शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

गरजेइतकेच कमवावे, हीच आरोग्याची गुरुकिल्ली

By admin | Updated: May 1, 2015 00:14 IST

धनंजय गुंडे : ‘लोकमत’ इचलकरंजी वर्धापनदिनानिमित्त आयोजन

इचलकरंजी : स्वत:च्या आवश्यकतेपेक्षा जादा द्रव्याचा संचय करणे म्हणजे अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे जीवघेणे आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या जीवनात शिस्त लावून घेऊन आपल्या आवश्यकइतकेच कमवावे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांनी व्यक्त केले.‘लोकमत’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. धनंजय गुंडे यांचे ‘उत्तम आरोग्यासाठी जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान झाले. सुमारे दीड तासाच्या शैलीदार भाषणात त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. श्रोत्यांना प्रश्न-उत्तरे करीत आणि हसत-खेळत त्यांनी दिलेले प्रबोधनाचे व्याख्यान सर्वांना भावले.डॉ. गुंडे म्हणाले, जीवनात शिस्त हवी. तसेच नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. त्यातूनच सर्व व्याधींना सुरुवात होते. त्यामुळे आवश्यक गरजेपुरते कमवा आणि त्यानंतर चिंताविरहित जीवन जगा, हेच सूत्र आपल्या जीवनात कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही निराश व्हावे लागणार नाही.सध्या वाहिन्यांचे मायाजाल सुरू आहे. या वाहिन्यांवरील मालिकाही आपले जीवन बिघडवू शकतात. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलांना अशा मालिकांपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनीही तथाकथित कौटुंबिक व स्त्री प्रधान असे म्हणविणाऱ्या मालिकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यामध्ये स्त्री ही पाताळयंत्री असते, असे सर्रास भासविले जाते. आपल्या परंपरागत संस्कारातूनच मुलांची जडणघडण झाली पाहिजे. त्यामुळे परस्परांवरील असलेले नातेसंबंध आणि माणसा-माणसांतील आवडी-निवडी जपल्या जातात आणि कुटुंब सुसंस्कृत बनते, असेही डॉ. गुंडे यांनी स्पष्ट केले.संपादक वसंत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सपना मेळवंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, ज्येष्ठ उद्योजक मदनलाल बोहरा, गुंडोपंत रोजे-चौगुले, शशिकला बोरा, आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जीवनात शिस्त महत्त्वाची असून, दैनंदिन नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा.नातेसंबंध जपले पाहिजेत.