शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

Jyotiba Chaitra Yatra 2018 लाखो भाविक ‘जोतिबा’च्या चरणी लीन,चैत्र यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 18:39 IST

गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, श्रींचा अभिषेक, सरदारीरूपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक, अशा श्रध्दापूर्ण वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी (जि.कोल्हापूर) येथील ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली.

ठळक मुद्देलाखो भाविक ‘जोतिबा’च्या चरणी लीन,चैत्र यात्रा उत्साहात ‘चांगभलं’चा गजर आणि गुलालाने न्हाला डोंगर

कोल्हापूर : गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, श्रींचा अभिषेक, सरदारीरूपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक, अशा श्रध्दापूर्ण वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी (जि.कोल्हापूर) येथील ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरपूर पाऊस पडू दे, पीक चांगले येऊ दे, शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे, असे साकडे देवाला घातले. भाजून काढणाऱ्या उन्हाचा तडाखा असतानाही भक्तीच्या गारव्यासाठी भाविक या सोहळ््यात सहभागी झाले.श्री जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे कुलदैवत. या देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातील ताणतणाव, दुख, वेदना आणि संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद देणारा सोहळा.

शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यानिमित्त पहाटे तहसीलदार राम चोबे यांच्या हस्ते श्रींचा शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरदारीरूपात सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा विनोद मेतके, तुषार झुगर, प्रदीप सांगळे, गजानन आमाणी यांनी बांधली. दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन झाले.

यावेळी आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, शंभूराजे देसाई, कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटील (सरुडकर), वाडी रत्नागिरीच्या सरपंच रिया सांगळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ जोतिबा मंदिर विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी येत्या आठवड्याभरात निविदा काढण्यात येतील.

सायंकाळी साडेपाच वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सायंकाळी सात ते आठ या वेळेत पालखी यमाई मंदिरात थांबून त्यानंतर पुन्हा मंदिराकडे आली. रात्री दहा वाजता ‘श्रीं’ची आरती, धुपारती होऊन देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले.यात्रेसाठी गेल्या तीन दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहनांसह एसटी बसेसने भाविकांचे लोंढेच्या लोंढे डोंगरावर दाखल होत होते. डोंगरावरील झाडांच्या सावलीत लावलेल्या गाड्या-बैलगाड्या, त्याला बांधलेल्या गगनचुंबी सासनकाठ्या, नैवेद्याचे जेवण, सर्वांनी मिळून मांडलेली पंगत, दुसरीकडे मंदिरासह बाह्य परिसरात ढोल, ताशा, पिपाणीच्या तालावर सासनकाठ्या नाचविणारे भाविक, काठ्यांचा तोल जाऊ नये म्हणून दोरीने ते सांभाळणारे कार्यकर्ते, गुलाल-खोबऱ्यांची उधळण आणि गुलालात न्हालेला डोंगर असे सुरेख दृश्य होते.देवाच्या ओढीने मैलोन् मैलांचा प्रवास करून आलेल्या भाविकांच्या काळजीने जिल्हा, पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत, केएमटी, राज्य परिवहन, स्वयंसेवी संस्था या सगळ्या यंत्रणा अहोरात्र झटत होत्या. सर्व पातळीवर व्यवस्थित नियोजन झाल्याने कुठेही अनुचित प्रकार न होता यात्रा शांततेत पार पडली.

सासनकाठीची प्रतीक्षादरवर्षी दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. यंदा मात्र पालकमंत्री पाटील हे खूप लवकर मंदिरात आले.

दुपारी सव्वा बारा वाजता देवाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळ देवस्थानच्या कार्यालयाजवळ थांबले आणि लगेच उत्तर दरवाज्यासमोर सासनकाठ्यांच्या पूजनासाठी आले. त्यांच्यासोबत आमदार, शासकीय अधिकारी होते. मात्र, निनाम पाडळीची प्रथम क्रमांकाची सासनकाठी आलीच नव्हती. पाऊण तास वाट पाहिल्यानंतर ठरल्याप्रमाणे सव्वा वाजता या सासनकाठीचे आगमन झाले. पहिल्या दोन सासनकाठ्यांचे पूजन झाल्यावर त्यांच्यासह मान्यवर निघून गेले.

चेंगराचेंगरी...मंदिराच्या दक्षिण दरवाजातून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. पालकमंत्र्यांसह सर्व व्हीआयपी बाहेर जाणार असल्याने काही काळ मंदिरातील प्रवेश थांबविण्यात आला. तोपर्यंत बाहेर मोठी गर्दी जमली. दार उघडताच लोटलेल्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली. त्यातच एका महिलेसह दोन पुरुष खाली पडले. मागून आलेला लोंढा त्यांच्यावर पडत होता. मात्र, त्यांना तातडीने उठविण्यात आले अन्यथा अनर्थ घडला असता.

 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर