शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
2
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
3
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
4
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
5
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
6
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
8
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
9
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
10
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
11
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
12
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
13
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
14
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
15
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
16
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
17
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
18
VIRAL : जत्रेतल्या ब्रेकडान्सवर बसायला आवडतं? 'हा' व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी स्वतःला थांबवाल!
19
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
20
Viral Video: १५ पत्नी, ३० मुले आणि १०० नोकर! विमानतळावर आफ्रिकन राजाचा थाट पाहून सगळेच चक्रावले

मुश्रीफ-घाटगे गटाच्या भूमिकेवर कागलचे राजकारण

By admin | Updated: June 1, 2016 00:55 IST

कागल नगरपालिका--संभाव्य चित्र

जहांगिर शेख --कागल --कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापिठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्याचे मुख्या राजकीय केंद्र कागल शहरच असते. कागल शहराचा नगराध्यक्ष कोणाचा? याकडे तालुक्याचे लक्ष असते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे नगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय गटांच्यातून केली जात आहे. कागल शहराच्या राजकारणावर गेली दहा वर्षे एकहाती वर्चस्व राखून असलेले आमदार हसन मुश्रीफ आणि कागल शहराच्या राजकारणात प्राबल्य असणारा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे गट या दोन गटांच्या भुमीका काय राहणार? यावबर आगामी निवडणुक रंगणार आहे. राजे-मुश्रीफ गटाची आघाडी की बिघाडी या मुद्द्यावरच राजकीय कुरुक्षेत्राची मांडणी होणार आहे.सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे संयुक्त सत्ता आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०११ मध्ये राजे विक्रमसिंह घाटगे आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र निवडणुक लढवून विरोधी तात्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, यांच्या आघाडीचा पराभव केला होता. त्यावेळी विरोधी आघाडीतून दोन नगरसेवक निवडून आले होते. २००६-२०११ च्या पंचवार्षिक निवडणुकीत तात्कालीन मंडलीक गटाने राजे गटाचा पराभव करीत पहिल्यांदाच शहरात वर्चस्व निर्माण केले होते. २००६ पासून मुश्रीफांची एक हाती सतत पालिकेत आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडले जाणारा असे धोरण आगामी निवडणुकात अंमलात येण्याचे संकेत मिळत आहेत. यापुर्वी दोन वेळा कागल शहरातनू थेट नगराध्यक्षपदासाठी लोकांनी मतदान केले आहे. त्यामध्ये २००१ मध्ये कांचनमाला घाटगे या राजे गटांच्या नगराध्यक्ष निवडून आल्या. तर १९७४ च्या दरम्यान जी. एच. शिंदे निवडून आले होते. शिंदेंना कै. बाळ महाराजांचा पाठींबा होता. १९७८ ला विक्रमसिंह घाटगे आमदार झाले तेथून कागल शहरात राजे गट विरुद्ध मंडलीक गट असा राजकीय संघर्ष सुरु झाला. तत्पुर्वी डी. ए. घाटगे विरुद्ध वाय. डी. माने असे गट लढत असून एकुणच कागलच्या राजकरणावर १९८० नंतर २००६ पर्यंत विक्रमसिंह घाटगेंचे एकहाती वर्चस्व होते. १९८६ मध्ये राजे गटाच्या २० पैकी १९ जागा तर व्ही. ए. घाटगे मंडलीक गटाचे एकटेच निवडून आले होते. १९९१ मध्ये राजे-मंडलिक १३-१३ असे समान नगरसेवक निवडूण आले. आणि चिठ्ठीवर व्ही. ए. घाटगे नगराध्यक्ष झाले. तर १९९६ ला पुन्हा राजे गटाने सत्ता मिळवीली मात्र मुश्रीफांनी तीन सदस्य फोडून मंडलीक गटाचा नगराध्यक्ष केला. हा थोडक्यात इतिहास पाहिला तर राजे गट आणि मुश्रीफ गट यांच्या भोवतीच शहराचे राजकारण केंद्रीत झाले आहे. नाही म्हणायला मंडलीक गटाची ही भरावी अशी ताकद तयार झाली आहे. संजय घाटगे गट, भाजपा, शेतकरी संघटना, आर. पी. आय. यांचे ही कार्यकर्ते सक्रीय आहेत. राजे मुश्रीफ गट पुन्हा एकत्र लढणार की स्वतंत्र भुमीका घेणार यावर इतर गटांच्या भुमीका ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवादीवर आणि दावेदारीवर आघाडी की बिघाडी निश्चित होणार आहे.