शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

खोची - दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निसटू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. पिलरचे दगड निसटत असून, वेळेत त्याची डागडुजी केली नाही तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ निवेदन देतात, तक्रार करतात यावर अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून गेल्यानंतर पुढे काहीच होत नाही, अशी अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष देऊन ही धोकादायक समस्या ताबडतोब मार्गी लावणे गरजेचे आहे.

पन्नास वर्षांपूर्वी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला. यामुळे शेतीला मुबलक पाणीपुरवठा होऊ लागला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारा हा बंधारा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. दोन्ही जिल्ह्यांत जाण्या-येण्यासाठी कमी अंतराचा हा मार्ग झाला.

साहजिकच या ठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. वर्षानुवर्षे ती वाढतच गेली. महापुराच्या फटक्याने या बंधाऱ्याच्या मजबुतीला धक्का लागत गेला. त्यातच अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. क्षमतेपेक्षा ओझे वाढू लागल्याने बंधाऱ्याचे पिलर कमकुवत होत आहेत.

पिलरचे दगड खालच्या भागातून निसटून पडू लागले आहेत. बाजूला असणारा भरावही ढासळत आहे. तीन वर्षांपूर्वी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमान उभी केली; पण वाहतूक सुरूच ठेवण्यासाठी त्या कमानीचे खांब काढून नदीत टाकून दिले. त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.

या वाहतुकीच्या रेट्यात बंधारा मात्र ओझं सहन न व्हावे अशा अवस्थेत सापडला आहे. वेळेत याची दुरुस्ती झाली नाही तर मोठा अपघात होऊन अनर्थ होऊ शकतो, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी हे काम हातात घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

चौकट-१) गेल्या आठवड्यात दुधगाव येथील युवक पोहण्यासाठी येथे आला होता. त्याने हातात प्लास्टिक कॅन घेऊन बंधाऱ्यावरून नदीत उडी मारली. दुर्दैवाने कॅन हातातून निसटल्याने तो बुडाला. पिलरच्या निसटलेल्या दगडाच्या ठिकाणी तो अडकला. त्याचा मृतदेह काढण्यासाठी तीन दिवस प्रयत्न करावे लागले.

यावरून किती भयावह व धोकादायक अवस्था या पिलरची झाली आहे हे लक्षात येते.

२) हा बंधारा वाहतूक वाढल्यामुळे धोकादायक बनला आहे. पिलरचे दगड निखळू लागले आहेत. शेजारीच सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून अवधी आहे. बंधारा दुरुस्त करावा यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

अमरसिंह पाटील-माजी उपसरपंच, खोची.

फोटो ओळी-वारणा नदीवर असणाऱ्या खोची-दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निखळू लागल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.