शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूरात प्रशासन दक्ष;‘बीएलओ’ सुस्त, मतदार यादीतील कामांकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 16:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात प्रशासन दक्ष;‘बीएलओ’ सुस्त, मतदार यादीतील कामांकडे कानाडोळासाडे तीन लाख रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम प्रलंबित

प्रवीण देसाई

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)च्या माध्यमातून करायची आहेत. परंतु हे ‘बीएलओ’ नेमके असतात कसे व ते कधी घरी येऊन जातात हा सर्वसामान्य मतदारांना पडलेला प्रश्न आहे. याबाबत राजकीय कार्यकर्त्यांनीही आक्षेप घेतले आहेत. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासन दक्ष असले तरी ‘बीएलओ’ मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे.प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेली आहे. ती नागरिकांसाठी मतदान केंद्रावर, तहसीलदार कार्यालय, तसेच कोल्हापूर महानगरपालिका येथे तपासून आपल्या नावाची खात्री करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदार यादीत नाव नसेल तर तो भरुन नमुना क्र. ६ चा फॉर्म आवश्यक पुराव्यासह भरून द्यावा. यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने युध्दपातळीवर काम सुरु केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत.

एका बाजूला हे चित्र असले तरी तळागाळात मतदार यादीसंदर्भात जे प्रत्यक्ष काम करतात ते ‘बीएलओ’ मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. अपवाद वगळता ‘बीएलओ’ हे बहुतांश ठिकाणी मतदारांच्या घरात गेलेले नाही. परिणामी काही दिवसांपूर्वी दौऱ्यावर आलेल्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासमोर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ‘बीएलओ’ घरोघरी जात नाहीत. तसेच गेले असतील तर ते वरवर फेरी मारत असल्याचे दिसत आहे.

कारण मतदार यादीत तब्बल ३ लाख ६५ हजार २१२ रंगीत छायाचित्रे समाविष्ट करण्याचे काम प्रलंबित आहे. ३१ आॅक्टोंबरपर्यंतच हे काम करायचे असून इतक्या अल्प कालावधिमध्ये हे काम पूर्ण होणार का ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

‘बीएलओं’बाबत जिल्हा प्रशासन गंभीर‘बीएलओं’च्या चालढकल कारभाराबाबत जिल्हा निवडणूक विभाग गंभीर आहे. त्यांनी याबाबत वेळोवेळी निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनीही ‘बीएलओं’च्या कामातील कुचराईबद्दल काही ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केल्याची आठवण कोल्हापूरात करुन दिली आहे. तरीही ‘बीएलओ’ मतदारांपर्यंत पाहोचण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे.

३ लाख ६५ हजार २१२ रंगीत छायाचित्रांचे काम प्रलंबितप्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या २९ लाख ६३ हजार३१४ इतकी आहे. छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या २९ लाख ६४ हजार ८२४, छायाचित्र नसलेल्यांची संख्या ४९०, कृष्ण धवल छायाचित्र असलेले मतदार ५ लाख २२ हजार ९१५, रंगीत छायाचित्र असलेले मतदार १ लाख ५७ हजार ७०३ तर रंगीत छायाचित्र नसलेले मतदार ३ लाख ६५ हजार २१२ आहेत. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर