शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव १८ सप्टेंबरपासून

By admin | Updated: September 4, 2014 00:01 IST

विविध देशांतील ३५ चित्रपटांचा समावेश

कोल्हापूर : निसर्ग संवर्धन हे प्रमुख तत्त्व असलेला पाचवा ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ १८ ते २१ सप्टेंबर दरम्यान कोल्हापुरात होणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ सरव्यवस्थापक विश्वास पाटील व कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शाहू स्मारक भवनमध्ये चार दिवस होणाऱ्या या महोत्सवात रसिकांना वेगवेगळ्या देशांतील पर्यावरणावर आधारित ३५ चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे ‘स्मॉल एफर्ट बीग डिफरन्स - प्रयत्न छोटा, बदल मोठा’ हे ब्रीदवाक्य आहे, तर रिफ्यूज (पर्यावरणास बाधक वस्तू नाकारा), रिड्यूस (निसर्गास बाधा आणणाऱ्या वस्तूंचा कमी वापर करा), रियूज (वस्तूंचा क्षमतेनुसार पुनर्वापर करा), रिसायकल (टाकाऊ वस्तूंपासून नवनिर्मिती करा), रिकव्हर (पाणी, विजेची बचत करून ऊर्जामूल्य वाढवा) या पाच ‘आर’च्या उद्दिष्टांतून उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धा, चर्चा, व्याख्यान, युवा संसद, निसर्ग भ्रमंती अशा उपक्रमांद्वारे पर्यावरण जागृतीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी निसर्ग संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा व्यक्ती व संस्थांचा वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव व वसुंधरा सन्मान असे गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल. शालेय चित्रकला स्पर्धा व आंतरशालेय लघुनाटिका स्पर्धा राम गणेश गडकरी हॉलमध्ये सकाळी नऊ वाजता सुरू होतील. निसर्ग भ्रमंती सहभागासाठीची नावनोंदणी उद्या, बुधवारपासून दुपारी ३ ते ८ या वेळेत केली जाईल. विविध स्पर्धा व चित्रपट महोत्सवातील नावनोंदणीसाठी इच्छुकांनी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्या जुना देवल क्लबजवळील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सदानंद पोसे, दिलीप बापट उपस्थित होते.