शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ-घाटगे गटाच्या भूमिकेवर कागलचे राजकारण

By admin | Updated: June 1, 2016 00:55 IST

कागल नगरपालिका--संभाव्य चित्र

जहांगिर शेख --कागल --कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापिठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्याचे मुख्या राजकीय केंद्र कागल शहरच असते. कागल शहराचा नगराध्यक्ष कोणाचा? याकडे तालुक्याचे लक्ष असते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे नगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय गटांच्यातून केली जात आहे. कागल शहराच्या राजकारणावर गेली दहा वर्षे एकहाती वर्चस्व राखून असलेले आमदार हसन मुश्रीफ आणि कागल शहराच्या राजकारणात प्राबल्य असणारा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे गट या दोन गटांच्या भुमीका काय राहणार? यावबर आगामी निवडणुक रंगणार आहे. राजे-मुश्रीफ गटाची आघाडी की बिघाडी या मुद्द्यावरच राजकीय कुरुक्षेत्राची मांडणी होणार आहे.सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे संयुक्त सत्ता आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०११ मध्ये राजे विक्रमसिंह घाटगे आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र निवडणुक लढवून विरोधी तात्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, यांच्या आघाडीचा पराभव केला होता. त्यावेळी विरोधी आघाडीतून दोन नगरसेवक निवडून आले होते. २००६-२०११ च्या पंचवार्षिक निवडणुकीत तात्कालीन मंडलीक गटाने राजे गटाचा पराभव करीत पहिल्यांदाच शहरात वर्चस्व निर्माण केले होते. २००६ पासून मुश्रीफांची एक हाती सतत पालिकेत आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडले जाणारा असे धोरण आगामी निवडणुकात अंमलात येण्याचे संकेत मिळत आहेत. यापुर्वी दोन वेळा कागल शहरातनू थेट नगराध्यक्षपदासाठी लोकांनी मतदान केले आहे. त्यामध्ये २००१ मध्ये कांचनमाला घाटगे या राजे गटांच्या नगराध्यक्ष निवडून आल्या. तर १९७४ च्या दरम्यान जी. एच. शिंदे निवडून आले होते. शिंदेंना कै. बाळ महाराजांचा पाठींबा होता. १९७८ ला विक्रमसिंह घाटगे आमदार झाले तेथून कागल शहरात राजे गट विरुद्ध मंडलीक गट असा राजकीय संघर्ष सुरु झाला. तत्पुर्वी डी. ए. घाटगे विरुद्ध वाय. डी. माने असे गट लढत असून एकुणच कागलच्या राजकरणावर १९८० नंतर २००६ पर्यंत विक्रमसिंह घाटगेंचे एकहाती वर्चस्व होते. १९८६ मध्ये राजे गटाच्या २० पैकी १९ जागा तर व्ही. ए. घाटगे मंडलीक गटाचे एकटेच निवडून आले होते. १९९१ मध्ये राजे-मंडलिक १३-१३ असे समान नगरसेवक निवडूण आले. आणि चिठ्ठीवर व्ही. ए. घाटगे नगराध्यक्ष झाले. तर १९९६ ला पुन्हा राजे गटाने सत्ता मिळवीली मात्र मुश्रीफांनी तीन सदस्य फोडून मंडलीक गटाचा नगराध्यक्ष केला. हा थोडक्यात इतिहास पाहिला तर राजे गट आणि मुश्रीफ गट यांच्या भोवतीच शहराचे राजकारण केंद्रीत झाले आहे. नाही म्हणायला मंडलीक गटाची ही भरावी अशी ताकद तयार झाली आहे. संजय घाटगे गट, भाजपा, शेतकरी संघटना, आर. पी. आय. यांचे ही कार्यकर्ते सक्रीय आहेत. राजे मुश्रीफ गट पुन्हा एकत्र लढणार की स्वतंत्र भुमीका घेणार यावर इतर गटांच्या भुमीका ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवादीवर आणि दावेदारीवर आघाडी की बिघाडी निश्चित होणार आहे.