शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

‘राधानगरी’त २० दिवसांचाच पाणीसाठा

By admin | Updated: May 26, 2016 00:23 IST

टंचाईचे सावट : कोल्हापूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार

कोल्हापूर : राधानगरी धरणामध्ये अवघा ०.४१ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने त्याचा परिणाम नजीकच्या काळात कोल्हापूर शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कोल्हापूर शहराला दररोज सुमारे ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्याचा शिल्लक साठा किमान १५ जूनअखेरपर्यंत पुरविण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर शहरात भागनिहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, तसेच शेतीसाठी पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे राधानगरी धरणातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. सुमारे ९ टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या राधानगरी धरणातही सध्या कमालीची पाणीपातळी कमी झाली आहे. सन १९७२ च्या दुष्काळात राधानगरी धरणात सुमारे १.५६ टीएमसी पाणीसाठा होता, पण सध्या त्यापेक्षाही दोन फुटांनी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या राधानगरी धरणात १ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर पाणीपातळी ही २७५.७७ फूट इतकी आहे. त्यापैकी फक्त ०.४१ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपयुक्त आहे. दरम्यान, राधानगरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा केवळ वीस दिवस पुरण्याइतपत असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपसा बंदी जाहीर केली असली तरीही पंचगंगा नदीमार्गे मागणीप्रमाणे फक्त पिण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राधानगरी धरण साठा जादा असताना संपूर्ण शहराला सुमारे १२० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जात होता; पण सध्या धरणातील पाणीसाठा दिवसें-दिवस कमी होऊ लागल्याने पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने संपूर्ण शहरात भागनिहाय नियोजनबद्ध एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे, तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी विचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत शिंगणापूर आणि बालिंगा उपसा केंद्रातून दररोज एकूण ८० एमएलडी पाणी उपसा केला जात आहे, त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत होत आहे; पण सध्याच्या परिस्थितीत तरी संपूर्ण शहरात पाण्याची कोणतीही टंचाई दिसत नाही; पण काही दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे..भविष्यात उद्भवणारी पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर शहराच्या दृष्टीने पाण्याचा उपसाही कमी करून तो १२० एमएलडीवरून ८० एमएलडीपर्यंत कमी केला आहे. एक दिवसाआड पाण्याचे तंत्र शहरवासीयांनी अवलंबले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू आहे. कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही, तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे. - मनिष पवार, जलअभियंता, को.म.न.पा.०.४१ टीएमसी उपयुक्त साठासध्या राधानगरी धरणात १ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी फक्त ०.४१ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपयुक्त शिल्लक आहे. तो पिण्याच्या पाण्यासाठी ठेवला आहे; पण तोही पाणीसाठा अवघे वीसच दिवस पुरण्याइतपत आहे.