शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

‘केएमटी’ला मिळणार उत्पन्नवाढीचा ‘बूस्टर डोस’-‘पीसीआरए’मुळे होणार २ कोटींचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:54 IST

राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड केली.

ठळक मुद्देकोल्हापूरसह पाच शहरांची निवड; प्रदूषणही घटणार

तानाजी पोवार ।कोल्हापूर : राज्यातील सर्वच सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था तोट्यात असताना ती फायद्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यातून ‘पीसीआरए’ ही योजना कार्यान्वित केली. महाराष्टत कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या पाच शहरांची यासाठी निवड केली.

त्याअंतर्गत महानगरपालिकेच्या परिवहन (केएमटी) उपक्रमामध्ये हा प्रयोग मंगळवार (दि.१२)पासून सुरू आहे. त्यामुळे ‘केएमटी’ बसेसमधील तांत्रिक दोष कमी होऊन अ‍ॅव्हरेज वाढणार आहे. त्यामुळे वार्षिक सुमारे सव्वातीन लाख लिटर इंधनाची बचत होऊन ‘केएमटी’ला प्रतिवर्षी दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.शहरात सार्वजनिक प्रवासी वाहनांपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मिलिटरी आॅफ हौसिंग अर्बन अफेअर्स (एमओएचयूए) या केंद्र शासन अंतर्गत संस्थेच्या वतीने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्यानुसार ‘पीसीआरए’ (पेट्रोलियम कॉन्झर्व्हेशन अ‍ॅँड रिसर्च असोसिएशन) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वाहनांचे वायुप्रदूषण रोखण्यासाठी ‘पीसीआरए’ने ‘फ्लीट’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले. त्याच्या वापरासाठी देशभरातील एकूण ३४ शहरांची निवड केली आहे. त्यांत कोल्हापूरचा समावेश आहे. ‘पीसीआरए’ संस्थेच्या तंत्रज्ञांमार्फत तीन महिने सार्वजनिक उपक्रमांतील वाहनांची तपासणी करून वाहनांत तांत्रिक बदल करणार आहे.

कोल्हापुरात ‘केएमटी’कडे १२९ बसेस आहेत; पण रोज सरासरी साडेआठ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. ‘पीसीआरए’ संस्थेने ‘केएमटी’कडील प्रत्येक वाहनाची मागील चार महिन्यांतील सूक्ष्म माहिती जमा केली असून, त्यावर अभ्यास केला. मंगळवारपासून योजना कार्यान्वित केली. येत्या चार दिवसांत किमान १५ बसेसची तांत्रिक दुरुस्ती करून त्या मार्गावर धावतील. ‘केएमटी’कडील जुन्या ५४ बसेसवर प्रथम हा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी ‘केएमटी’च्या बुद्धगार्डन कार्यशाळेत ३५ मेकॅनिक व चालकांची कार्यशाळा झाली.‘पीसीआरए’ म्हणजे काय?पीसीआरए’मार्फत प्रवासी वाहनांची मागील तीन महिन्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. ती पुढीलप्रमाणे -१) वाहनावरील चालक २) वाहनाचा नंबर, रोजचा मार्ग३) रोज लागणारे इंधन ४) वाहनाचे मिळणारे अ‍ॅव्हरेजदोष निर्गत :१) वाहनातील तांत्रिक दोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढता येतो.२) चालकांत दोष आढळल्यास त्याला प्रशिक्षण देणे.निष्कर्ष१) वाहनांचे वायूप्रदूषण कमी.२) वाहनाची अ‍ॅव्हरेज वाढ.३) ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी.४) वाहनाची तीन ते पाच टक्के जादा इंधन बचतइंधन बचतबसेसना ‘पीसीआए’नुसार चालकांच्या प्रशिक्षणामुळे दरवर्षी २,२६ हजार लिटर्स, तर तांत्रिक दोष काढल्यामुळे दरवर्षी १,१३ हजार लिटर इंधनाची बचत होणार आहे.सध्या बसेस संख्या १२९रोज किमान १०२बसेस मार्गस्थरोज २४ हजार कि.मी. धावजुन्या बसेसचे ३.७३, नवीन बसेसचे ४.०० (सरासरी अ‍ॅव्हरेज)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBus Driverबसचालक