शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कागल-सातारा सहा पदरीकरणास गती : ई टेंडर प्रक्रिया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:25 IST

शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी

ठळक मुद्दे२८१० कोटींचा प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर; भूसंपादनानंतर २४ महिन्यांत काम पूर्ण होणार

सतीश पाटील ।शिरोली : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कागल ते सातारा या १३३ किलोमिटर अंतराच्या टप्प्याचे सहा पदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेलेल्या या रस्त्यासाठी २८१० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ई-टेंडर प्रक्रिया सुरु आहे. कागल ते घुणकी, कणेगाव ते कराड-मलकापूर तसेच कराड ते सातारा या तीन टप्प्यांत बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा व हस्तांतरीत करा ) या १३३ किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे.कागल ते सातारा दरम्यानच्या महामार्गावर मोठी शहरे, औद्योगिक वसाहती यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २००६ मध्ये झालेला चारपदरी महामार्गही अपुरा पडत आहे. भविष्याच्या दृष्टीने या महामार्गाची रूंदी वाढवणे गरजेचे बनले असून, यासाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे तीन हजार कोटींचा सहा पदरीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर आता इ-टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे. काही ठिकाणी वादग्रस्त ठरलेले भूसंपादन झाल्यानंतर २४ महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.कागल ते सातारा या १३३ किलोमीटर अंतरामधील कामाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते घुणकी पुलापर्यंत ४७ किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा असून यासाठी ९९२.९१ कोटी रुपये, सांगली जिल्ह्यातील कणेगाव ते कराड हा ३९.५ किलोमीटरचा दुसरा टप्पा असून यासाठी ७०७.९० कोटी रुपये तर सातारा जिल्ह्यातील कराड ते सातारा या तिसºया टप्प्यातील ४६.५ किलोमीटर रस्त्यासाठी ११०९.१६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

या आराखड्यानुसार कागल-सातारा १३३ किलोमीटर रस्त्याचे सहा पदरीकरणात सिमेंट काँक्रीट आणि डांबरीकरण होणार आहे. तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला २०८ किलोमीटर अंतराचे सेवामार्ग होणार आहेत. मोठे पाच उड्डाणपूल होणार आहेत. यापैकी तीन कोल्हापूर जिल्ह्यात तर दोन सातारा जिल्ह्यात उभारले जाणार आहेत. यामध्ये कराड-मलकापूर शहरावरून जाणारा चार किलोमीटर अंतराचा सर्वांत मोठा उड्डाणपूल असेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी प्रयत्न केले होते. याशिवाय पंचगंगा नदीवरील कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा बास्केट ब्रीज, टोप येथील ८२० मीटरचा उड्डापूल , कागलजवळील लक्ष्मी टेकडी येथील उड्डाणपुलाचा यात समावेश आहे.

महामार्गावर १० मुख्य मध्यम उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सेवामार्ग आणि महामार्ग जोडण्यासाठी छोटी ५० उड्डाणपूल उभारली जाणार आहेत. २५ भुयारी मार्ग करण्यात येणार असून, यामध्ये चौपदरीकरणात केलेल्या काही जुन्या भुयारी मार्गांची उंची वाढवली जाणार आहे, तर महामार्गाखालून व रेल्वे पुलाखालून गेलेल्या ३०५ पाईपलाईनसाठी बोगदे उभारली जाणार आहेत. मुख्य १६ जंक्शन, ७१ लहान जंक्शन, ६७ बसथांबे, ८ वाहनतळ या प्रकल्पात उभारण्यात येणार आहेत. हे १३३ किलोमीटरचे काम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजित असून, चौपदरीकरणातील अनेक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या आराखड्यात केला आहे.१ चौपदरीकरणात गरज भासेल तिथेच सेवामार्ग केले होते. तेही तीन ते पाच मीटरचे. पण सहा पदरीकरणात महामार्गाच्या दोन्ही बाजूला सात मीटरचे म्हणजे २३ फुटांचे सेवामार्ग होणार आहेत. यामुळे अपघातात घट होईल तसेच वाहतूक सुरळीत होईल.२ चौपदरीकरण झाले त्यावेळी साडेआठ मीटरचे रस्ते मुख्य महामार्गावर करण्यात आले होते. पण सध्या सहा पदरीकरणात ११ मीटरचे दोन्ही बाजूला रस्ते केले जाणार आहेत.३ तावडे हॉटेल, कागल, उजळाईवाडी येथील लहान अपुरे भुयारीमार्ग पाडून तेथे नवीन मोठे भुयारीमार्ग उभारण्यात येणार आहेत.४ उचगाव येथील भुयारीमार्गाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या उड्डाणपुलाखालून कोल्हापुरात प्रवेश होतो. तसेच मुडशिंगी, हुपरी, पट्टणकोडोली या मार्गावर जाणारी मोठी वाहतूक या पुलाखालून जाते. वाहतुकीस हा पूल अपुरा आहे. या ठिकाणी मोठा भुयारीमार्ग होणे गरजेचे आहे.५ निढोरी फाटा, कागल बस स्टॅन्ड, कणेरीवाडी, नागाव फाटा, अंबप फाटा याठिकाणीही उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर