शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

‘केएमटी’ला मिळणार उत्पन्नवाढीचा ‘बूस्टर डोस’-‘पीसीआरए’मुळे होणार २ कोटींचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:54 IST

राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड केली.

ठळक मुद्देकोल्हापूरसह पाच शहरांची निवड; प्रदूषणही घटणार

तानाजी पोवार ।कोल्हापूर : राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड केली.

त्याअंतर्गत महानगरपालिकेच्या परिवहन (केएमटी) उपक्रमामध्ये हा प्रयोग मंगळवार (दि.१२)पासून सुरू आहे. त्यामुळे ‘केएमटी’ बसेसमधील तांत्रिक दोष कमी होऊन अ‍ॅव्हरेज वाढणार आहे. त्यामुळे वार्षिक सुमारे सव्वातीन लाख लिटर इंधनाची बचत होऊन ‘केएमटी’ला प्रतिवर्षी दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.शहरात सार्वजनिक प्रवासी वाहनांपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मिलिटरी आॅफ हौसिंग अर्बन अफेअर्स (एमओएचयूए) या केंद्र शासन अंतर्गत संस्थेच्या वतीने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यानुसार ‘पीसीआरए’ (पेट्रोलियम कॉन्झर्व्हेशन अ‍ॅँड रिसर्च असोसिएशन) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वाहनांचे वायुप्रदूषण रोखण्यासाठी ‘पीसीआरए’ने ‘फ्लीट’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. त्याच्या वापरासाठी देशभरातील एकूण ३४ शहरांची निवड केली आहे. त्यांत कोल्हापूरचा समावेश आहे. ‘पीसीआरए’ संस्थेच्या तंत्रज्ञांमार्फत तीन महिने सार्वजनिक उपक्रमांतील वाहनांची तपासणी करून वाहनांत तांत्रिक बदल करणार आहे.

कोल्हापुरात ‘केएमटी’कडे १२९ बसेस आहेत; पण रोज सरासरी साडेआठ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. ‘पीसीआरए’ संस्थेने ‘केएमटी’कडील प्रत्येक वाहनाची मागील चार महिन्यांतील सूक्ष्म माहिती जमा केली असून, त्यावर अभ्यास केला. मंगळवारपासून योजना कार्यान्वित केली. येत्या चार दिवसांत किमान १५ बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून त्या मार्गावर धावतील. ‘केएमटी’कडील जुन्या ५४ बसेसवर प्रथम हा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी ‘केएमटी’च्या बुद्धगार्डन कार्यशाळेत ३५ मेकॅनिक व चालकांची कार्यशाळा झाली.‘पीसीआरए’ म्हणजे काय?पीसीआरए’मार्फत प्रवासी वाहनांची मागील तीन महिन्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. ती पुढीलप्रमाणे -१) वाहनावरील चालक २) वाहनाचा नंबर, रोजचा मार्ग३) रोज लागणारे इंधन ४) वाहनाचे मिळणारे अ‍ॅव्हरेजदोष निर्गत :१) वाहनातील तांत्रिक दोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढता येतो.२) चालकांत दोष आढळल्यास त्याला प्रशिक्षण देणे.निष्कर्ष१) वाहनांचे वायूप्रदूषण कमी.२) वाहनाची अ‍ॅव्हरेज वाढ.३) ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी.४) वाहनाची तीन ते पाच टक्के जादा इंधन बचतइंधन बचतबसेसना ‘पीसीआए’नुसार चालकांच्या प्रशिक्षणामुळे दरवर्षी २,२६ हजार लिटर्स, तर तांत्रिक दोष काढल्यामुळे दरवर्षी १,१३ हजार लिटर इंधनाची बचत होणार आहे.सध्या बसेस संख्या १२९रोज किमान १०२बसेस मार्गस्थरोज २४ हजार कि.मी. धावजुन्या बसेसचे ३.७३, नवीन बसेसचे ४.०० (सरासरी अ‍ॅव्हरेज)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBus Driverबसचालक