहवाल तातडीने शासनाला पाठवायला पाहिजे; तरच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळून न्याय मिळू शकणार आहे. अन्यथा लालफितीच्या कारभाराबद्दल नेहमीच टीकेचा धनी असलेला महसूल विभाग याबाबत तरी संवेदनशीलता दाखविणार का, हे पाहावे लागणार आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार