शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

गरजेइतकेच कमवावे, हीच आरोग्याची गुरुकिल्ली

By admin | Updated: May 1, 2015 00:14 IST

धनंजय गुंडे : ‘लोकमत’ इचलकरंजी वर्धापनदिनानिमित्त आयोजन

इचलकरंजी : स्वत:च्या आवश्यकतेपेक्षा जादा द्रव्याचा संचय करणे म्हणजे अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे जीवघेणे आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या जीवनात शिस्त लावून घेऊन आपल्या आवश्यकइतकेच कमवावे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांनी व्यक्त केले.‘लोकमत’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. धनंजय गुंडे यांचे ‘उत्तम आरोग्यासाठी जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान झाले. सुमारे दीड तासाच्या शैलीदार भाषणात त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. श्रोत्यांना प्रश्न-उत्तरे करीत आणि हसत-खेळत त्यांनी दिलेले प्रबोधनाचे व्याख्यान सर्वांना भावले.डॉ. गुंडे म्हणाले, जीवनात शिस्त हवी. तसेच नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. त्यातूनच सर्व व्याधींना सुरुवात होते. त्यामुळे आवश्यक गरजेपुरते कमवा आणि त्यानंतर चिंताविरहित जीवन जगा, हेच सूत्र आपल्या जीवनात कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही निराश व्हावे लागणार नाही.सध्या वाहिन्यांचे मायाजाल सुरू आहे. या वाहिन्यांवरील मालिकाही आपले जीवन बिघडवू शकतात. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलांना अशा मालिकांपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनीही तथाकथित कौटुंबिक व स्त्री प्रधान असे म्हणविणाऱ्या मालिकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यामध्ये स्त्री ही पाताळयंत्री असते, असे सर्रास भासविले जाते. आपल्या परंपरागत संस्कारातूनच मुलांची जडणघडण झाली पाहिजे. त्यामुळे परस्परांवरील असलेले नातेसंबंध आणि माणसा-माणसांतील आवडी-निवडी जपल्या जातात आणि कुटुंब सुसंस्कृत बनते, असेही डॉ. गुंडे यांनी स्पष्ट केले.संपादक वसंत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सपना मेळवंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, ज्येष्ठ उद्योजक मदनलाल बोहरा, गुंडोपंत रोजे-चौगुले, शशिकला बोरा, आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जीवनात शिस्त महत्त्वाची असून, दैनंदिन नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा.नातेसंबंध जपले पाहिजेत.