शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांना दिलासा-अपात्रतेचे संकट अखेर टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:12 IST

लाख भानगडी तसेच जीवाचं रान करुन निवडून आल्यानंतरही केवळ प्रशासकीय कारभारातील तांत्रिक चुकीमुळे अडचणीत सापडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांना राज्य सरकारने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. शिवाय शहरावर ओढवलेले फेरनिवडणुकीचे संकटही दूर झाले.

ठळक मुद्देविधीमंडळात होणार कायद्यात बदल-शहरावर ओढवलेले फेरनिवडणुकीचे संकटही दूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पक्षीय अभिनिवेष विसरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना सांकडे

कोल्हापूर : लाख भानगडी तसेच जीवाचं रान करुन निवडून आल्यानंतरही केवळ प्रशासकीय कारभारातील तांत्रिक चुकीमुळे अडचणीत सापडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांना राज्य सरकारने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. शिवाय शहरावर ओढवलेले फेरनिवडणुकीचे संकटही दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धाबे दणाणलेल्या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेऊन ‘दादा आम्हाला वाचवा’अशी हाक दिली होती. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाने खरा ठरला आणि नगरसेवकांवरील अपात्रतेचे संकट अखेर टळले.

१ नोव्हेंबर २०१५ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुक झाली होती. निवडणुक झाल्यापासून सहा महिन्याच्या आत म्हणजे १ मे २०१६ पूर्वी आरक्षित जागेतून निवडून आलेल्या एकूण ३३ नगरसेवकांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र निवडणुक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक होते.त्यापैकी १३ नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमारपत्र निवडणुक आयोगास सादर केले मात्र २० जणांनी मुदत टळून गेल्यानंतर त्यांनी ती सादर केली. पुढे निलेश देसाई यांचे पद जातीचा दाखला अवैध ठरल्याने रद्द झाले.

पण १९ नगरसेवक मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अडचणीत आले होते. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदत पाळणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचे सांगत नगरसेवकपद रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होता. त्यामुळे सुमारे नऊ हजाराहून अधिक लोकप्रतिनिधी अपात्र ठरवण्याची नामुष्की ओढवलेली.

मात्र मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळाला. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सहा महिन्याची मुदत एक वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. तसेच ज्यांच्याकडे आता जात वैधता प्रमाणपत्र आहेत, परंतु त्यांनी अद्याप ती निवडणुक आयोगाकडे सादर केलेली नाहीत त्यांना अध्यादेश निघाल्यापासून १५ दिवसाच्या सादर करता येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांना अभय मिळाले आहे.दादांनी यंत्रणा लावली कामालामहानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पक्षीय अभिनिवेष विसरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना सांकडे घातले होते. आमची कोणतीही चुक नसताना आम्हाला बळी जाऊ देऊ नका, आम्हाला वाचवा अशी विनंती पालकमंत्र्यांना केली होती. त्यानंतर कायदेशीरदृष्ट्या शक्य असेल तर यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली होती. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नगरविकास, ग्रामविकास, विधी व न्याय तसेच सामाजिक न्याय अशा चार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र बसवून यातून पर्याय देण्याची सुचना केली होती. त्यातून निवडणुक आयोगाच्या कलम ९ अ मधील तरतुद बदलण्याचा पर्याय पुढे आला. या तरतुदीतील सहा महिन्याच्या मुदतीऐवजी एक वर्षाची केली जाईल.विधीमंडळात होणार कायद्यात बदलमंत्रीमंडळाने मंगळवारी जरी निर्णय घेतला असला तरी राज्यपाल यांच्या सहीने एक दोन दिवसात अध्यादेश निघेल. या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईल. निवडणुक आयोगाच्या कलम ९ अ मधील तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय विधीमंडळात होईल.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकारkolhapurकोल्हापूर