शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’ला अर्ज करण्यात करवीर तालुका आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कौशल्यपूर्ण शिक्षण मिळत असल्याने शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाला दहावी उत्तीर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कौशल्यपूर्ण शिक्षण मिळत असल्याने शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाला दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्राध्यान्य देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ‘आयटीआय’ प्रवेशासाठी अर्ज करण्यात करवीर तालुक्यातील विद्यार्थी आघाडीवर आहे. या तालुक्यातील एकूण २१५३ जणांनी अर्ज केले आहेत. पुणे विभागात साडेआठ हजार अर्जांसह कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोनामुळे रोजगाराभिमुख शिक्षणाचे महत्त्व सर्वांना समजले आहे. त्यामुळे आयटीआय आणि पॉलिटेक्निकमधील अभ्यासक्रमांना प्रवेशित होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत आयटीआय प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ शासकीय आणि ३९ खासगी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि.१५ जुलैपासून सुरू झाली. त्याची मुदत दि.३१ ऑगस्ट रोजी संपली. या मुदतीत एकूण ८५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ८३९९ जणांनी अर्ज निश्चिती, तर ७८५० विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांचे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया नोंदविली आहे.

समाधानकारक चित्र

आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रवेश जागांच्या तुलनेत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे यावर्षीचे प्रमाण समाधानकारक आहे. अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी (दि.४) प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील प्रवेशाची प्रक्रिया सोमवार (दि.६) पासून सुरू होणार असल्याचे कळंबा येथील शासकीय आयटीआयचे प्राचार्य आर.एस. मुंडासे यांनी गुरुवारी सांगितले.

‘आयटीआय’ सुरू करण्यास परवानगी

शासकीय आणि खासगी आयटीआय सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नोव्हेंबर ते मार्चपर्यंत केवळ चारच महिने प्रशिक्षण झाले. ते अद्याप अपूर्ण राहिले आहे. विद्यार्थ्यांना यंत्रसामग्रीवर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांची अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करत आयटीआय सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

तालुकानिहाय प्रवेश अर्जांची संख्या

करवीर : २१७४

हातकणंगले : १०५०

कागल : ८०५

राधानगरी : ७२५

शिरोळ : ७०२

पन्हाळा : ६३१

गडहिंग्लज : ५७३

भुदरगड : ४७२

चंदगड : ४५८

आजरा : २९३

गगनबावडा : १३५

शाहूवाडी : ४९०