शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

एकमेकांची जिरवताना दोघांचीही जिरली : आवाडे-आवळे मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:01 IST

हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा ...

ठळक मुद्देप्रकाश आवाडे यांची कबुली ; राजू आवळे यांना आमदार करणार

हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी एकमेकांना आलिंगन दिले व यापुढे मतभेद गाडून एकत्रित वाटचाल करण्याचे जाहीर केले. मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट करून या मनोमिलनाला पाठबळ दिले.प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणाचीच सुरुवात राजूबाबा हा उद्याचा आमदार असल्याचे सांगून केली. ते म्हणाले, ‘आवाडे व आवळे गट आता एकदिलाने एकत्र आला आहे, ही तात्पुरती मलमपट्टी नाही. काँग्रेस दुरुस्त व्हायची असेल तर अगोदर नेत्यांतील भांडणे मिटली पाहिजेत, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धरला होता. त्यानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुढाकार घेऊन त्याची सुरुवात केली. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या शेजारील हॉल बांधकामाच्या कार्यक्रमात त्यांनी हा विचार बोलून दाखविला व त्यानुसार आम्ही एकसंधपणे पुढे जायचे ठरविले. कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे; त्यामुळे एकेकाळी एकट्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार होते; परंतु त्यानंतर आम्ही मंडळीच एकमेकांची जिरवायच्या नादाला लागलो व त्यात आमचीच जिरली. त्यासाठी विरोधकांची गरजच उरली नाही; परंतु आता हे आम्हांला उमगले आहे. लोकांचाही रेटा आहे.’आवाडे म्हणाले, ‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूत होते; कारण नुसता एक खडा पाण्यात टाकल्यावर जसे वलय उमटते,तसेच या तिन्ही मतदारसंघांचे राजकारण आहे. पूर्वीच्या इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांनी उचलून घेतले तर राजूबाबांची गाडी विधानसभेला जाण्यात अडचण नाही. राजूबाबा असेल किंवा गणपतराव पाटील; हे काय आमच्यासाठी वेगळे नाहीत.’आवाडे व आवळे यांची गळाभेट ही काँग्रेसची मोठी उपलब्धी असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही जो उमेदवार सुचवाल तोच आमचा उमेदवार असेल, असे चव्हाण यांनी सांगितले.जयवंतराव आवळे म्हणाले, ‘काँग्रेसवर मनापासून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे; परंतु दुहीमुळे आमचा पराभव झाला. मी व आवाडे गेल्या पंधरा वर्षांत कधीही एका व्यासपीठावर आलो नव्हतो; परंतु आज आवाडे-आवळे एकत्र आले आहेत. जे झालं ते गंगेला मिळालं. आता यापुढे हातात हात घालून पुढे जाऊ या.’हातकणंगले लोकसभाही घ्याआमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३१) कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला.हातकणंगलेची जागा तर गेल्या निवडणुकीत आम्हीच लढवली आहे. त्यामुळे मित्रपक्षांसोबत आघाडी झाली तर हा प्रश्नयेणार नाही; परंतु ती नाही झाली तर हा मतदारसंघही काँग्रेसला मिळावा, अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली.शिरोलीतून सुरुवात ही नांदीकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात शिरोलीत झालेल्या जंगी स्वागताने झाली, याचा वेगळाच आनंद असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीत मला जे जमले नाही ते आता यशस्वी झाले.फेव्हीक्विक एकजूटआवाडे व आवळे यांची एकजूट ही चिकटपट्टीची नाही, तर ती फे व्हीक्विकसारखी मजबूत असल्याने आता तुटणार नाही, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच हशा पिकला.सहा आमदारकोल्हापुरात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही; परंतु नेत्यांनी मतभेद गाडून टाकले तर दहापैकी किमान सहा आमदार काँग्रेसचे होण्यात अडचण नसल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच आवाडे-आवळे एकाच व्यासपीठावर‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूततुम्ही जो उमेदवार सुचवालतोच आमचा उमेदवार असेल,अशी अशोक चव्हाण यांचीग्वाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण