शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

खोपी - रामजीवाडीत डोंगर कोसळण्याची शक्यता

By admin | Updated: August 6, 2014 00:01 IST

प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी : तात्पुरती राहण्याची सोय, स्थलांतराचा विचार

खेड : तालुक्यातील खोपी - रामजीवाडी येथील धनगर समाजाच्या वस्तीनजीकच्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. यामुळे हा डोंगर कासळण्याची भीती व्यक्त होत असून, प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी मंगळवारी सकाळी या भागाची पाहणी केली. येथील ९ कुटुंबांची व्यवस्था खोपी येथील गावठाण शाळेत आणि हायस्कूलमध्ये करण्यात आली असून, या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.सन २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये या डोंगराला या भेगा पडल्या आहेत़ मुसळधार पावसात हा डोंगर कधीही कोसळू शकतो. दरम्यान, खेडचे प्रांताधिकारी जयकृष्ण फड यांनी मंगळवारी सकाळी रामजीवाडीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तेथील धनगर समाजातील ९ कुटुंबांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था खोपी येथील गावठाण शाळेत आणि हायस्कूलमध्ये केली आहे़ या कुटुंबांचे स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सरपंच प्रणिता भोसले यांनी ही माहिती दिली आहे़ २००५मधील अतिवृष्टीत डोंगराला मोठी भेग पडली होती. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी संतोषकुमार यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून या घरांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होेते. शिवाय येथील तहसीलदारांनी घरांसाठी जागा उपलध करून देण्याविषयी कळविले होते. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी जागाही उपलब्ध केली असूून, त्यासाठी लागणारी कागदपत्रही तहसीलदारांना सादर केली आहेत. मात्र, आजपर्यंत आपल्या घरांचे पुनर्वसन किंवा स्थलांतर करण्याबाबत प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नाहीत, या घरांचे संरक्षण करण्याकामी प्रशासन चालढकल करीत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे. याबाबतचे निवेदन संबंधित ग्रामस्थांनी येथील तहसीलदारांना १ आॅगस्ट रोजी दिले आहे. या डोंगरामध्ये १०० मीटर लांबीची व दोन फूट रूंदीची मोठी भेग पडली आहे. मोठमोठे दगड या दरडीतून खाली येण्याची भीती आहे. ४ जुलै रोजी या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी येथे भेट दिली होती़ यावेळी त्यांनीही ग्रामस्थांना सतर्कतेची सूचना दिली आहे. आता येथील मातीदेखील खाली सरकू लागली आहे. माळीणसारखी घटना घडण्याची शासन प्रतीक्षा करीत नाही ना? अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)