शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांचे भिलवडीतील समर्थक भाजपच्या वाटेवर

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

दोन महिन्यात पक्षप्रवेश शक्य : संजयकाका पाटील, पृथ्वीराज देशमुखांनी टाकले जाळे

शरद जाधव / भिलवडी भिलवडी (ता. पलूस) येथील माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम समर्थकांचा मोठा गट नाराज असून, तो भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहे. दोन महिन्यात मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातील भिलवडी गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील, तसेच कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. डॉ. पतंगराव कदम यांच्या विजयामध्ये भिलवडीतील निष्ठावान कार्यकर्त्यांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. कदम यांनी विविध पदांचा खुबीने वापर करीत परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामेही केली. मात्र डॉ. कदमांच्या जवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांचे दोन गट आहेत. एक केवळ फायद्यासाठी जवळ असणारा व दुसरा प्रामाणिकपणे राबणारा. गेल्या काही वर्षांमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना कदम परिवाराकडून सहकार्य मिळत नाही, असे बोलले जाते. दोन्ही गटांमध्ये श्रेयवादावरून तसेच एकमेकांची उणीदुणी काढण्यावरून वाद होतात. एक गट दुसऱ्या गटाचे खच्चीकरण करण्याची संधी सोडत नाही. यामुळे भिलवडी जिल्हा परिषद गटातील समदु:खी, नाराज कार्यकर्ते एकत्र येत आहेत. सध्या राज्यात युतीचे सरकार असल्याने अपेक्षित विकासकामे होतील का, असाही प्रश्न आहे. यामुळे काही ठेकेदार कार्यकर्त्यांनी वरून कॉँग्रेस आणि आतून भाजप असा पवित्रा घेतला आहे. काही नेतेमंडळी दोन्हीकडे समान अंतर ठेवून आहेत. यातच खासदार संजय पाटील व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जनसंपर्क वाढविला आहे. या दोघांच्या गाडीमधून, तालुक्यातील विविध कार्यक्रमांमधून ही नेतेमंडळी दिसत आहेत. कॉँग्रेसच्या कळपातील नाराजांना शोधून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे कॉँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये कमालीची निष्क्रि यता असून फक्त निवडणुकीपुरती ‘चमको’गिरी करणाऱ्या नेत्यांचा भरणा अधिक आहे. यामध्ये विशेषत: तरुण फळीतील कार्यकर्ते राजकीय पुनर्वसनासाठी पर्यायाच्या शोधात आहेत. त्यांना आजमितीस तरी भाजपशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. भिलवडी व माळवाडी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजपचे आलिशान कार्यालय उभारण्यात येत आहे. जूनअखेर संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत भिलवडी गटांतर्गत विविध गावांतील नेतेमंडळी व कार्यकर्ते जाहीर कार्यक्रमांतून भाजपध्ये प्रवेश करून कॉँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. निष्ठेचे चीज शून्य आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून कदम गटामध्ये सक्रिय असून, कामाचे कसलेच चीज होत नसल्याने कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपपध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भिलवडी ग्रामपंचायतीच्या एका माजी पदाधिकाऱ्याने दिली.