शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

केखल्याचा ‘दवणा’ जोतिबाच्या मानाचा

By admin | Updated: April 10, 2017 00:44 IST

आर्थिक व धार्मिक आधार : चाळीसहून अधिक शेतकरी वर्षभर दवणा उत्पादनात सक्रिय

संजय कळके ल्ल पोहाळे तर्फ आळतेकोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा ऊर्फ श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) हे अनेकांचे कुलदैवत. श्री क्षेत्र जोतिबापासून चार ते सहा किलोमीटर अंतरावर पायथ्याशी असलेले केखले हे चार हजार लोकसंख्येचे छोटेस गाव. या गावाने तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळविलेला आहे. राजकीयदृष्ट्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्या प्रभुत्वाखाली येणारे हे गाव. येथे पारंपरिक पीक म्हणून प्रामुख्याने उसाची शेती केली जाते. चैत्र महिन्यात या गावास मोठे महत्त्व येते. या गावातील दवणा सर्वत्र परिचित आहे. जोतिबा देवाला गुलाल, खोबरे याबरोबरच दवणाही अर्पण केली जाते. या गावात छोटे-मोठे शेतकरी हे दवणा हे पीक घेतात. गावचे क्षेत्र पाहता २० एकर क्षेत्राचा या पिकासाठी वापर केला जातो. जोतिबावर गुलाल, खोबरे, खारीक यांची उधळण केली जाते; पण यासोबतच केवळ केखले या गावातच पिकणारा दवणा ही सुगंधी वनस्पती जोतिबा चरणी वाहण्याची प्रथा आहे. गावात बहुतांश शेतकरी आहेत. २0१५ मध्ये गावाने तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळविलेला आहे. त्याअंतर्गत गावाला पाच लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. केखलेचे सरपंच ईश्वरा पाटील, उपसरपंच वनिता भिसे, ग्रामसेवक शिवाजी पाटील यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. दवणाचा इतिहासगणपतीला दुर्वा, महादेवाला बेल भक्तिभावाने जसे वाहिले जाते, तसेच जोतिबाला दवणा वाहण्याची प्राचीन कुलाचार आहे. वात, पित्त, कफ या त्रिदोषांवर औषधी असणारा सुगंधी दवणा हे जोतिबाचे आवडते फूल. एकवेळ फुलांचा हार नसला तरी चालेल, पण दवण्याच्या दोन काड्या आणि चिमूटभर गुलाल वाहिला जातो. गुलाल, खोबऱ्याबरोबर दवणा वाहणे ही येथील परंपरा आहे. संस्कृतमधील दमन नावावरून साधारण फूटभर उंच वाढण्याच्या भुरकट पांढऱ्या रंगाच्या वनस्पतीस ‘दवणा’ असे म्हणतात. ही वनस्पती मूळची काश्मीरमधील. शास्त्रीय इंग्रजी भाषेत या वनस्पतीला ‘आर्टिमीसिया सीवार्सिआना’ असे म्हणतात. दवण्याची अन्य जात जंगलात उगवते म्हणून तिला ‘वन्य दमण’ या नावानेही ओळखले जाते. जोतिबासह शनी शिंगणापूर, नाईकबा या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही दवणा अर्पण केला जातो. वर्षभर मागणीदवण्यासाठी केवळ चैत्र यात्रेलाच नव्हे, तर वर्षभर मागणी असते. केखले गावातील चाळीसहून अधिक शेतकरी वर्षभर दवण्याची शेती करतात. काही शेतकरी मात्र केवळ चैत्र यात्रेला आणि श्रावण महिन्यात षष्ठीला निघणाऱ्या पालखीला दवण्याची विक्री करतात. गावातील रोहिणी पाटील, त्यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील हे मात्र श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठीच दवणा घेतात. आज, सोमवारी ही यात्रा भरत आहे. दोन दिवस आधी देवस्थान परिसरात थेट विक्री सुरूआहे. अगरबत्तीसाठीही दवण्याचा वापरमूळच्या हिमालयातील असलेल्या या वनस्पतीला सुगंध आहे. नावाप्रमाणे वात, पित्त, कफ या आजारांवर गुणकारी असणारी ही वनस्पती औषधीही आहे. तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यात याचा वापर होत असल्याने याला महत्त्व आहे. सुगंधी असल्यामुळे अगरबत्तीसाठी दवणाचा वापर केला जातो. त्यामुळे जोतिबाला भक्तिभावाने वाहिल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सुंगधी उपयोग अगरबत्तीसाठी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दवण्याला, विशेष वाळलेल्या दवण्याला मोठी मागणी असते. बेळगाव, कारवार येथील व्यापारी दवणा खरेदीसाठी येथे संपर्क करतात.केखल्याला नैसर्गिक देणगी जोतिबा डोंगर आणि केखले गावचे अतूट नाते नैसर्गिक आहे. केखले वगळता शेजारील जाखले, पोखले येथेही दवणा घेतला जातो; पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, केखलेमध्येच त्याचे उत्पादन चांगले होते अशी इथे धारणा आहे. गावाजवळच असणाऱ्या जोतिबाला दवणा लागणे आणि त्याचे उत्पादन आपल्या गावात होणे, हे अभिमानास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात.