शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

कागल, मुरगूड, पन्हाळा पालिकेचा गौरव

By admin | Updated: September 1, 2016 00:39 IST

नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, जनता या सर्वांच्या एकजुटीने सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज ‘कागल’चे नाव देशात ‘टॉप’वर आले आहे.

कागल : कागल हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ २००९ मध्येच झाला. नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, जनता या सर्वांच्या एकजुटीने सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज ‘कागल’चे नाव देशात ‘टॉप’वर आले आहे.२००९-१० पर्यंत आज जेथे साबिया अपार्टमेंट, गोसावी वसाहत, दुधगंगा नदी परिसर, यशवंत किल्ला परिसर, गणेशनगर, बेघर वसाहत, मडीगेट येथे उघड्यावर शौचास बसत. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने गुडमॉर्निंग पथक नेमून यास प्रतिबंध केले. हे पथक पोलिसांद्वारे थेट कारवाई करीत न्यायालयात हजर करू लागले. आजही हे पथक पहाटे पाहणी करते. मे २०१६ मध्ये नगरविकासच्या बैठकीत शहर १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा दावा सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी सादर केला. त्यानंतर पुणे आयुक्त, नगरविकास मंत्रालय आणि केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पाठविलेली पथके आणि शॉर्ट फिल्मसाठी आलेले पथक यातून ‘कागल’चे नाव हागणदारीमुक्त शहर म्हणून घेतले. मुरगूडला मिळणार पाच कोटीमुरगूड : केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबलेल्या हागणदारीमुक्त शहर योजनेत मुरगूड नगरपालिका पूर्ण तयारीनिशी उतरली होती. तालुका, जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर अशा चारवेळा शहराची विशेष पथकाकडून पाहणी झाली होती. या चारही वेळा अपवाद वगळता शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल या पथकाकडून मिळाला होता. विभागीय व राज्य पातळीवर समाधानकारक काम केल्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला एक कोटी रुपयांचे विशेष बक्षीस मिळाले होते. या शहराची विविध पातळीवर चारवेळा तपासणी करताना प्रत्येक वॉर्ड, गल्लीत जाऊन पहाटे व संध्याकाळीही पाहणी केली.या शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये बोलावून त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे. विरोधी गटाच्या सदस्यांनीही सहकार्य केले असून, सत्ताधारी सर्व नगरसेवक, अधिकारी व कमर्चारी या सर्वांमुळेच हा बहुमान मिळाला असल्याचे प्रवीणसिंह पाटील यानी सांगितले. केंद्रीय समितीलासुद्धा पूर्ण तयारीनिशी सामोरे जाणार असून, देशात अव्वल राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे, उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी , शिवाजी इंदलकर, परेश चौगुले, वसुधा कुंभार, माया चौगले, गौराबाई सोनुले, फुलाबाई कांबळे, रेखा सावर्डेकर, मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्रभाकर पत्की, प्रकाश पोतदार, रमेश पाटील, अनिल गंदमवाड, दिलीप कांबळे, शशिकांत मोहिते, अमर कांबळे, बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.मुरगुडात कर्मचाऱ्यांंनाबक्षीस देण्याचा ठरावमुरगूड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर योजनेसाठी अहोरात्र झटलेल्या आरोग्य विभाग व संबंधित कर्मचाऱ्यांना मुरगूड नगरपालिकेकडून विशेष बक्षीस देण्याचा ठराव बुधवारी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. नगरपालिकेचा अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे होत्या. माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांंना भरीव बक्षीस देण्याचा ठराव मांडला.४शहरात उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे : ०९ होती.४त्या जागा नगरपालिकेने विविध कामांसाठी उपयोगात आणल्या.४२०१३-१४ मध्ये ९६५ वैयक्तिक शौचालये उभारली. त्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे ९३ लाख रुपयांचे अनुदान दिले.४२०१५-१६ मध्ये २७१ लोकांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजारप्रमाणे ३२ लाख ५० हजार रुपये दिले आहेत.४उघड्यावर शौचास बसणाऱ्या ११९ जणांवर गुडमॉर्निंग पथकाने न्यायालयात हजर केले, तर समज देऊन २२९ जणांना सोडले.४शहरात १८ ठिकाणी मिळून २२४ सिटर सार्वजनिक शौचालये.४२० सिटर ०२ फिरती शौचालये, ०२ मैला उपसा टॅँकर. ४६५ कंत्राटी आणि २० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेची साफसफाईची कामे करीत ही मोहीमही राबविली.४उघड्यावर शौचास बसू नये यासाठी लोकांचे विविध माध्यमांद्वारे प्रबोधन.