शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीवर नुसतीच चर्चा, शासकीय पातळीवर कार्यवाही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीची चर्चा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे सुरू झाली, मात्र शासकीय पातळीवर गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीची चर्चा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे सुरू झाली, मात्र शासकीय पातळीवर गेल्या सहा महिन्यांत कार्यवाही ठप्प आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या प्रस्तावांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याच्या बाबतीत कोल्हापूरकरांना जो अनुभव काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारमधील मंत्री, भाजपच्या मंत्र्यांकडून आला, तोच आता शिवसेनेच्या मंत्र्यांकडूनही येत असल्याची शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

विविध विकास कामांच्या निमित्ताने दि. ८ जानेवारी २०२१ रोजी कोल्हापूर शहरात आलेल्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरकरांच्या मागणीचा विचार करून सुधारित प्रस्ताव तात्काळ पाठवा, त्यावर लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पुढच्या आठ-दहा दिवसात महपालिका प्रशासनाने नगरविकास विभागाकडे शहरालगतची १८ गावे आणि दोन एमआयडीसींचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला. नगरविकासकडे प्रस्ताव जाऊन आता सहा महिन्यांच्या कालावधी लोटला असून तो नगरविकास विभागात धूळ खात पडला आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून दीड वर्षात पुणे शहराची हद्दवाढ दोनवेळा झाली. पण कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवर निर्णय झालेला नाही. मंत्री शिंदे यांनी तात्काळ हद्दवाढ करून दिली जाईल, असे सांगितले होते. मात्र त्यांनीही यात लक्ष घातलेले नाही. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर याबाबत पाठपुरावा करत आहेत, परंतु निर्णय लवकर होत नाही.

राज्य शासनाला महानगरपालिकेने पाठविलेल्या पत्रात, १८ गावांतील सरपंच, नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली असल्याचा दावा करून या हद्दवाढीला विरोध होणार नसल्याचे म्हटले आहे. परंतु महापालिकेचा प्रस्तावच सदोष आहे. शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीच्या पलीकडील तीन गावे व एका औद्योगिक वसाहतीचा त्यात समावेश केला आहे. पूर्वेकडील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली, उत्तर व पश्चिमेकडील नदीच्या अलीकडील, तर दक्षिणेकडील शहरालगतच्या गावांचा समावेश करणे आवश्यक होते. शिवाय दोन्ही औद्योगिक वसाहतींचा आग्रह पालिकेने का धरला आहे समजत नाही. हद्दवाढीचा प्रस्ताव देत असताना हद्दवाढीस विरोध होणार नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे.

वर्षभरात निर्णय होणे कठीण -

महापालिकेच्या प्रस्तावातच तात्काळ निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला खो घातला आहे, त्यामुळे पुढील वर्षभरात तरी हद्दवाढीचा निर्णय होणे कठीण आहे. २७ जानेवारी २००५ च्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सहा महिने अगोदरच्या कालावधीत तिच्या क्षेत्रात, हद्दीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येणार नाही, अशी तरतूद असल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोराेनामुळे ती स्थगित करण्यात आली आहे. प्रभाग रचना, आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे नगरविकास निवडणूक होईपर्यंत हद्दवाढीचा निर्णय घेईल, असे दिवस नाहीत.

- हद्दवाढीच्या प्रस्तावातील गावे - शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, शिरोली, उचगाव, शिंगणापूर, गोकुळ शिरगाव, नागाव, वळीवडे-गांधीनगर, मुडशिंगी. तसेच गोकुळ शिरगाव व शिरोली औद्योगिक वसाहत.

पॉईंटर -

- नागरिकीकरणाचा वेग चांगला असलेल्या गावांचा समावेश.

- कोल्हापूर शहराची लोकसंख्या - ५,५०,५४१

- हद्दवाढीत समाविष्ट गावांची लोकसंख्या - २,१६,८७३

-हद्दवाढीनंतर होणारी लोकसंख्या - ७,६७,४१४

- शहराचे सध्याचे क्षेत्र - ६६.८२ चौरस कि.मी.

- हद्दवाढ गावांचे क्षेत्र - १२३.११

- शहराचे वार्षिक दरडोई उत्पन्न - ३८६५.७५ रुपये

- हद्दवाढीतील गावांचे दरडोई उत्पन्न - ५०७.२४

राज्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची-

शहराच्या हद्दवाढीबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. विशेष म्हणजे हे दोन मंत्री महापालिकेतील सत्तेत आहेत. आतापर्यंत या विषयात लक्ष घातले नाही, पण यापुढे दुर्लक्ष करणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने घातक ठरणार आहे. हद्दवाढ न झाल्यामुळे शहराचा विकास करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत.