शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

कुरुंदवाडची ज्ञानसंपदा ‘नगर वाचनालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:42 IST

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : १२५ व्या वर्षपूर्तीकडे वाटचाल करणारे व संस्थानिकांनी सुरू केलेले ‘नगर वाचनालय’ ...

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : १२५ व्या वर्षपूर्तीकडे वाटचाल करणारे व संस्थानिकांनी सुरू केलेले ‘नगर वाचनालय’ आजही शहर व परिसरातील वाचक व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी ज्ञानगंगा ठरत आहे. सव्वाशे वर्षांत वाचनालयाचे तीन वेळा नामकरण बदलले असले तरी ज्ञानाचा दरवळ मात्र कमी झालेला नाही. संदर्भ विभाग, बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथालय, वृत्तपत्रे व नियतकालिके, अभ्यासालय अशा विविध विभागातून वाचकांना ज्ञानरुपी खरा मित्र मिळाला आहे.कुरुंदवाड शहर हे संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या अधिपत्याखालील संस्थान होते. संस्थानिक कला, क्रीडा व शिक्षणप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या दरबारी अनेक थोर पंडित, संगीतकार, गायक, कलावंत, मल्ल यांना राजाश्रय होता. चिंतामणराव पटवर्धन यांचे ज्येष्ठ चिरंजीव भालचंद्र यांनी बनारस विद्यापीठातून संस्कृत विषयाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी रयतेला मोफत ज्ञान घेता यावे व राज्यातील घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने १६ आॅक्टोबर १८९८ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर राजवाड्यातच स्टेट लायब्ररी या नावाने वाचनालय सुरू केले.भालचंद्र पटवर्धन सरकारांनी सुरुवातील दहा वृत्तपत्रे, सात मासिके व एक हजार ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली. त्यावेळी केवळ पंधरा सभासद संख्या होती. सुमारे पंधरा वर्षापर्यंत वाचनालयाचा संपूर्ण कारभार सरकारी मदतीवरच सुरू होता.संस्थापक चिंतामणराव पटवर्धन यांच्या निधनानंतर १९२६ मध्ये राजमाता आईसाहेब महाराज यांच्या कारकिर्दीत वाचनालयाच्या सभासदांच्या विशेष सभेतून अध्यक्ष निवडून सरकारी लायब्ररी लोकाभिमुख केली. १९४० मध्ये भालचंद्र पटवर्धन यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी १९४२ साली वाचनालयाचा महोत्सव कार्यक्रम घेतला. त्यावेळी वाचनालयाचे स्टेट लायब्ररी हे नाव बदलून राजा सर रघुनाथराव पंत सचिव वाचनालय असे नामकरण केले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वाचनालयाने लोक प्रबोधनाचे कार्य उत्तमरित्या केले. दैनिक, साप्ताहिक, मासिके यांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचे स्पुर्लिंग तेवत ठेवले.देश स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली संस्थान संघराज्यात विलीन झाले. त्यामुळे १९४९ साली वाचनालयाची सर्वसाधारण सभा घेवून राजा सर रघुनाथराव पंत सचिव वाचनालय हे नाव बदलून ‘नगर वाचनालय’ असे करण्यात आले.१९९५ पासून या वाचनालयाची ‘अ’ वर्गाच्या यादीत गणना झाली आहे. संस्थेची दोनमजली इमारत असून त्यामध्ये कार्यालय, संदर्भ विभाग, बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथालय विभाग, वृत्तपत्रे व नियतकालिके विभाग, अभ्यासालय, सभागृह असे विविध विभाग आहेत.वाचनालयाचा उपयोग केवळ पुस्तक, वृत्तपत्रे वाचनापुरतेच मर्यादित न ठेवता लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी संस्थाचालकांकडून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. यामध्ये २०१२ पासून विद्यार्थ्यांना एमपीएससी व युपीएससीकरिता स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू केले आहे.प्रत्येक वर्षी शरद व्याख्यानमाला, काव्य गायन स्पर्धा, प्रवचने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाचन सप्ताह असे विविध उपक्रम राबविले जातात.वाचनालयास भेटी दिलेले प्रमुख मान्यवरमाजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती बी. डी. जत्ती, साहित्यसम्राट न. चि. केळकर, माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड, महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय द. वा. पोतदार, ना. ग. गोरे, राजेसाहेब भोर संस्थान, थोर विचारवंत बाळासाहेब भारदे, दे. भ. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार, नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, कुलगुरू आप्पासाहेब पवार, चि. वि. जोशी, वि. द. घाटे, द. ना. धनागरे, जयंत नारळीकर, ज्ञानेश्वर मुळे, डॉ. रत्नाकर महाजन, विजया वाड.संचालक मंडळविनया घोरपडे (अध्यक्ष), अरुण फडणीस (उपाध्यक्ष), अल्लाउद्दीन दानवाडे (कार्याध्यक्ष), भाऊसो सावगांवे (उपकार्याध्यक्ष), सदस्य - मारुती कोकाटे, भूपाल दिवटे, विजयसिंह भोसले, उमेश पागे, प्रकाश पाटील, सच्चिदानंद आवटी, सुश्मिता पटवर्धन, रमाकांत हुद्दार, अनिल चव्हाण. सेवक वर्ग - दत्तात्रय भोसले (ग्रंथपाल), मेघा पाटील (सहा. ग्रंथपाल), नरसिंह नाईक (लिपिक), शिरीष जोशी (शिपाई).शरद व्याख्यानमाला : संस्थेचे आश्रयदाते एकनाथ वासुदेव छत्रे यांच्यातर्फे २ लाख इतक्या देणगी रकमेच्या व्याजातून त्यांचे मामा स्व. पद्मश्री पां. वा. गाडगीळ व स्व. डॉ. स. रा. गाडगीळ यांच्या स्मरणार्थ सन २०१२ पासून प्रत्येक वर्षी सात दिवसांची शरद व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे.