शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कागल तालुका : उसाच्या वजनात हेक्टरी सरासरी १० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:14 IST

कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक

ठळक मुद्देकारखान्याचा ९० दिवसांचा हंगाम सुरळीत; मार्चअखेरपर्यंत हंगाम चालणार

जहाँगीर शेख ।कागल : कागल तालुक्यात ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, तालुक्यातील चार साखर कारखान्यांबरोबरच अन्य चार-पाच कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा ऊसतोडणी वाहतूक करीत असल्या तरी हंगामात नैसर्गिकरीत्या उसाचे टनेज वाढल्याने आणि त्याची सरासरी हेक्टरी १० टक्के इतकी असल्याने कारखान्यांना उसाची पुरेशी उपलब्धता होत आहे. उलट तोडणी-वाहतूक यंत्रणा अपुरी पडण्याचे प्रकार घडत आहे.

तालुक्यात दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना हे साखर कारखाने आहेत, तर पंचगंगा इचलकरंजी, जवाहर-हुपरी, राजाराम-कोल्हापूर, व्यंकटेश्वरा-बेडकीहाळ, हालसिद्धनाथ-निपाणी, गुरुदत्त-टाकळी असे साखर कारखानेही तालुक्यात उसाची तोडणी करीत आहेत. एकीकडे उसाचे क्षेत्र फारसे वाढलेले नाही; मात्र उसाच्या टनेजमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही टनेज वाढ सरासरी हेक्टरी दहा ते बारा टन आहे. यामुळे कारखान्यांनाही उसाचा पुरवठा वाढला आहे. साधारणत: मार्चअखेर हंगाम चालण्याची शक्यता आहे.

आपला ऊस लवकर तुटावा म्हणून शेतकरी वर्ग ऊसतोडणी मजुरांना, त्यांच्या टोळ्यांना चुचकारत आहेत. तालुक्यातील साखर कारखान्यांनी ९० दिवसांचा यशस्वी हंगाम पूर्ण केला आहे. या हंगामात साधारणत: पाच महिने साखर कारखाने चालतील. यापैकी संताजी घोरपडे साखर कारखाना सर्वांत आधी चालू झाला आहे. सर्वच साखर कारखान्यांना हा हंगाम सुरळीत आणि चांगला जात आहे.सहकारी साखर कारखान्यांचे गाळप६ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील साखर कारखान्यांनी आपला ९० दिवसांचा गळीत हंगाम पूर्ण केला आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू साखर कारखान्याने पाच लाख ४४ हजार ३३० मे. टन उसाचे गाळप करीत १२.०५ टक्के साखर उतारा घेत ६ लाख ४० हजार ५५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे. बिद्री साखर कारखान्याने चार लाख ५० हजार ४२२ मे. टन उसाचे गाळप करीत १२.७० टक्के उताºयाने ५ लाख ६९ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे, तर हमीदवाडा-मंडलिक कारखान्याने ३ लाख ६१ हजार ५१० मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी १२.३१ टक्के उताºयाने ४ लाख ४२ हजार १५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले आहे.

तालुक्यातील दोन लाख मे. टन ऊस वाढला४कागल तालुक्यातील साधारणत: १८ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. सप्टेंबर आणि आॅक्टोबर २०१७ मध्ये पडलेल्या पावसाने आणि पूरक हवामानामुळे ऊस पिकाला मोठा लाभ होऊन उत्पादन वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गतवेळीपेक्षा हेक्टरी सरासरी १० ते १२ टन उसाचे जादा उत्पादन निघत आहे. सरासरी दोन लाख मे. टन ऊस वाढल्यासारखा हा प्रकार आहे. हा टनेजवाढीचा प्रकार लक्षात घेऊन साखर कारखानेही फेब्रुवारी २०१८ मध्ये ज्या कारखान्यांचे गाळप बंद होतात त्यांच्या ऊसतोडणी यंत्रणा आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.