शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी मुलींना आता स्वयंरोजगार प्रशिक्षण

By admin | Updated: February 20, 2015 23:12 IST

आदिक कदम : बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचा उपक्रम

कोल्हापूर : काश्मीरमधील निराधार मुलींना शालेय शिक्षणाबरोबरच आता स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या मार्च महिन्यापासून होणार असल्याचे बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचे संस्थापक आदिक कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कदम म्हणाले, बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनने जम्मू आणि काश्मीरमध्ये निराधार मुलींच्या शिक्षणासाठी चार घरे सुरू केली आहेत. या घरांतून १७० मुली शिक्षण घेत आहेत. प्रतिकुल परिस्थिती असणाऱ्या काश्मिरी मुलींना शिक्षण देऊन त्यांना नोकऱ्या मिळतील; परंतु बेरोजगारी मुलींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यासाठी संस्थेच्याच मुलींना गेल्या चार महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात मुलींसोबत काश्मिरी महिलांनाही संधी देण्यात येणार आहे. संस्थेतील एक शिक्षक शेख जहूर म्हणाले की, अनंत अडचणी असल्या तरी संस्थेचे काम चांगले चालले आहे. स्थानिक सरकारलाही जेथे निवासी शाळा काढणे शक्य झाले नाही, ते या संस्थेने करून दाखविले. मुलींच्या शिक्षणाकडे सरकारचे लक्ष नव्हते अशा कालखंडात निवासी शाळा सुरू करून अनाथ, गरीब कुटुंबातील मुलींना जगण्याची एक नवी संधी संस्थेने दिली आहे. काश्मीरमधील बडगांम जिल्ह्यातील बिरवा येथील संस्थेच्या घरातील २५ मुली महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या असून, चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात आल्या आहेत. त्यांनी येथील न्यू पॅलेस, पन्हाळा, गंधर्व रिसॉर्ट, कणेरी मठ पाहिला. सागर बगाडे व कोल्हापूर केअर संस्थेने या मुलींना भेटवस्तू दिल्या. मुस्लिम बोर्डिंगमध्ये या मुलींचा कोल्हापुरातील मुलींशी संवाद घडवून आणण्यात आला. सांस्कृतिक देवाण-घेवाण झाली. गोव्यात जाऊन या मुलींनी आयुष्यात प्रथमच समुद्राचे दर्शन घेतले. क्रुझवरून फिरण्याचा आनंद लुटला. यावेळी गणी आजरेकर, मिलिंद धोंड,जयेश कदम, आसीफ जमादार आदी उपस्थित होते.