शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

महाराष्ट्रातील उसावर कर्नाटक मारणार डल्ला

By admin | Updated: October 15, 2016 00:56 IST

सीमेवरील कारखाने अडचणीत : १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जहाँगीर शेख ल्ल कागल राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. या निर्णयाचा फटका कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असणाऱ्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होणार असल्याने शासनाने हा निर्णय बदलावा, अशी मागणी सर्वच पातळ्यांवर होत आहे. कर्नाटकापेक्षा १५ दिवस उशिरा महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले, तर कर्नाटकातील सीमेलगतचे साखर कारखाने महाराष्ट्रातील पाच ते सहा लाख मेट्रिक टन उसावर डल्ला मारू शकतात, अशी परिस्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या गळीत हंगामात उसाची उपलब्धता कमी आहे. तीन ते चार महिन्यांचा हंगाम असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हंगाम उशिरा सुरू करून जादा परिक्व झालेला ऊस गाळप करून साखर उत्पादन वाढविण्याच्या हेतूने मंत्री समितीने ही १ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे, पण इथले कारखाने उशिरा सुरू झाले म्हणजे हा ऊस शिवारातच थांबेल, अशी परिस्थिती नाही. यापूर्वीही कर्नाटकातील आठ ते दहा कारखान्यांनी महाराष्ट्रातील उशिरा हंगामाचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात ऊस उचल केली होती. आज तीच परिस्थिती या हंगामात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरबरोबरच सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १५ ते १६ कारखाने कर्नाटकातून ऊस आणतात, तर दोन्ही राज्यातील काही कारखाने ‘मल्टी स्टेट’ अ‍ॅक्टने नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस दराबद्दल आंदोलन छेडले जाते. हंगाम सुरू करण्यास अटकाव केला जातो. चालू वर्षी संघटनेनेही अजून थेट अशी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे साखर कारखानदारही हंगाम कधी सुरू करायचा यासाठी सल्लामसलत करीत आहेत. १ डिसेंबरपूर्वी जर कोणी हंगाम सुरू केलाच तर त्या कारखान्यास प्रतिटन ५०० रुपयांचा दंड आकारण्याची भीतीही घालण्यात आल्याने काहीच हालचाल करता येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. १५ नोेव्हेंबर २०१६ पूर्वीच ऊस गाळप करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. सीमा भागातील प्रमुख कारखाने ४कोल्हापूर जिल्हा : छत्रपती शाहू साखर कारखाना, कागल, जवाहर-हुपरी, ३) दत्त, शिरोळ, ४) पंचगंगा, इचलकरंजी, दौलत, चंदगड. हे पाच कारखाने मल्टिस्टेट आहेत. एकूण गाळपाच्या १५ ते ३० टक्केपर्यंतचा ऊस हे कारखाने कर्नाटकातून आणतात. म्हणजे छत्रपती शाहू साखर कारखाना जवळपास १ लाख मेट्रिक टन, तर जवाहर-हुपरी अडीच ते तीन लाख मेट्रिक टन ऊस कर्नाटकातून आणतो. या शिवाय सरसेनापती संताजी घोरपडे, सदाशिवराव मंडलिक, हमीदवाडा, हेमरस शुगर, गडहिंग्लज, आजरा, शरद-नरंदे, गुरुदत्त टाकळी, दालमिया शुगर हे कारखानेही ५० हजारांपासून दीड-दोन लाख मेट्रिक टनपर्यंतचा ऊस आणतात. या १५ दिवसांच्या फरकामुळे म्हणूनच पाच ते सहा लाख मेट्रिक टनाचा फटका या कारखान्यांना बसणार आहे. म्हणजे एका कारखान्याचा संपूर्ण गाळप हंगामाचा ऊस पळविला जाणार आहे. कर्नाटकातील या कारखान्यांना संधी संकेश्वर साखर कारखाना, चिक्कोडी येथील दूधगंगा-कृष्णा आणि उगार शुगर हे मल्टिस्टेट असल्याने त्याचे हक्काचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात आहेत, तर हालसिद्धनाथ, शिवशक्ती शुगर, व्यंकटेश्वरा, बेडकिहाळ, कागवाड येथील कारखाने या १५ दिवसांत महाराष्ट्रातील ऊस मोठ्या प्रमाणात उचलतील. त्याचबरोबर कर्नाटकातील काही कारखाने पहिली एकच उचल कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करतात. नंतर मात्र एकही उचल देत नाहीत. चालू वर्षी यात वाढच होेण्याची शक्यता आहे.