शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कोल्हापुरात ‘झिरो पेंडन्सी’च्या ताणामुळे कर्मचाºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 18:46 IST

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव (वय ४६) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’ कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांचाही निषेध केला आहे.

ठळक मुद्देप्रकृती गंभीर : कर्मचाºयांचा ‘काम बंद’चा इशारा,विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांचा निषेध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे जिल्ह्यातील करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव (वय ४६) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’ कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाºयांचाही निषेध केला आहे.

‘झिरो पेंन्डसी’साठी आज, सोमवार ही अखेरची मुदत आहे. त्यासाठी गेले काही दिवस जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाºयांना रविवारची सुटीही दिली नाही. अशातच चार दिवसांपूर्वी या कामाच्या पाहणीसाठी पुण्याहून आलेले सहायक आयुक्त विलास जाधव यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका कर्मचाºयाला निलंबित केले, तर एकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस काढली.

गुरव हे दोन दिवस तणावाखालीच होते. हे काम आपल्याला झेपत नसल्याचे ते सहकाºयांना सांगत होते. मात्र ‘आपण सर्वजण मिळून तुमचे काम करू,’ असे सांगून इतरांनी त्यांची समजूत काढली. रविवारी सकाळी गुरव हे घरातून साडेनऊ वाजता बाहेर पडले. त्यांनी बाचणी येथील छोट्या पुलाजवळ मोटारसायकल लावली आणि ‘ग्रामोझोन’ या तणनाशकाचे प्राशन केले. ते पिऊन त्यांनी तुळशी नदीत उडी घेतली. तेथील शेतकºयांनी हा प्रकार पाहून त्यांना तातडीने नदीतून बाहेर काढून कोल्हापुरातील शासकीय आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनली होती.

ही बातमी समजताच जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी करवीर पंचायत समितीमध्ये एकत्र आले. यावेळी सर्वांनी ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमावर सडकून टीका केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत त्यांनी ‘काम बंद’चे आंदोलन जाहीर केले.

केवळ प्रसिद्धीसाठी हा उपक्रम

जिल्हा परिषदेचे दैनंदिन काम बंद ठेवून गेल्या अनेक वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड काढण्याचा हा उपक्रम केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप कर्मचाºयांनी यावेळी केला. आम्ही फाईल्स बनवून दिल्यानंतर आठ-पंधरा दिवस हे अधिकारी त्यांवर सह्या करीत नाहीत; त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कोण करणार, असा सवाल यावेळी कर्मचाºयांनी उपस्थित केला.