शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

मुश्रीफ-घाटगे गटाच्या भूमिकेवर कागलचे राजकारण

By admin | Updated: June 1, 2016 00:55 IST

कागल नगरपालिका--संभाव्य चित्र

जहांगिर शेख --कागल --कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापिठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्याचे मुख्या राजकीय केंद्र कागल शहरच असते. कागल शहराचा नगराध्यक्ष कोणाचा? याकडे तालुक्याचे लक्ष असते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे नगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय गटांच्यातून केली जात आहे. कागल शहराच्या राजकारणावर गेली दहा वर्षे एकहाती वर्चस्व राखून असलेले आमदार हसन मुश्रीफ आणि कागल शहराच्या राजकारणात प्राबल्य असणारा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे गट या दोन गटांच्या भुमीका काय राहणार? यावबर आगामी निवडणुक रंगणार आहे. राजे-मुश्रीफ गटाची आघाडी की बिघाडी या मुद्द्यावरच राजकीय कुरुक्षेत्राची मांडणी होणार आहे.सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे संयुक्त सत्ता आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०११ मध्ये राजे विक्रमसिंह घाटगे आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र निवडणुक लढवून विरोधी तात्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, यांच्या आघाडीचा पराभव केला होता. त्यावेळी विरोधी आघाडीतून दोन नगरसेवक निवडून आले होते. २००६-२०११ च्या पंचवार्षिक निवडणुकीत तात्कालीन मंडलीक गटाने राजे गटाचा पराभव करीत पहिल्यांदाच शहरात वर्चस्व निर्माण केले होते. २००६ पासून मुश्रीफांची एक हाती सतत पालिकेत आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडले जाणारा असे धोरण आगामी निवडणुकात अंमलात येण्याचे संकेत मिळत आहेत. यापुर्वी दोन वेळा कागल शहरातनू थेट नगराध्यक्षपदासाठी लोकांनी मतदान केले आहे. त्यामध्ये २००१ मध्ये कांचनमाला घाटगे या राजे गटांच्या नगराध्यक्ष निवडून आल्या. तर १९७४ च्या दरम्यान जी. एच. शिंदे निवडून आले होते. शिंदेंना कै. बाळ महाराजांचा पाठींबा होता. १९७८ ला विक्रमसिंह घाटगे आमदार झाले तेथून कागल शहरात राजे गट विरुद्ध मंडलीक गट असा राजकीय संघर्ष सुरु झाला. तत्पुर्वी डी. ए. घाटगे विरुद्ध वाय. डी. माने असे गट लढत असून एकुणच कागलच्या राजकरणावर १९८० नंतर २००६ पर्यंत विक्रमसिंह घाटगेंचे एकहाती वर्चस्व होते. १९८६ मध्ये राजे गटाच्या २० पैकी १९ जागा तर व्ही. ए. घाटगे मंडलीक गटाचे एकटेच निवडून आले होते. १९९१ मध्ये राजे-मंडलिक १३-१३ असे समान नगरसेवक निवडूण आले. आणि चिठ्ठीवर व्ही. ए. घाटगे नगराध्यक्ष झाले. तर १९९६ ला पुन्हा राजे गटाने सत्ता मिळवीली मात्र मुश्रीफांनी तीन सदस्य फोडून मंडलीक गटाचा नगराध्यक्ष केला. हा थोडक्यात इतिहास पाहिला तर राजे गट आणि मुश्रीफ गट यांच्या भोवतीच शहराचे राजकारण केंद्रीत झाले आहे. नाही म्हणायला मंडलीक गटाची ही भरावी अशी ताकद तयार झाली आहे. संजय घाटगे गट, भाजपा, शेतकरी संघटना, आर. पी. आय. यांचे ही कार्यकर्ते सक्रीय आहेत. राजे मुश्रीफ गट पुन्हा एकत्र लढणार की स्वतंत्र भुमीका घेणार यावर इतर गटांच्या भुमीका ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवादीवर आणि दावेदारीवर आघाडी की बिघाडी निश्चित होणार आहे.