शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कवठेगुलंदला प्रतीक्षा प्राथमिक आरोग्य केंद्राची

By admin | Updated: April 28, 2015 00:22 IST

राजकीय इच्छाशक्तीची गरज : वीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; मंजुरी असूनही कार्यवाही नाही

संदीप बावचे - जयसिंगपूर -नेमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांचा पूर येतो; मात्र प्रत्यक्षात प्रश्न तडीस लागत नाही. शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे भिजत पडला आहे. कृष्णा नदीपलीकडील कवठेगुलंद येथे हे आरोग्य केंद्र होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खरी गरज आहे.कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम्, सुफलाम् बनला आहे. पावसाळ्यात दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने नृसिंहवाडी-औरवाड जुन्या पुलाला पर्यायी पूल बांधावा अशी मागणी जोर धरल्यानंतर व २००५-०६ ला महापूर येऊन गेल्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला. नदीपलीकडील औरवाडसह गौरवाड, बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी या सात गावांना नवीन पुलामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच शासकीय आरोग्य सुविधा मिळावी, कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. मध्यंतरीच्या काळात नृसिंहवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळून याठिकाणी इमारत उभारण्यात आली. मात्र, कवठेगुलंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे कागदावरच राहिला आहे. आरोग्य केंद्र मंजूर आहे; मात्र कार्यवाही होत नसल्याने हा प्रश्न ‘जैसे थै’ आहे. उपकेंद्रे असली तरी तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांअभावी रुग्णांना सुविधा मिळण्यास अडचणी ठरतात. यामुळे नदीपलीकडील नागरिकांना एकतर नृसिंहवाडी, कुरुंदवाड अथवा जयसिंगपूरकडे उपचारासाठी जावे लागते. पावसाळ्यात तर नाहक त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधींकडून कवठेगुलंद येथे आरोग्य केंद्र होण्याबाबत आश्वासनांचा पूरच आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. मात्र, हा प्रश्न अजूनही तडीस गेलेला नाही. आरोग्य केंद्र मंजूर असताना कार्यवाही का होत नाही, असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत. आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाला हा प्रश्न सोडविता आलेला नाही. राजकीय इच्छाशक्ती एकवटली तरच हा प्रश्न मिटेल व प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.पाठपुरावा करणारशिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना आपण पत्रव्यवहार केला आहे. कवठेगुलंदसह गणेशवाडी, आलास, शेडशाळ, गौरवाड येथील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.वरिष्ठांकडे अहवालकवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. वरिष्ठ पातळीकडे याबाबतचा अहवाल पाठविलेला आहे. कार्यवाही झाली नसल्यामुळे आरोग्य केंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.