शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोल्हापूरची केळी परदेशात

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

कुंभोजच्या शेतकऱ्यांचे उत्पादन : ‘संजीवनी अ‍ॅग्रो’च्या मदतीने रवाना, पहिल्यांदाच संधी

भोमगोंडा देसाई : कोल्हापूर :जिल्ह्यातील कुंभोज (ता. हातकणगंले) येथील अरविंद पाटील, अनिल नकाते यांच्या शेतातील २१ टन केळी संयुक्त दुबईला पाठविण्यात आली. त्या बाजारपेठेतून मागणी आल्यानंतर तमदलगे (ता. शिरोळ) येथील संजीवनी अ‍ॅग्रो संस्थेतर्फे ही केळी पाठविण्यात आली. कोल्हापुरी चप्पल आणि गुळानंतर आता येथील केळीही सातासमुद्रापार जात आहेत. जिल्ह्यात मुख्य व्यापारी पीक म्हणून उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि बाजारपेठेची हमी यांमुळे शेतकरी उसाला पहिली पसंती देतो. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळत नसल्यामुळे अलीकडे शेतकरी केळी पीक घेण्याकडे वळतो आहे. शासनाचा कृषी विभागही केळी पिकाच्या लागवडीपासून ते त्याला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे मदत करीत आहे. पिकविण्यापासून विकण्यापर्यंत वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक, खासगी भागीदारी योजनेंतर्गत संजीवनी अ‍ॅग्रो संस्थेची निवड फेब्रुवारी २०१४ मध्ये केली आहे. या संस्थेकडे केळी उत्पादन घेणारे साडेसातशे शेतकरी संबंधित आहेत. तालुकानिहाय शेतकऱ्यांचे गट तयार करून बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. या संस्थेतर्फे कर्नाटक, हरियाणा, जम्मू, दिल्ली, राजस्थान या राज्यांतील बाजारपेठांत केळी पाठविली आहेत. आता दुबईच्या बाजारपेठेकडेही ती रवाना झाली . श्री. पाटील, नकाते हे शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून केळींचे उत्पादन घेतात. या दोन्ही शेतकऱ्यांची सध्या आठ एकर क्षेत्रावर केळी आहेत. ‘जी नाईन’ जातीची केळी त्यांनी लावली आहेत. या दोन शेतकऱ्यांची केळी दुबई येथील व्यापाऱ्यास पहिल्यांदा इंटरनेटच्या माध्यमातून दाखविली. त्यांनी पसंती दिली. त्यामुळे गुरुवारी २१ टन केळीचा कंटेनर रवाना झाला. तो मुंबईतून समुद्रमार्गे दुबईपर्यंत पोहोचणार आहे.‘संजीवनी’सारख्या संस्थेच्या मदतीने बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. कोल्हापूरची केळी पहिल्यांदाच दुबईला गेली. यामध्ये कृषी विभागाचा मोठा वाटा आहे.- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधीक्षककेळी दुबईला पाठविल्याने चार पैसे अधिक मिळणार आहेत. कृषी विभाग व संजीवनी संस्था यांच्यामुळे दुबई बाजारात आमच्या शेतातील केळी जात आहेत, याचा अभिमान आहे.- अनिल नकाते, शेतकरीसंजीवनी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे. शासनाच्या योजना पोहोचविल्या जात आहेत. मागणी आल्यानंतर दुबईला केळी पाठविली आहेत. उत्तरांचल, हिमाचल प्रदेश, कानपूर येथूनही केळ्यांना मागणी आली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ती पाठविता आलेली नाहीत. - चेतन पाटील, चेअरमन, संजीवनी अ‍ॅग्रो