शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गरजेइतकेच कमवावे, हीच आरोग्याची गुरुकिल्ली

By admin | Updated: May 1, 2015 00:14 IST

धनंजय गुंडे : ‘लोकमत’ इचलकरंजी वर्धापनदिनानिमित्त आयोजन

इचलकरंजी : स्वत:च्या आवश्यकतेपेक्षा जादा द्रव्याचा संचय करणे म्हणजे अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे जीवघेणे आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या जीवनात शिस्त लावून घेऊन आपल्या आवश्यकइतकेच कमवावे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांनी व्यक्त केले.‘लोकमत’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. धनंजय गुंडे यांचे ‘उत्तम आरोग्यासाठी जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान झाले. सुमारे दीड तासाच्या शैलीदार भाषणात त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. श्रोत्यांना प्रश्न-उत्तरे करीत आणि हसत-खेळत त्यांनी दिलेले प्रबोधनाचे व्याख्यान सर्वांना भावले.डॉ. गुंडे म्हणाले, जीवनात शिस्त हवी. तसेच नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. त्यातूनच सर्व व्याधींना सुरुवात होते. त्यामुळे आवश्यक गरजेपुरते कमवा आणि त्यानंतर चिंताविरहित जीवन जगा, हेच सूत्र आपल्या जीवनात कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही निराश व्हावे लागणार नाही.सध्या वाहिन्यांचे मायाजाल सुरू आहे. या वाहिन्यांवरील मालिकाही आपले जीवन बिघडवू शकतात. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलांना अशा मालिकांपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनीही तथाकथित कौटुंबिक व स्त्री प्रधान असे म्हणविणाऱ्या मालिकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यामध्ये स्त्री ही पाताळयंत्री असते, असे सर्रास भासविले जाते. आपल्या परंपरागत संस्कारातूनच मुलांची जडणघडण झाली पाहिजे. त्यामुळे परस्परांवरील असलेले नातेसंबंध आणि माणसा-माणसांतील आवडी-निवडी जपल्या जातात आणि कुटुंब सुसंस्कृत बनते, असेही डॉ. गुंडे यांनी स्पष्ट केले.संपादक वसंत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सपना मेळवंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, ज्येष्ठ उद्योजक मदनलाल बोहरा, गुंडोपंत रोजे-चौगुले, शशिकला बोरा, आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जीवनात शिस्त महत्त्वाची असून, दैनंदिन नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा.नातेसंबंध जपले पाहिजेत.