शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडची ज्ञानसंपदा ‘नगर वाचनालय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:42 IST

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : १२५ व्या वर्षपूर्तीकडे वाटचाल करणारे व संस्थानिकांनी सुरू केलेले ‘नगर वाचनालय’ ...

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : १२५ व्या वर्षपूर्तीकडे वाटचाल करणारे व संस्थानिकांनी सुरू केलेले ‘नगर वाचनालय’ आजही शहर व परिसरातील वाचक व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी ज्ञानगंगा ठरत आहे. सव्वाशे वर्षांत वाचनालयाचे तीन वेळा नामकरण बदलले असले तरी ज्ञानाचा दरवळ मात्र कमी झालेला नाही. संदर्भ विभाग, बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथालय, वृत्तपत्रे व नियतकालिके, अभ्यासालय अशा विविध विभागातून वाचकांना ज्ञानरुपी खरा मित्र मिळाला आहे.कुरुंदवाड शहर हे संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या अधिपत्याखालील संस्थान होते. संस्थानिक कला, क्रीडा व शिक्षणप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या दरबारी अनेक थोर पंडित, संगीतकार, गायक, कलावंत, मल्ल यांना राजाश्रय होता. चिंतामणराव पटवर्धन यांचे ज्येष्ठ चिरंजीव भालचंद्र यांनी बनारस विद्यापीठातून संस्कृत विषयाची पदवी घेतल्यानंतर त्यांनी रयतेला मोफत ज्ञान घेता यावे व राज्यातील घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने १६ आॅक्टोबर १८९८ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर राजवाड्यातच स्टेट लायब्ररी या नावाने वाचनालय सुरू केले.भालचंद्र पटवर्धन सरकारांनी सुरुवातील दहा वृत्तपत्रे, सात मासिके व एक हजार ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली. त्यावेळी केवळ पंधरा सभासद संख्या होती. सुमारे पंधरा वर्षापर्यंत वाचनालयाचा संपूर्ण कारभार सरकारी मदतीवरच सुरू होता.संस्थापक चिंतामणराव पटवर्धन यांच्या निधनानंतर १९२६ मध्ये राजमाता आईसाहेब महाराज यांच्या कारकिर्दीत वाचनालयाच्या सभासदांच्या विशेष सभेतून अध्यक्ष निवडून सरकारी लायब्ररी लोकाभिमुख केली. १९४० मध्ये भालचंद्र पटवर्धन यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी १९४२ साली वाचनालयाचा महोत्सव कार्यक्रम घेतला. त्यावेळी वाचनालयाचे स्टेट लायब्ररी हे नाव बदलून राजा सर रघुनाथराव पंत सचिव वाचनालय असे नामकरण केले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वाचनालयाने लोक प्रबोधनाचे कार्य उत्तमरित्या केले. दैनिक, साप्ताहिक, मासिके यांच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचे स्पुर्लिंग तेवत ठेवले.देश स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली संस्थान संघराज्यात विलीन झाले. त्यामुळे १९४९ साली वाचनालयाची सर्वसाधारण सभा घेवून राजा सर रघुनाथराव पंत सचिव वाचनालय हे नाव बदलून ‘नगर वाचनालय’ असे करण्यात आले.१९९५ पासून या वाचनालयाची ‘अ’ वर्गाच्या यादीत गणना झाली आहे. संस्थेची दोनमजली इमारत असून त्यामध्ये कार्यालय, संदर्भ विभाग, बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथालय विभाग, वृत्तपत्रे व नियतकालिके विभाग, अभ्यासालय, सभागृह असे विविध विभाग आहेत.वाचनालयाचा उपयोग केवळ पुस्तक, वृत्तपत्रे वाचनापुरतेच मर्यादित न ठेवता लोकांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी संस्थाचालकांकडून विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. यामध्ये २०१२ पासून विद्यार्थ्यांना एमपीएससी व युपीएससीकरिता स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू केले आहे.प्रत्येक वर्षी शरद व्याख्यानमाला, काव्य गायन स्पर्धा, प्रवचने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाचन सप्ताह असे विविध उपक्रम राबविले जातात.वाचनालयास भेटी दिलेले प्रमुख मान्यवरमाजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती बी. डी. जत्ती, साहित्यसम्राट न. चि. केळकर, माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड, महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय द. वा. पोतदार, ना. ग. गोरे, राजेसाहेब भोर संस्थान, थोर विचारवंत बाळासाहेब भारदे, दे. भ. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार, नरहर कुरुंदकर, ग. प्र. प्रधान, कुलगुरू आप्पासाहेब पवार, चि. वि. जोशी, वि. द. घाटे, द. ना. धनागरे, जयंत नारळीकर, ज्ञानेश्वर मुळे, डॉ. रत्नाकर महाजन, विजया वाड.संचालक मंडळविनया घोरपडे (अध्यक्ष), अरुण फडणीस (उपाध्यक्ष), अल्लाउद्दीन दानवाडे (कार्याध्यक्ष), भाऊसो सावगांवे (उपकार्याध्यक्ष), सदस्य - मारुती कोकाटे, भूपाल दिवटे, विजयसिंह भोसले, उमेश पागे, प्रकाश पाटील, सच्चिदानंद आवटी, सुश्मिता पटवर्धन, रमाकांत हुद्दार, अनिल चव्हाण. सेवक वर्ग - दत्तात्रय भोसले (ग्रंथपाल), मेघा पाटील (सहा. ग्रंथपाल), नरसिंह नाईक (लिपिक), शिरीष जोशी (शिपाई).शरद व्याख्यानमाला : संस्थेचे आश्रयदाते एकनाथ वासुदेव छत्रे यांच्यातर्फे २ लाख इतक्या देणगी रकमेच्या व्याजातून त्यांचे मामा स्व. पद्मश्री पां. वा. गाडगीळ व स्व. डॉ. स. रा. गाडगीळ यांच्या स्मरणार्थ सन २०१२ पासून प्रत्येक वर्षी सात दिवसांची शरद व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे.