शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कोरोनाला रोखण्यासाठी कळंबा ग्रामपंचायत सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:18 IST

कळंबा : करवीर तालुक्यातील यशवंतग्राम, निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा ग्रामपंचायत हद्दीत कधीकाळी जवळपास दोनशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ...

कळंबा : करवीर तालुक्यातील यशवंतग्राम, निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा ग्रामपंचायत हद्दीत कधीकाळी जवळपास दोनशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रशासन चिंतेत होते. परंतु, ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. सध्या तीस रुग्ण उपचार घेत आहेत.

कळंबा ग्रामपंचायत परिसरात कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सरपंच सागर भोगम, उपसरपंच विजय खानविलकर, ग्रामविकास अधिकारी डी. व्ही. तेलवी व प्रशासनाने प्रभागनिहाय विशेष समित्या तयार करून कोरोना कामकाजाविषयी दैनंदिन माहिती संकलित केली. ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर ,सुरक्षित अंतराच्या नियमांची जनजागृती करण्यात आली.

गावठाण, वाड्यावस्त्या,परिसर वारंवार निर्जंतुकीकरण करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रवेश नाकारणे, आठ दिवसांची संचारबंदीची कडक अंमलबजावणी, स्वतंत्र अलगीकरण कक्ष उभारणी, बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई, व्यावसायिकांची कोरोना तपासणी यांसारखे उपक्रम राबवून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले.

कळंबा ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक नागरिकांबरोबरच नोकरी व्यवसायानिमित्ताने हजारो नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यांची घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली असून, संशयित नागरिकांना तत्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात अलगीकरण कक्षात पाठवले जात आहे. कळंबा ग्रामपंचायत परिसरात कोरोना प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना थोडेफार का होईना यश मिळाले आहे.