शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केरळात डाव्या पक्षांना सोने महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली ...

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली खरी. मात्र, गतवर्षी केरळमध्ये झालेल्या सोने तस्करीचे भूत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या पक्षांच्या मानगुटीवर बसल्याने डाव्या पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची नावे सोने तस्करी प्रकरणात अडकल्याने विरोधकांनी डाव्यांविरोधात रान उठविले आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी उकरून काढलेले सोनं डाव्यांना महागात पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर तेथे मोठ्या संसर्गाची भीती व्यक्त झाली होती. मात्र, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळाने कोरोनाकाळात सर्वाधिक चांगल्या उपाययोजना करीत कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. विशेषत: आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्या कामाची तर जगभर स्तुती झाली होती. ६० लाख नागरिकांना प्रत्येकी १६०० रुपये पेन्शन, ८० लाख कुटुंबांना धान्य कीट, तर कोरोना रुग्णावर मोफत उपचार यासारख्या अनेक सुविधा देऊन केरळमधील एलडीएफ सरकारने आपली प्रतिमा उंचावली आहे. कोरोनाकाळातील हेच काम घेऊन एलडीएफ सरकार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. त्यासाठी राज्यभर कॅम्पेनही चालविले जात आहे. मात्र, सोने तस्करीचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावरच विरोधकांनी उकरून काढल्याने एलडीएफ सरकार आरोपांच्या पिंजऱ्यात घेरले आहे.

शबरीमाला नव्हे...सोन्यावर बोला

शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरुन केरळमध्ये डावे पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असतात. लोकसभा निवडणुकीत तर भाजपने शबरीमाला मंदिराचा मुद्दा घेऊन राज्यभर डाव्यांविरोधात संघर्ष केला. यात हिंदुच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्यातही भाजप काही प्रमाणात यशस्वी ठरला. विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजपने

शबरीमालापेक्षाही सोने तस्करीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत डाव्यांना खिंडीत गाठले आहे. यासाठी भाजपला केंद्राकडूनही रसद दिली जात असल्याने भाजपने सोनेतस्करीच प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवली आहे.

...तरीही मिळवला होता डाव्यांनी विजय

सोने तस्करीची घटना ही ५ जुलै २०२० रोजी घडली होती. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. ५ पैकी ४ महानगरपालिका तर १५० पैकी १०८ पंचायत समित्यांवर डाव्यांनी झेंडा फडकविला होता. मात्र, त्यावेळच्या निवडणुकांवेळी या प्रकरणात डाव्या पक्षांचे नाव थेट नसल्याने त्याचा परिणाम निकालात दिसला नाही. आता मात्र, सोने तस्करीचा मुद्दा थेट डाव्यांभोवतीच फिरू लागल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण : ५ जुलै २०२० रोजी येथील त्रिवेंद्रम विमानतळावर ३० किलो सोने शौचालयासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये आढळले होते. यामध्ये स्वप्ना सुरेश या महिलेला अटक करण्यात आली होती. संबंधित महिला डाव्या लोकशाही आघाडीची निकटवर्तीय असल्याचा आरोप सातत्याने होत होता. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने या सोने तस्करीमध्ये थेट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह तीन मंत्र्यांची नावे घेतल्याने एलडीएफ सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे याच सोने तस्करीच्या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांनाही पदावरून पायउतार व्हावं लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून या तस्करीचे रॅकेट चालिवल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.