शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

खोची - दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निसटू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : वारणा नदीवर खोची-दुधगावदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्तीअभावी नाजूक परिस्थिती बनत चालली आहे. पिलरचे दगड निसटत असून, वेळेत त्याची डागडुजी केली नाही तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ निवेदन देतात, तक्रार करतात यावर अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून गेल्यानंतर पुढे काहीच होत नाही, अशी अवस्था आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी लक्ष देऊन ही धोकादायक समस्या ताबडतोब मार्गी लावणे गरजेचे आहे.

पन्नास वर्षांपूर्वी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला. यामुळे शेतीला मुबलक पाणीपुरवठा होऊ लागला. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणारा हा बंधारा वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. दोन्ही जिल्ह्यांत जाण्या-येण्यासाठी कमी अंतराचा हा मार्ग झाला.

साहजिकच या ठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. वर्षानुवर्षे ती वाढतच गेली. महापुराच्या फटक्याने या बंधाऱ्याच्या मजबुतीला धक्का लागत गेला. त्यातच अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. क्षमतेपेक्षा ओझे वाढू लागल्याने बंधाऱ्याचे पिलर कमकुवत होत आहेत.

पिलरचे दगड खालच्या भागातून निसटून पडू लागले आहेत. बाजूला असणारा भरावही ढासळत आहे. तीन वर्षांपूर्वी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमान उभी केली; पण वाहतूक सुरूच ठेवण्यासाठी त्या कमानीचे खांब काढून नदीत टाकून दिले. त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.

या वाहतुकीच्या रेट्यात बंधारा मात्र ओझं सहन न व्हावे अशा अवस्थेत सापडला आहे. वेळेत याची दुरुस्ती झाली नाही तर मोठा अपघात होऊन अनर्थ होऊ शकतो, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी हे काम हातात घेणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

चौकट-१) गेल्या आठवड्यात दुधगाव येथील युवक पोहण्यासाठी येथे आला होता. त्याने हातात प्लास्टिक कॅन घेऊन बंधाऱ्यावरून नदीत उडी मारली. दुर्दैवाने कॅन हातातून निसटल्याने तो बुडाला. पिलरच्या निसटलेल्या दगडाच्या ठिकाणी तो अडकला. त्याचा मृतदेह काढण्यासाठी तीन दिवस प्रयत्न करावे लागले.

यावरून किती भयावह व धोकादायक अवस्था या पिलरची झाली आहे हे लक्षात येते.

२) हा बंधारा वाहतूक वाढल्यामुळे धोकादायक बनला आहे. पिलरचे दगड निखळू लागले आहेत. शेजारीच सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून अवधी आहे. बंधारा दुरुस्त करावा यासाठी संबंधित विभागाला कळविले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

अमरसिंह पाटील-माजी उपसरपंच, खोची.

फोटो ओळी-वारणा नदीवर असणाऱ्या खोची-दुधगाव बंधाऱ्याच्या पिलरचे दगड निखळू लागल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.