शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

कलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 3:23 PM

उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देकलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण पांढरा वाटाणा मात्र चढाच

कोल्हापूर : उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत.फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी जाणवत होती, मात्र गेली चार-पाच दिवस उष्मा वाढत आहे. त्यामुळे शीतपेये, फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे कलिंगडांना मागणी असताना आवक त्या प्रमाणात नाही. हिरव्या पाटीची कलिंगडे अद्याप दिसत नाहीत.

काळ्या पाटीची कलिंगडे बाजारात आली असून, ३० ते ५० रुपये एका कलिंगडाचा दर आहे. स्थानिक काकडीची आवक वाढली असून, ४० रुपये किलो दर आहे. त्याशिवाय द्राक्षे, सफरचंद, चिक्कू, संत्र्यांची आवक चांगली आहे. द्राक्षाची आवक तुलनात्मक वाढली असली तरी गोडीला कमी असल्याने उठाव होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात ८० ते १०० किलो दर राहिला आहे.उन्हाचा तडाका वाढत असला तरी भाजीपाल्याच्या दरात घसरण दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किलो मागे पाच ते दहा रुपये कमी झाले आहेत. स्थानिकच्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.

हिरवागार एक किलो कोबीचा गड्डा दहा रुपये, वांगी २० रुपये किलो आहे. ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचा दर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. कोथिंबिरीची पेंढी १० रुपये झाली असून, मेथी, पालक, पोकळ्याचा दर स्थिर आहे.तूरडाळ व हरभरा डाळीच्या दरात काहीशी घसरण झाली असून, किलोमागे सरासरी दहा रुपये कमी झाले आहेत. इतर डाळींचे दर कायम असले तरी पांढरा वाटाण्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सरकी तेल, शेंगदाणा, शाबू आदींचे दर स्थिर राहिले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाले असून, घाऊक बाजारात सरासरी १५ रुपये, बटाटा १८ रुपये, तर लसूण १४० रुपये किलो राहिला आहे.

टोमॅटो पुन्हा मातीमोल!मध्यंतरी टोमॅटोचा दर काहीसा वधारला होता. मात्र या आठवड्यात तो पुन्हा घसरला आहे. घाऊक बाजारात २ ते ५ रुपये दर असून, किरकोळ बाजारात दहा रुपयाला सव्वा किलो टोमॅटो आहे.

‘ब्याडगी’, ‘गंटुर’ तेजीतलाल मिरचीचा हंगाम सुरू झाला असून, दर चांगलाच तेजीत आहे. ‘ब्याडगी’, ‘गंटुर’ला आपल्याकडे मागणी अधिक असते. त्याचे दर अनुक्रमे प्रतिकिलो २४० व १८० रुपये आहे. सध्या कर्नाटकातून मिरचीची आवक सुरू असून, आंध्रप्रदेशमधून आवक सुरू झाल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर