शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव, लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव

By समीर देशपांडे | Updated: June 4, 2023 12:58 IST

ज्याेतिरादित्य शिंदे यांनी दिली माहिती. शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर येथील विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शिंदे हे शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परंतू ओरिसामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरचे शनिवारचे सर्व जाहीर कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. रविवारचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यक्रम त्यांनी केले. पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, खासदार अपराजिता सारंगी, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष शौमिका महाडिक उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कालच मी कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनस इमारतीच्या कामाची पाहणी केली. दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राजाराम महाराजांचे नाव देण्याबाबत विचारणा केल्यानंतर ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडून याबाबत प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे आला आहे. आमच्या कार्यालयाकडून तो मंजूर करून आता केंद्रीय मंत्रीमंडळासमोर आणण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात येईल.

ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये क्रांतीकारी परिवर्तन झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत अव्वल होत असून प्रगतीचे आकडे थक्क करणारे आहेत. सामाजिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून भारत हा जगातील एक नक्षत्र बनला आहे. २०१४ च्या आधी ६८ वर्षात देशात इकूण विमानतळ ७४ होती. केवळ ९ वर्षात आणखी ७४ विमानतळे झाली असून ही संख्या २२० पर्यंत नेण्यात येणार आहे. पूर्वी प्रतिदिन १३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बनवला जात होता. आता त्याच्या तिप्पट म्हणजे ३६ किलोमीटर प्रतिदिन महामार्ग बनवला जात आहे. कोरोनाच्या काळात प्रगत देशांमध्ये हातात केसपेपर घेवून नागरिक फिरत असताना भारतात मोबाईलवर कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी मोदी यांनी करून दाखवली आहे.

दूध का दूध, पानी का पानी

दिल्लीतील खेळाडूंच्या आंदोलनाविषयी विचारले असता, ते म्हणाले, सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे तो निकाल आल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ हो जाएगा.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे