शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेला बाजूला ठेवून देशात कारभार : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:08 IST

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, ...

ठळक मुद्देयामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहेबेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते

बेळगाव : राज्यघटना बाजूला ठेवून समांतर कारभार सध्या देशात सुरू असल्याचे चित्र आहे आणि लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे, त्यामुळे वेळीच सावध व्हायला हवे, असे मत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

येथील ज्योती महाविद्यालयात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि दि सह्याद्री को-आॅप. सोसायटी लिमिटेडच्या वतीने महात्मा जोतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित महात्मा फुले व्याख्यानमालेतील ‘राज्यघटना आणि सद्य:स्थिती’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतानाभोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते.

भोसले म्हणाले की, गेल्या काही वर्षांत संविधान बचाव आंदोलन सुरू झाले आहे. याला कारण सरकारचा व्यवहारच संशयास्पद वाटतो आहे. एवढेच नाही, तर राज्यघटनेचा वापर निवडणुकीपुरता करून आपल्याला हवा तसा कारभार चालविता येईल अशी समांतर व्यवस्था आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचे सध्याचे देशातील चित्र आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वांशी फारकत सुरू आहे. त्यामुळे घटना बदलणे किंवा त्यामध्ये सुधारणा या गोष्टी आता मागे पडल्या आहेत.

राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, सर्वांना शिक्षण आणि विकासाची संधी देण्याच्या तत्त्वांबाबतही असेच चित्र आहे. सर्वसामान्यांसाठी शिक्षण आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शिक्षण घेणार आणि पुढे जाणार आहे. यामुळे सामाजिक विषमतेची मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे.

महाराष्ट्र शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनल्याचे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अलीकडे केले आहे. यावरून शेतकºयांची अवस्था लक्षात येते. शेती, शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांसह रोजंदारी कर्मचाºयांची स्थिती चिंतनीय झाली आहे. समाजातील ७० टक्के वर्गाची अशी स्थिती झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर समाजात विघटन होण्याचा मोठा धोका आहे, असा इशाराही भोसले यांनी दिला.

तत्पूर्वी म. फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी महिलांना समान हक्क कधी मिळणार असा सवाल शबरीमाला, शनिशिंगणापूर यासारखी महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या लढ्याची उदाहरणे देऊन केला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपक दळवी यांना अश्रू अनावरसंपादक वसंत भोसले यांनी आपल्या व्याख्यानात सीमाप्रश्न आणि काश्मीरच्या प्रश्नाने मी व्यथित होतो, असे सांगून मराठी भाषिक बहुसंख्येने असल्याने महाराष्टत सामील होण्याचा त्यांचा हक्क डावलला गेला आहे. तो मिळविण्यासाठी महाराष्टÑ एकीकरण समितीचा लढा अव्याहतपणे सुरू आहे. समितीचे ज्येष्ठ नेते दीपक दळवी यांच्यासारख्यांनी त्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे, असे सांगताच श्रोत्यांमध्ये असलेले दीपक दळवी अत्यंत भावुक झाले. व्याख्यानानंतर व्यासपीठावर येऊन त्यांनी संपादकांना आलिंगन दिले. आपल्या लढ्याला बेळगावबाहेरच्या मराठी भाषिकांचीही साथ आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. सीमाप्रश्नासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत लढत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :belgaonबेळगावmarathiमराठीkolhapurकोल्हापूर