शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

कागल, मुरगूड, पन्हाळा पालिकेचा गौरव

By admin | Updated: September 1, 2016 00:39 IST

नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, जनता या सर्वांच्या एकजुटीने सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज ‘कागल’चे नाव देशात ‘टॉप’वर आले आहे.

कागल : कागल हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ २००९ मध्येच झाला. नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, जनता या सर्वांच्या एकजुटीने सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज ‘कागल’चे नाव देशात ‘टॉप’वर आले आहे.२००९-१० पर्यंत आज जेथे साबिया अपार्टमेंट, गोसावी वसाहत, दुधगंगा नदी परिसर, यशवंत किल्ला परिसर, गणेशनगर, बेघर वसाहत, मडीगेट येथे उघड्यावर शौचास बसत. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने गुडमॉर्निंग पथक नेमून यास प्रतिबंध केले. हे पथक पोलिसांद्वारे थेट कारवाई करीत न्यायालयात हजर करू लागले. आजही हे पथक पहाटे पाहणी करते. मे २०१६ मध्ये नगरविकासच्या बैठकीत शहर १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा दावा सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी सादर केला. त्यानंतर पुणे आयुक्त, नगरविकास मंत्रालय आणि केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पाठविलेली पथके आणि शॉर्ट फिल्मसाठी आलेले पथक यातून ‘कागल’चे नाव हागणदारीमुक्त शहर म्हणून घेतले. मुरगूडला मिळणार पाच कोटीमुरगूड : केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबलेल्या हागणदारीमुक्त शहर योजनेत मुरगूड नगरपालिका पूर्ण तयारीनिशी उतरली होती. तालुका, जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर अशा चारवेळा शहराची विशेष पथकाकडून पाहणी झाली होती. या चारही वेळा अपवाद वगळता शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल या पथकाकडून मिळाला होता. विभागीय व राज्य पातळीवर समाधानकारक काम केल्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला एक कोटी रुपयांचे विशेष बक्षीस मिळाले होते. या शहराची विविध पातळीवर चारवेळा तपासणी करताना प्रत्येक वॉर्ड, गल्लीत जाऊन पहाटे व संध्याकाळीही पाहणी केली.या शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये बोलावून त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे. विरोधी गटाच्या सदस्यांनीही सहकार्य केले असून, सत्ताधारी सर्व नगरसेवक, अधिकारी व कमर्चारी या सर्वांमुळेच हा बहुमान मिळाला असल्याचे प्रवीणसिंह पाटील यानी सांगितले. केंद्रीय समितीलासुद्धा पूर्ण तयारीनिशी सामोरे जाणार असून, देशात अव्वल राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे, उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी , शिवाजी इंदलकर, परेश चौगुले, वसुधा कुंभार, माया चौगले, गौराबाई सोनुले, फुलाबाई कांबळे, रेखा सावर्डेकर, मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्रभाकर पत्की, प्रकाश पोतदार, रमेश पाटील, अनिल गंदमवाड, दिलीप कांबळे, शशिकांत मोहिते, अमर कांबळे, बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.मुरगुडात कर्मचाऱ्यांंनाबक्षीस देण्याचा ठरावमुरगूड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर योजनेसाठी अहोरात्र झटलेल्या आरोग्य विभाग व संबंधित कर्मचाऱ्यांना मुरगूड नगरपालिकेकडून विशेष बक्षीस देण्याचा ठराव बुधवारी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. नगरपालिकेचा अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे होत्या. माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांंना भरीव बक्षीस देण्याचा ठराव मांडला.४शहरात उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे : ०९ होती.४त्या जागा नगरपालिकेने विविध कामांसाठी उपयोगात आणल्या.४२०१३-१४ मध्ये ९६५ वैयक्तिक शौचालये उभारली. त्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे ९३ लाख रुपयांचे अनुदान दिले.४२०१५-१६ मध्ये २७१ लोकांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजारप्रमाणे ३२ लाख ५० हजार रुपये दिले आहेत.४उघड्यावर शौचास बसणाऱ्या ११९ जणांवर गुडमॉर्निंग पथकाने न्यायालयात हजर केले, तर समज देऊन २२९ जणांना सोडले.४शहरात १८ ठिकाणी मिळून २२४ सिटर सार्वजनिक शौचालये.४२० सिटर ०२ फिरती शौचालये, ०२ मैला उपसा टॅँकर. ४६५ कंत्राटी आणि २० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेची साफसफाईची कामे करीत ही मोहीमही राबविली.४उघड्यावर शौचास बसू नये यासाठी लोकांचे विविध माध्यमांद्वारे प्रबोधन.