शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर विमानतळावर एटीआर, बोर्इंग उतरणार; दोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:52 IST

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर ९३० मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोर्इंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विमानतळावर एटीआर, बोर्इंग उतरणार, धावपट्टीचे विस्तारीकरण सुरू दोन महिन्यांत तिरुपती, बंगलोर विमान सेवा

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. सध्या असणारी धावपट्टी विस्तारीकरणानंतर ९३० मीटरने वाढणार आहे. नव्या धावपट्टीमुळे या विमानतळावर एटीआर आणि बोर्इंग उतरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोर विमान सेवा सुरू होणार आहे.विमानतळ परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बुधवारी दुपारी धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार अमल महाडिक, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे प्रकल्प उपमहाप्रबंधक अनंत शेखर, धावपट्टीचे काम करणाऱ्या एन. एस. कन्स्ट्रक्शनचे मालक नरवीरसिंग चौहान, कोल्हापूर विमानतळ संचालक पूजा मूल, व्यवस्थापक राजेश अय्यर, सहाय्यक सरव्यवस्थापक टी. सी. कांबळे, एस. एल. साबळे, कौशिक एम., विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, पृथ्वीराज महाडिक, विनायक रेवणकर, स्वानंद कुलकर्णी, गडमुडशिंगीचे उपसरंपच तानाजी पाटील, कणेरीचे अर्जुन इंगळे, तामगांवचे हेमंत पाटील, आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर विमानतळ विकास आणि विस्तारीकरणासाठी केंद्र सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाने २८४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला. त्यातील संरक्षक भिंत आणि विद्युतीकरणाचे सुमारे २० कोटींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विस्तारीकरणाच्या दुसºया टप्प्यातील धावपट्टी विस्तारीकरणाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले.

सध्याची १३७० मीटरची आहे. विस्तारीकरणानंतर त्यामध्ये ९३० मीटरची भर पडणार आहे. हरियाणाच्या एनएस कन्स्ट्रक्शन हे धावपट्टीचे काम करणारे असून त्यांना हे काम १८ महिन्यांत पूर्ण करावयाचे आहे. धावपट्टी वाढल्यानंतर एटीआर, बोर्इंगसारखी मोठी विमाने याठिकाणी उतरता येणार आहेत.

विस्तारीकरणाच्या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सहकार्य लाभले. उड्डाण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूर- बंगलोर ही एअर अलायन्सची विमान सेवा १५ नोव्हेंबर, तर कोल्हापूर-तिरूपती ही इंडिगो कंपनीची विमान सेवा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उड्डाण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर-गोवा विमान सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल.

विविध कामांसाठी १२४ कोटींची निविदा मंजूरविमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग, एटीसी, फायर फायटिंग इमारत, अशा विविध कामांसाठीची १२४ कोटींची निविदा मंजूर झाली असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूर हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथील विमानतळावर ‘कार्गो हब’ करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक