शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ-घाटगे गटाच्या भूमिकेवर कागलचे राजकारण

By admin | Updated: June 1, 2016 00:55 IST

कागल नगरपालिका--संभाव्य चित्र

जहांगिर शेख --कागल --कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापिठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्याचे मुख्या राजकीय केंद्र कागल शहरच असते. कागल शहराचा नगराध्यक्ष कोणाचा? याकडे तालुक्याचे लक्ष असते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे नगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय गटांच्यातून केली जात आहे. कागल शहराच्या राजकारणावर गेली दहा वर्षे एकहाती वर्चस्व राखून असलेले आमदार हसन मुश्रीफ आणि कागल शहराच्या राजकारणात प्राबल्य असणारा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे गट या दोन गटांच्या भुमीका काय राहणार? यावबर आगामी निवडणुक रंगणार आहे. राजे-मुश्रीफ गटाची आघाडी की बिघाडी या मुद्द्यावरच राजकीय कुरुक्षेत्राची मांडणी होणार आहे.सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे संयुक्त सत्ता आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०११ मध्ये राजे विक्रमसिंह घाटगे आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र निवडणुक लढवून विरोधी तात्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, यांच्या आघाडीचा पराभव केला होता. त्यावेळी विरोधी आघाडीतून दोन नगरसेवक निवडून आले होते. २००६-२०११ च्या पंचवार्षिक निवडणुकीत तात्कालीन मंडलीक गटाने राजे गटाचा पराभव करीत पहिल्यांदाच शहरात वर्चस्व निर्माण केले होते. २००६ पासून मुश्रीफांची एक हाती सतत पालिकेत आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडले जाणारा असे धोरण आगामी निवडणुकात अंमलात येण्याचे संकेत मिळत आहेत. यापुर्वी दोन वेळा कागल शहरातनू थेट नगराध्यक्षपदासाठी लोकांनी मतदान केले आहे. त्यामध्ये २००१ मध्ये कांचनमाला घाटगे या राजे गटांच्या नगराध्यक्ष निवडून आल्या. तर १९७४ च्या दरम्यान जी. एच. शिंदे निवडून आले होते. शिंदेंना कै. बाळ महाराजांचा पाठींबा होता. १९७८ ला विक्रमसिंह घाटगे आमदार झाले तेथून कागल शहरात राजे गट विरुद्ध मंडलीक गट असा राजकीय संघर्ष सुरु झाला. तत्पुर्वी डी. ए. घाटगे विरुद्ध वाय. डी. माने असे गट लढत असून एकुणच कागलच्या राजकरणावर १९८० नंतर २००६ पर्यंत विक्रमसिंह घाटगेंचे एकहाती वर्चस्व होते. १९८६ मध्ये राजे गटाच्या २० पैकी १९ जागा तर व्ही. ए. घाटगे मंडलीक गटाचे एकटेच निवडून आले होते. १९९१ मध्ये राजे-मंडलिक १३-१३ असे समान नगरसेवक निवडूण आले. आणि चिठ्ठीवर व्ही. ए. घाटगे नगराध्यक्ष झाले. तर १९९६ ला पुन्हा राजे गटाने सत्ता मिळवीली मात्र मुश्रीफांनी तीन सदस्य फोडून मंडलीक गटाचा नगराध्यक्ष केला. हा थोडक्यात इतिहास पाहिला तर राजे गट आणि मुश्रीफ गट यांच्या भोवतीच शहराचे राजकारण केंद्रीत झाले आहे. नाही म्हणायला मंडलीक गटाची ही भरावी अशी ताकद तयार झाली आहे. संजय घाटगे गट, भाजपा, शेतकरी संघटना, आर. पी. आय. यांचे ही कार्यकर्ते सक्रीय आहेत. राजे मुश्रीफ गट पुन्हा एकत्र लढणार की स्वतंत्र भुमीका घेणार यावर इतर गटांच्या भुमीका ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवादीवर आणि दावेदारीवर आघाडी की बिघाडी निश्चित होणार आहे.