शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

गरजेइतकेच कमवावे, हीच आरोग्याची गुरुकिल्ली

By admin | Updated: May 1, 2015 00:14 IST

धनंजय गुंडे : ‘लोकमत’ इचलकरंजी वर्धापनदिनानिमित्त आयोजन

इचलकरंजी : स्वत:च्या आवश्यकतेपेक्षा जादा द्रव्याचा संचय करणे म्हणजे अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे जीवघेणे आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या जीवनात शिस्त लावून घेऊन आपल्या आवश्यकइतकेच कमवावे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांनी व्यक्त केले.‘लोकमत’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. धनंजय गुंडे यांचे ‘उत्तम आरोग्यासाठी जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान झाले. सुमारे दीड तासाच्या शैलीदार भाषणात त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. श्रोत्यांना प्रश्न-उत्तरे करीत आणि हसत-खेळत त्यांनी दिलेले प्रबोधनाचे व्याख्यान सर्वांना भावले.डॉ. गुंडे म्हणाले, जीवनात शिस्त हवी. तसेच नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. त्यातूनच सर्व व्याधींना सुरुवात होते. त्यामुळे आवश्यक गरजेपुरते कमवा आणि त्यानंतर चिंताविरहित जीवन जगा, हेच सूत्र आपल्या जीवनात कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही निराश व्हावे लागणार नाही.सध्या वाहिन्यांचे मायाजाल सुरू आहे. या वाहिन्यांवरील मालिकाही आपले जीवन बिघडवू शकतात. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलांना अशा मालिकांपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनीही तथाकथित कौटुंबिक व स्त्री प्रधान असे म्हणविणाऱ्या मालिकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यामध्ये स्त्री ही पाताळयंत्री असते, असे सर्रास भासविले जाते. आपल्या परंपरागत संस्कारातूनच मुलांची जडणघडण झाली पाहिजे. त्यामुळे परस्परांवरील असलेले नातेसंबंध आणि माणसा-माणसांतील आवडी-निवडी जपल्या जातात आणि कुटुंब सुसंस्कृत बनते, असेही डॉ. गुंडे यांनी स्पष्ट केले.संपादक वसंत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सपना मेळवंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, ज्येष्ठ उद्योजक मदनलाल बोहरा, गुंडोपंत रोजे-चौगुले, शशिकला बोरा, आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जीवनात शिस्त महत्त्वाची असून, दैनंदिन नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा.नातेसंबंध जपले पाहिजेत.