शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खोची - दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निसटू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. पिलरचे दगड निसटत असून, वेळेत त्याची डागडुजी केली नाही तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ निवेदन देतात, तक्रार करतात यावर अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून गेल्यानंतर पुढे काहीच होत नाही, अशी अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष देऊन ही धोकादायक समस्या ताबडतोब मार्गी लावणे गरजेचे आहे.

पन्नास वर्षांपूर्वी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला. यामुळे शेतीला मुबलक पाणीपुरवठा होऊ लागला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारा हा बंधारा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. दोन्ही जिल्ह्यांत जाण्या-येण्यासाठी कमी अंतराचा हा मार्ग झाला.

साहजिकच या ठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. वर्षानुवर्षे ती वाढतच गेली. महापुराच्या फटक्याने या बंधाऱ्याच्या मजबुतीला धक्का लागत गेला. त्यातच अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. क्षमतेपेक्षा ओझे वाढू लागल्याने बंधाऱ्याचे पिलर कमकुवत होत आहेत.

पिलरचे दगड खालच्या भागातून निसटून पडू लागले आहेत. बाजूला असणारा भरावही ढासळत आहे. तीन वर्षांपूर्वी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमान उभी केली; पण वाहतूक सुरूच ठेवण्यासाठी त्या कमानीचे खांब काढून नदीत टाकून दिले. त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.

या वाहतुकीच्या रेट्यात बंधारा मात्र ओझं सहन न व्हावे अशा अवस्थेत सापडला आहे. वेळेत याची दुरुस्ती झाली नाही तर मोठा अपघात होऊन अनर्थ होऊ शकतो, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी हे काम हातात घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

चौकट-१) गेल्या आठवड्यात दुधगाव येथील युवक पोहण्यासाठी येथे आला होता. त्याने हातात प्लास्टिक कॅन घेऊन बंधाऱ्यावरून नदीत उडी मारली. दुर्दैवाने कॅन हातातून निसटल्याने तो बुडाला. पिलरच्या निसटलेल्या दगडाच्या ठिकाणी तो अडकला. त्याचा मृतदेह काढण्यासाठी तीन दिवस प्रयत्न करावे लागले.

यावरून किती भयावह व धोकादायक अवस्था या पिलरची झाली आहे हे लक्षात येते.

२) हा बंधारा वाहतूक वाढल्यामुळे धोकादायक बनला आहे. पिलरचे दगड निखळू लागले आहेत. शेजारीच सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून अवधी आहे. बंधारा दुरुस्त करावा यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

अमरसिंह पाटील-माजी उपसरपंच, खोची.

फोटो ओळी-वारणा नदीवर असणाऱ्या खोची-दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निखळू लागल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.