शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर :  प्रकल्पग्रस्तांची पदे न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 13:38 IST

पुनर्वसन अधिनियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन घेणाºया संस्था व सहकारी संस्थांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील ५ टक्के पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरणे बंधनकारक आहे. यामध्ये हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाºया संस्था व कार्यालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी येथे दिला.

ठळक मुद्देप्रकल्पग्रस्तांची पदे न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारीपुनर्वसन कायद्यानुसार ५ टक्के पदे भरणे बंधनकारक

कोल्हापूर : पुनर्वसन अधिनियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासन घेणाºया संस्था व सहकारी संस्थांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील ५ टक्के पदे प्रकल्पग्रस्तांमधून भरणे बंधनकारक आहे. यामध्ये हेतुपुरस्सर टाळाटाळ करणाऱ्या संस्था व कार्यालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी येथे दिला.प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैभव नावडकर, पुनर्वसन तहसीलदार जयवंत पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाबरोबरच सहकारी संस्थांमधील प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा शिल्लक अनुशेष प्राधान्याने भरावा, असे त्यांनी निर्देश दिले. प्रकल्पग्रस्तांचे फार मोठे योगदान आणि त्याग असून त्यांच्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या किमान ५ टक्के राखीव जागा प्राधान्यक्रमाने भरणे सर्व विभाग, तसेच सहकारी संस्थांवर बंधनकारक आहे.

याकामी टाळाटाळ न करता सहकारी संस्थांनी विशेषत: साखर कारखाने, बँका, दूधसंघ, सूत गिरण्या, सार्वजनिक कंपन्या तसेच शासन अंगीकृत उपक्रमाने या कामी प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यांचे तीन हस्तांतरणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, त्यानुसार जिल्ह्यात ही कार्यवाही असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सुभाष देसाई, शंकरराव चव्हाण, शामराव झोरे, नाथा कांबळे, आदींनी धरणग्रस्तांचे प्रश्न मांडले.

बैठकीला गैरहजर संस्थांना नोटीसकळवूनही बैठकीस गैरहजर राहिलेल्या सर्व विभाग आणि संस्थांना पुनर्वसन अधिनियमातील कलम २१ नुसार नोटिसा काढण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी दिले. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर