शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

‘राधानगरी’त २० दिवसांचाच पाणीसाठा

By admin | Updated: May 26, 2016 00:23 IST

टंचाईचे सावट : कोल्हापूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार

कोल्हापूर : राधानगरी धरणामध्ये अवघा ०.४१ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने त्याचा परिणाम नजीकच्या काळात कोल्हापूर शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कोल्हापूर शहराला दररोज सुमारे ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्याचा शिल्लक साठा किमान १५ जूनअखेरपर्यंत पुरविण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर शहरात भागनिहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, तसेच शेतीसाठी पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे राधानगरी धरणातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. सुमारे ९ टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या राधानगरी धरणातही सध्या कमालीची पाणीपातळी कमी झाली आहे. सन १९७२ च्या दुष्काळात राधानगरी धरणात सुमारे १.५६ टीएमसी पाणीसाठा होता, पण सध्या त्यापेक्षाही दोन फुटांनी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या राधानगरी धरणात १ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर पाणीपातळी ही २७५.७७ फूट इतकी आहे. त्यापैकी फक्त ०.४१ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपयुक्त आहे. दरम्यान, राधानगरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा केवळ वीस दिवस पुरण्याइतपत असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपसा बंदी जाहीर केली असली तरीही पंचगंगा नदीमार्गे मागणीप्रमाणे फक्त पिण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राधानगरी धरण साठा जादा असताना संपूर्ण शहराला सुमारे १२० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जात होता; पण सध्या धरणातील पाणीसाठा दिवसें-दिवस कमी होऊ लागल्याने पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने संपूर्ण शहरात भागनिहाय नियोजनबद्ध एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे, तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी विचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत शिंगणापूर आणि बालिंगा उपसा केंद्रातून दररोज एकूण ८० एमएलडी पाणी उपसा केला जात आहे, त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत होत आहे; पण सध्याच्या परिस्थितीत तरी संपूर्ण शहरात पाण्याची कोणतीही टंचाई दिसत नाही; पण काही दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे..भविष्यात उद्भवणारी पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर शहराच्या दृष्टीने पाण्याचा उपसाही कमी करून तो १२० एमएलडीवरून ८० एमएलडीपर्यंत कमी केला आहे. एक दिवसाआड पाण्याचे तंत्र शहरवासीयांनी अवलंबले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू आहे. कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही, तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे. - मनिष पवार, जलअभियंता, को.म.न.पा.०.४१ टीएमसी उपयुक्त साठासध्या राधानगरी धरणात १ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी फक्त ०.४१ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपयुक्त शिल्लक आहे. तो पिण्याच्या पाण्यासाठी ठेवला आहे; पण तोही पाणीसाठा अवघे वीसच दिवस पुरण्याइतपत आहे.