शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तरुणीचे अपहरण; गुन्हा ‘मिसिंग’चा

By admin | Updated: May 14, 2016 01:24 IST

कोल्हापुरातही ‘सैराट’ : आर्थिक हितसंबंधांतून तपासाकडे दुर्लक्षाची तक्रार

विश्वास पाटील / कोल्हापूर मुलगा मातंग समाजातला. मुलगी उच्च जातीतली. त्यांचे आठवीपासून प्रेम. जानेवारीत नोंदणी पद्धतीने लग्न झाले. मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी मुलीचे अपहरण केले असून तिचीही स्थिती ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीसारखी होईल, अशी भीती मुलाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. यासंबंधी त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सोमवारी (दि. ९ मे) रोजी तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून घेतली आहे. आर्थिक दबावातून पोलिस या गंभीर प्रकरणाचा तपास करत नसल्याची तक्रार मुलाच्या कुटुंबीयांनी अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांना भेटून केली आहे. या मुलीस कुटुंबीयांनी राजस्थानला नेऊन ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जे घडले ते फारच गंभीर आहे. पोलिस खाते एखाद्या संवेदनशील प्रकरणातही किती बेफिकीर असते याचा दाखला देणारे आहे. हा मुलगा मूळचा राजारामपुरीत राहणारा. सर्वसामान्य कुटुंबातला. मुलगी न्यू पॅलेस परिसरात (पान १ वरून) राहणारी. जातीय व आर्थिकदृष्ट्याही उच्च स्तरातली. दोघेही आयर्विन ख्रिश्चनमध्ये शाळेत होते. आठवीत असल्यापासून त्यांचे प्रेम. त्यास मुलीच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. शेवटी त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दि. १३ जानेवारी २०१६ ला त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले. लग्नानंतरही मुलगी काही दिवस आईच्या घरी राहत होती. त्या दरम्यान त्यांच्याकडून दुसऱ्या लग्नाचा दबाव वाढल्याने या नवदाम्पत्याने दि. १५ एप्रिल २०१६ ला घर सोडले. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच तिच्या पालकांनी दि. १६ एप्रिलला लगेच शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यावेळीही तिथे या मुलीस तिच्या आई व बहिणीकडून पोलिस ठाण्यातच मारहाण झाली; परंतु पोलिसांनी जाब-जबाब घेतला व लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र पाहून सोडून दिले. त्यानंतर हा मुलगा संभाजीनगर परिसरातील ओम गणेश कॉलनीत राहू लागला. दरम्यानच्या काळात मुलीच्या घरातून तिला फोन आला. तुझ्या आईस पक्षाघाताचा झटका आला आहे व तातडीने बघायला ये, असा निरोप देण्यात आला. ती मुलगी तिथे गेल्यावर तिच्याकडून ती वापरत असलेला मोबाईल नंबर घेण्यात आला. आईला बघून ती मुलगी नवऱ्याच्या घरी गेली त्यानंतर तिच्या मोबाईलवर रोज धमकीचे फोन सुरू झाले,त्यास ती वैतागली. काही दिवस असेच गेल्यावर सोमवारी (दि. ९ मे) दुपारी तीनच्या सुमारास संबंधित मुलगा आपल्या आजोळी राजारामपुरीत गेला असताना दोन-तीन अनोळखी स्त्रिया येऊन या मुलीस घेऊन गेल्या. त्यानंतर हा मुलगा तिचा शोध घेण्यासाठी मुलीच्या घरी गेला असता त्याला त्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढले. या घटनेनंतर त्याने थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली व पत्नीच्या अपहरणाची तक्रार नोंदवून घ्या, अशी विनंती पोलिसांना केली. परंतु तिथे ड्युटीवर असलेल्या ‘सुतार’ नावाच्या कॉन्स्टेबलने काही कायदेशीर बाबींमुळे अपहरणाची तक्रार दाखल करून घेता येणार नाही. तुमच्या समाधानासाठी मिसिंगची तक्रार घेतो, असे सांगितले व फिर्यादीची अपहरणाची तक्रार असताना मिसिंगची तक्रार नोंदवून घेतली. या मुलाचे कुटुंबीय फारच आग्रह करू लागल्यावर सुतार दोन कॉन्स्टेबल घेऊन मुलीच्या न्यू पॅलेसमधील घरी गेले तेथून आल्यावर या प्रकरणाचा तपास ठप्पच झाल्याची तक्रार आहे. तपास अधिकारी असलेले सुतार दोन दिवस रजेवरच गेले. शेवटी संबंधित तरुणाने बुधवारी (दि. ११) सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यामध्ये हा प्रकार ‘आॅनर किलिंग’चा असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनीही त्याची दखल घेतली व तातडीने पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना फोनवरून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले; परंतु तोपर्यंत दुसऱ्याच दिवशी चैतन्या यांची बदली झाल्याने हे प्रकरण ‘जैसे थे’ राहिले. ————- ————— हक्कसोडपत्र आपल्यास संपत्तीसाठी त्रास होऊ नये म्हणून संबंधित मुलीने कसबा बावडा न्यायालयात जाऊन हक्कसोडपत्रही करून दिले आहे. ——————————— ५० लाखांचे आमिष मुलीच्या नातेवाईकांनी या मुलास तू आमच्या मुलीस सोड तुला ५० लाख रुपये आम्ही देतो, असे आमिष दाखविले; परंतु त्याने हे आमिष धुडकावून लावले. त्यामुळे तेच नातेवाईक आता आम्ही तुला देणार होतो तेच पैसे पोलिसांना देऊन मुलीला घरी घेऊन जातो, असे उघड-उघड म्हणत असल्याची तक्रार या मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. ——————————— ———————— गुरुवारी वादावादी मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीशी संबंधित एका नातेवाईकाची माहिती दिली असतानाही पोलिसांनी त्याच्याकडून जुजबी माहिती घेत त्यास लगेच सोडून दिल्याने मुलाकडील लोकांना त्याचा राग आला. त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. त्यामुळे गुरुवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोरच जोरदार वाद झाला. ———————-