शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘राधानगरी’त काजवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:38 IST

राधानगरी : निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या राधानगरी अभयारण्यात निसर्गाचा आणखी एक लखलखता आविष्कार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येथील राधानगरी नेचर क्लबच्यावतीने फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात २६ मे रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानमेव्याचा आस्वादही घेता येणार आहे. क्लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, शशांक लिंग्रस, अनिल ...

राधानगरी : निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या राधानगरी अभयारण्यात निसर्गाचा आणखी एक लखलखता आविष्कार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येथील राधानगरी नेचर क्लबच्यावतीने फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात २६ मे रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानमेव्याचा आस्वादही घेता येणार आहे. क्लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, शशांक लिंग्रस, अनिल चव्हाण यांनीही माहिती दिली.विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, दुर्मीळ वनस्पती यांची रेलचेल असलेल्या या अभयारण्याचे निसर्गप्रेमी, अभ्यासक, पर्यटक व सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण असते. जून ते आॅक्टोबर हा पावसाचा काळ वगळता अन्य काळात येथे हजारो पर्यटक भेट देतात. प्रचंड पाऊस, खळाळणारे पाणी, धुके, धरणांतील विस्तृत पाणीसाठा, फेसाळणारे धबधबे यातून निसर्गाचे खरे रूप या परिसरात नजरेस पडते. पावसाळ्यानंतर सर्वत्र हिरवाईने नटलेल्या निसर्गाचे मनमोहक दृश्य खिळवून ठेवते. उन्हाळ्यात होणाऱ्या पानगळीनंतर एका बाजूला रखरखता उन्हाळा, तर दुसºया बाजूला कोवळ्या पालवीचे अंकुर पाहणाºयांच्या मनाला गारवा देऊन जातात.या काळातच जंगल रात्रीच्या वेळी उजळून निघते. चमकणाºया काजव्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर फिरत असतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या दृश्याचा अनोखा अनुभव घेण्याची संधी या महोत्सवात निसर्गप्रेमींना मिळणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाला सुरुवात होईल. काळम्मावाडी धरण मार्गावरील फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात मुख्य कार्यक्रम होईल. शिवाय आसनगाव धनगरवाडा परिसरातील जंगलातही भ्रमंती करून याचा अनुभव घेता येणार आहे.ग्रामस्थांच्या सहभागातून आयोजनराधानगरी वन्यजीव विभाग, राजापूर व फराळे येथील स्थानिक परिस्थिकीय समिती, ग्रामस्थांच्या सहभागातून राधानगरी नेचर क्लबने याचे आयोजन केले आहे. यामध्ये अल्पोपाहार, एक वेळचे शाकाहारी जेवण, आंबा, काजू, करवंदे, फणस यासारख्या रानमेव्यांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला बाटलीबंद शुद्ध मध भेट देण्यात येणार आहे.