शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांना दिलासा-अपात्रतेचे संकट अखेर टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:12 IST

लाख भानगडी तसेच जीवाचं रान करुन निवडून आल्यानंतरही केवळ प्रशासकीय कारभारातील तांत्रिक चुकीमुळे अडचणीत सापडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांना राज्य सरकारने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. शिवाय शहरावर ओढवलेले फेरनिवडणुकीचे संकटही दूर झाले.

ठळक मुद्देविधीमंडळात होणार कायद्यात बदल-शहरावर ओढवलेले फेरनिवडणुकीचे संकटही दूर महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पक्षीय अभिनिवेष विसरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना सांकडे

कोल्हापूर : लाख भानगडी तसेच जीवाचं रान करुन निवडून आल्यानंतरही केवळ प्रशासकीय कारभारातील तांत्रिक चुकीमुळे अडचणीत सापडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांना राज्य सरकारने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. शिवाय शहरावर ओढवलेले फेरनिवडणुकीचे संकटही दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धाबे दणाणलेल्या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेऊन ‘दादा आम्हाला वाचवा’अशी हाक दिली होती. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाने खरा ठरला आणि नगरसेवकांवरील अपात्रतेचे संकट अखेर टळले.

१ नोव्हेंबर २०१५ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुक झाली होती. निवडणुक झाल्यापासून सहा महिन्याच्या आत म्हणजे १ मे २०१६ पूर्वी आरक्षित जागेतून निवडून आलेल्या एकूण ३३ नगरसेवकांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र निवडणुक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक होते.त्यापैकी १३ नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमारपत्र निवडणुक आयोगास सादर केले मात्र २० जणांनी मुदत टळून गेल्यानंतर त्यांनी ती सादर केली. पुढे निलेश देसाई यांचे पद जातीचा दाखला अवैध ठरल्याने रद्द झाले.

पण १९ नगरसेवक मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अडचणीत आले होते. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदत पाळणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचे सांगत नगरसेवकपद रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू होता. त्यामुळे सुमारे नऊ हजाराहून अधिक लोकप्रतिनिधी अपात्र ठरवण्याची नामुष्की ओढवलेली.

मात्र मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे या सर्वांना मोठा दिलासा मिळाला. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सहा महिन्याची मुदत एक वर्षापर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. तसेच ज्यांच्याकडे आता जात वैधता प्रमाणपत्र आहेत, परंतु त्यांनी अद्याप ती निवडणुक आयोगाकडे सादर केलेली नाहीत त्यांना अध्यादेश निघाल्यापासून १५ दिवसाच्या सादर करता येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महानगरपालिकेतील १९ नगरसेवकांना अभय मिळाले आहे.दादांनी यंत्रणा लावली कामालामहानगरपालिकेतील १९ नगरसेवकांनी पक्षीय अभिनिवेष विसरुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना सांकडे घातले होते. आमची कोणतीही चुक नसताना आम्हाला बळी जाऊ देऊ नका, आम्हाला वाचवा अशी विनंती पालकमंत्र्यांना केली होती. त्यानंतर कायदेशीरदृष्ट्या शक्य असेल तर यातून निश्चितपणे मार्ग काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली होती. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नगरविकास, ग्रामविकास, विधी व न्याय तसेच सामाजिक न्याय अशा चार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र बसवून यातून पर्याय देण्याची सुचना केली होती. त्यातून निवडणुक आयोगाच्या कलम ९ अ मधील तरतुद बदलण्याचा पर्याय पुढे आला. या तरतुदीतील सहा महिन्याच्या मुदतीऐवजी एक वर्षाची केली जाईल.विधीमंडळात होणार कायद्यात बदलमंत्रीमंडळाने मंगळवारी जरी निर्णय घेतला असला तरी राज्यपाल यांच्या सहीने एक दोन दिवसात अध्यादेश निघेल. या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होईल. निवडणुक आयोगाच्या कलम ९ अ मधील तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय विधीमंडळात होईल.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकारkolhapurकोल्हापूर