शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोटजाती बाजूला ठेवा, आरक्षणासाठी एकसंध व्हा

By admin | Updated: June 25, 2017 01:16 IST

निरामहरी रूपनर : धनगर समाज आरक्षण मेळाव्यात शासनावर दबावगट निर्माण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाने एकत्र येऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शासनावर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. समाजाने हे आरक्षण आताच मिळावे ही भूमिका ठेवली पाहिजे. आता नाही तर पुन्हा कधीही नाही, अशी अवस्था निर्माण झाल्याने समाजातील सर्व पोटजाती विसर्जित करून फक्त धनगर हीच जात मानून एकत्र लढा देण्याची गरज असल्याचे धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आमदार रामहरी रूपनर यांनी सांगितले.धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच याबाबत समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शनिवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणीत मल्हार सेना व युवक संघटनेच्या वतीने धनगर आरक्षण मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी आमदार रूपनर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे हे होते.आमदार रूपनर म्हणाले, धनगर समाजाची २७ पोटजातींमध्ये विभागलेली ताकद फक्त धनगर समाजाच्या नावाखाली एकत्र यावी. बारामतीत समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला होता. त्यामुळे आरक्षण मिळू शकले नाही. आता आरक्षण मिळविण्यासाठी शासनावर दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. निवडणुका नजीक आल्या आहेत. त्यासाठी राज्यभरात असणाऱ्या एकूण १४ टक्के समाजाने एकसंध राहून लढा निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.बबनराव रानगे म्हणाले, सर्वच पक्षांच्या सरकारांनी धनगर समाजाला फसविले आहे. आता समाजाने एकसंध होऊन आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही. त्यासाठी सर्व पोटजाती बाजूला ठेवून एकसंध व्हा.अहिल्यादेवी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पाताई गुलवाडे म्हणाल्या, भविष्यात आपल्या मुलाबाळांचा विकास करण्यासाठी आरक्षणाच्या लढाईत रस्त्यावर उतरावे लागेल. बारामतीत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजाला शेळी-मेंढीप्रमाणे समजल्याने समाज त्यांना योग्य वेळी खाली खेचेल, असाही इशारा त्यांनी दिला. महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे यांनी स्वागत केले. नूतन नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले; तर मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रकाश पुजारी, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, आदींनी आपले विचार मांडले. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, नगरसेवक राजसिंह शेळके, मल्लू खोत, बापूसाहेब ठोंबरे, राजू दळवाई, कमलाकर जानकर, बाजीराव शेळके, प्रल्हाद देबाजे, बाळासाहेब दार्इंगडे, शहाजी सिद्ध, बाबूराव बोडके, नाना पुजारी, आदी उपस्थित होते.सत्तास्थाने मिळाल्यानंतर काहींना समाजाचा विसरधनगर समाजातील काही प्रवृत्ती आंदोलनाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा करतात; पण सत्तास्थाने मिळाल्यानंतर त्यांना समाजाचा विसर पडतो, अशी टीका कोणाचेही नाव न घेता करून आमदार रूपनर यांनी, अशा प्रवृत्तींना समाजाने वेळीच ओळखून बाजूला सारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.