शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील उसावर कर्नाटक मारणार डल्ला

By admin | Updated: October 15, 2016 00:56 IST

सीमेवरील कारखाने अडचणीत : १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जहाँगीर शेख ल्ल कागल राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ डिसेंबरला सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. या निर्णयाचा फटका कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असणाऱ्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होणार असल्याने शासनाने हा निर्णय बदलावा, अशी मागणी सर्वच पातळ्यांवर होत आहे. कर्नाटकापेक्षा १५ दिवस उशिरा महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाले, तर कर्नाटकातील सीमेलगतचे साखर कारखाने महाराष्ट्रातील पाच ते सहा लाख मेट्रिक टन उसावर डल्ला मारू शकतात, अशी परिस्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे या गळीत हंगामात उसाची उपलब्धता कमी आहे. तीन ते चार महिन्यांचा हंगाम असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हंगाम उशिरा सुरू करून जादा परिक्व झालेला ऊस गाळप करून साखर उत्पादन वाढविण्याच्या हेतूने मंत्री समितीने ही १ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे, पण इथले कारखाने उशिरा सुरू झाले म्हणजे हा ऊस शिवारातच थांबेल, अशी परिस्थिती नाही. यापूर्वीही कर्नाटकातील आठ ते दहा कारखान्यांनी महाराष्ट्रातील उशिरा हंगामाचा लाभ घेत मोठ्या प्रमाणात ऊस उचल केली होती. आज तीच परिस्थिती या हंगामात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरबरोबरच सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३८ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १५ ते १६ कारखाने कर्नाटकातून ऊस आणतात, तर दोन्ही राज्यातील काही कारखाने ‘मल्टी स्टेट’ अ‍ॅक्टने नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस दराबद्दल आंदोलन छेडले जाते. हंगाम सुरू करण्यास अटकाव केला जातो. चालू वर्षी संघटनेनेही अजून थेट अशी कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे साखर कारखानदारही हंगाम कधी सुरू करायचा यासाठी सल्लामसलत करीत आहेत. १ डिसेंबरपूर्वी जर कोणी हंगाम सुरू केलाच तर त्या कारखान्यास प्रतिटन ५०० रुपयांचा दंड आकारण्याची भीतीही घालण्यात आल्याने काहीच हालचाल करता येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. १५ नोेव्हेंबर २०१६ पूर्वीच ऊस गाळप करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. सीमा भागातील प्रमुख कारखाने ४कोल्हापूर जिल्हा : छत्रपती शाहू साखर कारखाना, कागल, जवाहर-हुपरी, ३) दत्त, शिरोळ, ४) पंचगंगा, इचलकरंजी, दौलत, चंदगड. हे पाच कारखाने मल्टिस्टेट आहेत. एकूण गाळपाच्या १५ ते ३० टक्केपर्यंतचा ऊस हे कारखाने कर्नाटकातून आणतात. म्हणजे छत्रपती शाहू साखर कारखाना जवळपास १ लाख मेट्रिक टन, तर जवाहर-हुपरी अडीच ते तीन लाख मेट्रिक टन ऊस कर्नाटकातून आणतो. या शिवाय सरसेनापती संताजी घोरपडे, सदाशिवराव मंडलिक, हमीदवाडा, हेमरस शुगर, गडहिंग्लज, आजरा, शरद-नरंदे, गुरुदत्त टाकळी, दालमिया शुगर हे कारखानेही ५० हजारांपासून दीड-दोन लाख मेट्रिक टनपर्यंतचा ऊस आणतात. या १५ दिवसांच्या फरकामुळे म्हणूनच पाच ते सहा लाख मेट्रिक टनाचा फटका या कारखान्यांना बसणार आहे. म्हणजे एका कारखान्याचा संपूर्ण गाळप हंगामाचा ऊस पळविला जाणार आहे. कर्नाटकातील या कारखान्यांना संधी संकेश्वर साखर कारखाना, चिक्कोडी येथील दूधगंगा-कृष्णा आणि उगार शुगर हे मल्टिस्टेट असल्याने त्याचे हक्काचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात आहेत, तर हालसिद्धनाथ, शिवशक्ती शुगर, व्यंकटेश्वरा, बेडकिहाळ, कागवाड येथील कारखाने या १५ दिवसांत महाराष्ट्रातील ऊस मोठ्या प्रमाणात उचलतील. त्याचबरोबर कर्नाटकातील काही कारखाने पहिली एकच उचल कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करतात. नंतर मात्र एकही उचल देत नाहीत. चालू वर्षी यात वाढच होेण्याची शक्यता आहे.