शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

केरळात डाव्या पक्षांना सोने महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली ...

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली खरी. मात्र, गतवर्षी केरळमध्ये झालेल्या सोने तस्करीचे भूत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या पक्षांच्या मानगुटीवर बसल्याने डाव्या पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची नावे सोने तस्करी प्रकरणात अडकल्याने विरोधकांनी डाव्यांविरोधात रान उठविले आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी उकरून काढलेले सोनं डाव्यांना महागात पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर तेथे मोठ्या संसर्गाची भीती व्यक्त झाली होती. मात्र, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळाने कोरोनाकाळात सर्वाधिक चांगल्या उपाययोजना करीत कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. विशेषत: आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्या कामाची तर जगभर स्तुती झाली होती. ६० लाख नागरिकांना प्रत्येकी १६०० रुपये पेन्शन, ८० लाख कुटुंबांना धान्य कीट, तर कोरोना रुग्णावर मोफत उपचार यासारख्या अनेक सुविधा देऊन केरळमधील एलडीएफ सरकारने आपली प्रतिमा उंचावली आहे. कोरोनाकाळातील हेच काम घेऊन एलडीएफ सरकार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. त्यासाठी राज्यभर कॅम्पेनही चालविले जात आहे. मात्र, सोने तस्करीचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावरच विरोधकांनी उकरून काढल्याने एलडीएफ सरकार आरोपांच्या पिंजऱ्यात घेरले आहे.

शबरीमाला नव्हे...सोन्यावर बोला

शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरुन केरळमध्ये डावे पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असतात. लोकसभा निवडणुकीत तर भाजपने शबरीमाला मंदिराचा मुद्दा घेऊन राज्यभर डाव्यांविरोधात संघर्ष केला. यात हिंदुच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्यातही भाजप काही प्रमाणात यशस्वी ठरला. विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजपने

शबरीमालापेक्षाही सोने तस्करीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत डाव्यांना खिंडीत गाठले आहे. यासाठी भाजपला केंद्राकडूनही रसद दिली जात असल्याने भाजपने सोनेतस्करीच प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवली आहे.

...तरीही मिळवला होता डाव्यांनी विजय

सोने तस्करीची घटना ही ५ जुलै २०२० रोजी घडली होती. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. ५ पैकी ४ महानगरपालिका तर १५० पैकी १०८ पंचायत समित्यांवर डाव्यांनी झेंडा फडकविला होता. मात्र, त्यावेळच्या निवडणुकांवेळी या प्रकरणात डाव्या पक्षांचे नाव थेट नसल्याने त्याचा परिणाम निकालात दिसला नाही. आता मात्र, सोने तस्करीचा मुद्दा थेट डाव्यांभोवतीच फिरू लागल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण : ५ जुलै २०२० रोजी येथील त्रिवेंद्रम विमानतळावर ३० किलो सोने शौचालयासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये आढळले होते. यामध्ये स्वप्ना सुरेश या महिलेला अटक करण्यात आली होती. संबंधित महिला डाव्या लोकशाही आघाडीची निकटवर्तीय असल्याचा आरोप सातत्याने होत होता. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने या सोने तस्करीमध्ये थेट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह तीन मंत्र्यांची नावे घेतल्याने एलडीएफ सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे याच सोने तस्करीच्या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांनाही पदावरून पायउतार व्हावं लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून या तस्करीचे रॅकेट चालिवल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.