शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

कागल-सातारा सहा पदरीकरणास गती : ई टेंडर प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:25 IST

शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी

ठळक मुद्दे२८१० कोटींचा प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर; भूसंपादनानंतर २४ महिन्यांत काम पूर्ण होणार

सतीश पाटील ।शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ई-टेंडर प्रक्रिया सुरु आहे. कागल ते घुणकी, कणेगाव ते कराड-मलकापूर तसेच कराड ते सातारा या तीन टप्प्यांत बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा व हस्तांतरीत करा ) या १३३ किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे.कागल ते सातारा दरम्यानच्या महामार्गावर मोठी शहरे, औद्योगिक वसाहती यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २००६ मध्ये झालेला चारपदरी महामार्गही अपुरा पडत आहे. भविष्याच्या दृष्टीने या महामार्गाची रूंदी वाढवणे गरजेचे बनले असून, यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे तीन हजार कोटींचा सहा पदरीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता इ-टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे. काही ठिकाणी वादग्रस्त ठरलेले भूसंपादन झाल्यानंतर २४ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.कागल ते सातारा या १३३ किलोमीटर अंतरामधील कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते घुणकी पुलापर्यंत ४७ किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा असून यासाठी ९९२.९१ कोटी रुपये, सांगली जिल्ह्यातील कणेगाव ते कराड हा ३९.५ किलोमीटरचा दुसरा टप्पा असून यासाठी ७०७.९० कोटी रुपये तर सातारा जिल्ह्यातील कराड ते सातारा या तिसºया टप्प्यातील ४६.५ किलोमीटर रस्त्यासाठी ११०९.१६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

या आराखड्यानुसार कागल-सातारा १३३ किलोमीटर रस्त्याचे सहा पदरीकरणात सिमेंट काँक्रीट आणि डांबरीकरण होणार आहे. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला २०८ किलोमीटर अंतराचे सेवामार्ग होणार आहेत. मोठे पाच उड्डाणपूल होणार आहेत. यापैकी तीन कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन सातारा जिल्ह्यात उभारले जाणार आहेत. यामध्ये कराड-मलकापूर शहरावरून जाणारा चार किलोमीटर अंतराचा सर्वांत मोठा उड्डाणपूल असेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न केले होते. याशिवाय पंचगंगा नदीवरील कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा बास्केट ब्रीज, टोप येथील ८२० मीटरचा उड्डापूल , कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलाचा यात समावेश आहे.

महामार्गावर १० मुख्य मध्यम उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सेवामार्ग आणि महामार्ग जोडण्यासाठी छोटी ५० उड्डाणपूल उभारली जाणार आहेत. २५ भुयारी मार्ग करण्यात येणार असून, यामध्ये चौपदरीकरणात केलेल्या काही जुन्या भुयारी मार्गांची उंची वाढवली जाणार आहे, तर महामार्गाखालून व रेल्वे पुलाखालून गेलेल्या ३०५ पाईपलाईनसाठी बोगदे उभारली जाणार आहेत. मुख्य १६ जंक्शन, ७१ लहान जंक्शन, ६७ बसथांबे, ८ वाहनतळ या प्रकल्पात उभारण्यात येणार आहेत. हे १३३ किलोमीटरचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजित असून, चौपदरीकरणातील अनेक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या आराखड्यात केला आहे.१ चौपदरीकरणात गरज भासेल तिथेच सेवामार्ग केले होते. तेही तीन ते पाच मीटरचे. पण सहा पदरीकरणात महामार्गाच्या दोन्ही बाजूला सात मीटरचे म्हणजे २३ फुटांचे सेवामार्ग होणार आहेत. यामुळे अपघातात घट होईल तसेच वाहतूक सुरळीत होईल.२ चौपदरीकरण झाले त्यावेळी साडेआठ मीटरचे रस्ते मुख्य महामार्गावर करण्यात आले होते. पण सध्या सहा पदरीकरणात ११ मीटरचे दोन्ही बाजूला रस्ते केले जाणार आहेत.३ तावडे हॉटेल, कागल, उजळाईवाडी येथील लहान अपुरे भुयारीमार्ग पाडून तेथे नवीन मोठे भुयारीमार्ग उभारण्यात येणार आहेत.४ उचगाव येथील भुयारीमार्गाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या उड्डाणपुलाखालून कोल्हापुरात प्रवेश होतो. तसेच मुडशिंगी, हुपरी, पट्टणकोडोली या मार्गावर जाणारी मोठी वाहतूक या पुलाखालून जाते. वाहतुकीस हा पूल अपुरा आहे. या ठिकाणी मोठा भुयारीमार्ग होणे गरजेचे आहे.५ निढोरी फाटा, कागल बस स्टॅन्ड, कणेरीवाडी, नागाव फाटा, अंबप फाटा याठिकाणीही उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर