शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव

By समीर देशपांडे | Updated: June 4, 2023 12:58 IST

ज्याेतिरादित्य शिंदे यांनी दिली माहिती. शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. रविवारचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रम त्यांनी केले. पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कालच मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीच्या कामाची पाहणी केली. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून याबाबत प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे आला आहे. आमच्या कार्यालयाकडून तो मंजूर करून आता केंद्रीय मंत्रीमंडळासमोर आणण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल.

ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये क्रांतीकारी परिवर्तन झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत अव्वल होत असून प्रगतीचे आकडे थक्क करणारे आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून भारत हा जगातील एक नक्षत्र बनला आहे. २०१४ च्या आधी ६८ वर्षात देशात इकूण विमानतळ ७४ होती. केवळ ९ वर्षात आणखी ७४ विमानतळे झाली असून ही संख्या २२० पर्यंत नेण्यात येणार आहे. पूर्वी प्रतिदिन १३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बनवला जात होता. आता त्याच्या तिप्पट म्हणजे ३६ किलोमीटर प्रतिदिन महामार्ग बनवला जात आहे. कोरोनाच्या काळात प्रगत देशांमध्ये हातात केसपेपर घेवून नागरिक फिरत असताना भारतात मोबाईलवर कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी मोदी यांनी करून दाखवली आहे.

दूध का दूध, पानी का पानी

दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाविषयी विचारले असता, ते म्हणाले, सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे तो निकाल आल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ हो जाएगा.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे