शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:25 IST

उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देकलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण पांढरा वाटाणा मात्र चढाच

कोल्हापूर : उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत.फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी जाणवत होती, मात्र गेली चार-पाच दिवस उष्मा वाढत आहे. त्यामुळे शीतपेये, फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे कलिंगडांना मागणी असताना आवक त्या प्रमाणात नाही. हिरव्या पाटीची कलिंगडे अद्याप दिसत नाहीत.

काळ्या पाटीची कलिंगडे बाजारात आली असून, ३० ते ५० रुपये एका कलिंगडाचा दर आहे. स्थानिक काकडीची आवक वाढली असून, ४० रुपये किलो दर आहे. त्याशिवाय द्राक्षे, सफरचंद, चिक्कू, संत्र्यांची आवक चांगली आहे. द्राक्षाची आवक तुलनात्मक वाढली असली तरी गोडीला कमी असल्याने उठाव होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात ८० ते १०० किलो दर राहिला आहे.उन्हाचा तडाका वाढत असला तरी भाजीपाल्याच्या दरात घसरण दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किलो मागे पाच ते दहा रुपये कमी झाले आहेत. स्थानिकच्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.

हिरवागार एक किलो कोबीचा गड्डा दहा रुपये, वांगी २० रुपये किलो आहे. ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचा दर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. कोथिंबिरीची पेंढी १० रुपये झाली असून, मेथी, पालक, पोकळ्याचा दर स्थिर आहे.तूरडाळ व हरभरा डाळीच्या दरात काहीशी घसरण झाली असून, किलोमागे सरासरी दहा रुपये कमी झाले आहेत. इतर डाळींचे दर कायम असले तरी पांढरा वाटाण्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सरकी तेल, शेंगदाणा, शाबू आदींचे दर स्थिर राहिले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाले असून, घाऊक बाजारात सरासरी १५ रुपये, बटाटा १८ रुपये, तर लसूण १४० रुपये किलो राहिला आहे.

टोमॅटो पुन्हा मातीमोल!मध्यंतरी टोमॅटोचा दर काहीसा वधारला होता. मात्र या आठवड्यात तो पुन्हा घसरला आहे. घाऊक बाजारात २ ते ५ रुपये दर असून, किरकोळ बाजारात दहा रुपयाला सव्वा किलो टोमॅटो आहे.

‘ब्याडगी’, ‘गंटुर’ तेजीतलाल मिरचीचा हंगाम सुरू झाला असून, दर चांगलाच तेजीत आहे. ‘ब्याडगी’, ‘गंटुर’ला आपल्याकडे मागणी अधिक असते. त्याचे दर अनुक्रमे प्रतिकिलो २४० व १८० रुपये आहे. सध्या कर्नाटकातून मिरचीची आवक सुरू असून, आंध्रप्रदेशमधून आवक सुरू झाल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर